शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

सोन्यात ९०० तर चांदीमध्ये ७०० रुपयांनी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:34 IST

खरेदीऐवजी मोडचे प्रमाण वाढल्याचे परिणाम

जळगाव : उच्चांकीवर पोहचलेल्या सोने-चांदीच्या खरेदीऐवजी मोडचे प्रमाण वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर या धातूंची मागणी घटत आहे. परिणामी सोने-चांदीच्या भावात घसरण होत असून सुवर्णनगरी जळगावात शुक्रवार, ६ सप्टेंबर रोजी एकाच दिवसात सोन्याचे भाव ९०० रुपये प्रती तोळ््याने कमी ते ३८ हजार ६०० रुपयांवर तर चांदीचे भाव ७०० रुपये प्रती किलोने कमी होऊन ४९ हजार ३०० रुपयांवर आले आहेत. मागणी कमी होण्यासह अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात सुधारणादेखील होत असल्याने भाव कमी होण्यास मदत मिळत आहे.रशिया व चीनने सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची खरेदी वाढल्याने तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात होत असलेल्या घसरणीमुळे मे महिन्यापासून सोन्याचे भाव वाढण्यास सुरुवात झाली. जून महिन्यापासून तर ही वाढ अधिकच होत गेली.मोडचे प्रमाण वाढलेसहा वर्षांपूर्वी ३५ हजारावर पोहचलेल्या सोन्याचे भाव या वर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात वाढत गेले. ३२ हजार, ३३ हजार, ३४ हजार असा टप्पा पार करता-करता सोने ३९ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. दुसरीकडे चांदीचीही अशीही स्थिती राहत ४० हजार रुपये प्रती किलो ते ५० हजार रुपयांचा प्रवास चांदीचा झाला. ही वाढ होत असताना अधिक भाव वाढणार या आशेने खरेदीही जोरात सुरू राहिली. मात्र आता उच्चांकीवर पोहचलेल्या भावात या दोन्हीही धातूंची खरेदीऐवजी मोडकडे अनेकांचा कल वाढत आहे. ज्या ठिकाणी एका सुवर्ण दालनात एका दिवसात १० तोळे सोन्याची व एक किलो चांदीची मोड होत असे तेथे आता २० तोळे सोन्याची व २ ते ३ किलो चांदीची मोड होऊ लागली आहे. त्याचा परिणाम म्हणून खरेदी घटल्याने ६ सप्टेंबर रोजी सोने-चांदीचे भाव घसरले.रुपयात सुधारणागेल्या काही दिवसांपासून भारतीय रुपयाच्या तुलनेत वाढत गेलेल्या अमेरिकन डॉलरचे भावही कमी होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. ३ सप्टेंबर रोजी डॉलरचा दर ७२.१४ रुपयांवर गेला होता. तो ४ रोजी ७१.९८ रुपये, ५ रोजी ७१.९३ रुपये व ६ रोजी ७१.६८ रुपयांवर आला आहे. त्यामुळेही सोने-चांदीचे भाव कमी होत आहे. ५ सप्टेंबर रोजी ५० हजार रुपये प्रती किलोवर असलेल्या चांदीच्या भावात ६ रोजी ७०० रुपये प्रती किलोने घसरण होऊन ती ४९ हजार ३०० रुपयांवर आली. तसेच सोन्याच्याही भावात ९०० रुपये प्रती तोळेने घसरण होऊन ते ३८ हजार ६०० रुपयांवर आले आहे.बदल करण्याचे प्रमाण ‘जैसे थे’भाव कमी झाले किंवा वाढले तरी जुने सोने-चांदी देऊन नवीन दागिने घेण्याऱ्यांना भावातील चढ-उताराचा काही परिणाम होत नसल्याचेही चित्र सुवर्ण बाजारात आहे. कारण जुने दागिने देऊन केवळ मजुरी द्यावी लागत असल्याने बदल दागिने घेण्याऱ्यांचे प्रमाण ‘जैसे थे’ आहे.सोने-चांदीचे भाव उच्चांकीवर पोहचल्याने त्या भावात खरेदी होण्याऐवजी मोडकडे कल वाढत असल्याने मागणी कमी झाली. परिणामी सोने-चांदीच्या भावात घसरण होत आहे. तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात सुधारणाही झाल्याने भाव कमी होण्यास मदत होत आहे.- किशोर सुराणा, सुवर्ण व्यावसायिक.जास्त दिवस वापरून झालेले जुने दागिने बदलून घेण्यासाठी मजुरीच द्यावी लागत असल्याने भावातील चढ-उताराचा काही परिणाम होत नाही. त्यामुळे दागिने बदलून घेण्यावर काही परिणाम नाही.- मनोहर पाटील, जळगाव.सोने-चांदीचे भाव वाढत असल्याने या जास्त भावात खरेदी करण्यापेक्षा मोड दिल्यास अधिक फायदा होतो. त्यामुळे जुन्या दागिन्यांची मोड दिली जात आहे.- भरत पाटील, ग्राहक.पूर्वी घेतलेले दागिने वापरून झाल्याने तसेच बचत म्हणून घेऊन ठेवलेल्या सोने-चांदीची वाढीव भावात मोड दिल्याने फायदाच होणार असल्याने मोडकडे कल आहे.- विनायक जाधव, ग्राहक.

टॅग्स :Jalgaonजळगाव