शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

एक दिवसाच्या वाढीनंतर सोन्यात पुन्हा घसरण; चांदीचे भावही घसरले

By विजय.सैतवाल | Updated: October 27, 2023 15:32 IST

गुरुवारी सोन्याचे भाव वाढलेले असताना चांदीच्या भावात मात्र एक हजार रुपयांनी घसरण होऊन ती ७२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली होती

जळगाव : विजयादशमीच्या पूर्वसंध्येपासून घसरण होत गेलेल्या सोन्याच्या भावात गुरुवार, २६ ऑक्टोबर रोजी ५०० रुपयांची वाढ झाली, मात्र शुक्रवार, २७ ऑक्टोबर रोजी पुन्हा २०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोने ६१ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर आले. चांदीच्या भावातही ३०० रुपयांची घसरण झाली व ती ७२ हजार २०० रुपये प्रति किलोवर आली.

हमास व इस्त्रायल युद्धामुळे पितृपक्षापासूनच भाववाढ सुरू झालेल्या सोने-चांदीच्या भावात विजयादशमीच्या पूर्वसंध्येला २३ ऑक्टोबर रोजी घसरण होऊन ६१ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते. त्यात विजयादशमीला पुन्हा १०० रुपयांनी भाव कमी झाले. दोन दिवस हे भाव स्थिर राहिल्यानंतर गुरुवार, २६ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या भावात ५०० रुपयांची वाढ झाली व ते ६१ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. शुक्रवारी मात्र त्यात पुन्हा २०० रुपयांची घसरण झाली व ते ६१ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर आले.

गुरुवारी सोन्याचे भाव वाढलेले असताना चांदीच्या भावात मात्र एक हजार रुपयांनी घसरण होऊन ती ७२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली होती. त्यानंतर शुक्रवार, २८ ऑक्टोबर रोजी पुन्हा ३०० रुपयांची घसरण झाली व ती ७२ हजार २०० रुपयांवर आली. हमास-इस्त्रायल युद्ध व जागतिक पातळीवरील अस्थिरता यामुळे शेअर बाजारावर परिणाम होण्यासह सोने-चांदीच्याही भावात चढ-उतार होत असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Goldसोनं