शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

रद्द करण्याचा तयारीत असलेल्या ठेकेदारांना पुन्हा संधीचे ‘गौडबंगाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:31 IST

अजय पाटील, जळगाव महापालिका प्रशासनाच्या चुकांचे सत्र गेल्या काही मोठ्या योजनांच्या निविदा प्रक्रियेत दिसून येत आहे. विशेष म्हणजे कामाला ...

अजय पाटील, जळगाव

महापालिका प्रशासनाच्या चुकांचे सत्र गेल्या काही मोठ्या योजनांच्या निविदा प्रक्रियेत दिसून येत आहे. विशेष म्हणजे कामाला सुरुवात झाल्यानंतर

हे बिंग फुटत असून, त्यावर मोठा गदारोळदेखील सुरू होतो. ते काम त्या मक्तेदाराकडून काढण्याचीही तयारी मनपा प्रशासनाकडून सुरू होते; मात्र

काही महिन्यांनंतर कायद्याच्या चौकटीपुढे त्याच मक्तेदाराला पुन्हा संधी देण्याचे काम मनपा प्रशासन व पदाधिकाऱ्यांकडून होताना दिसून येत आहे.

यामध्ये वॉटरग्रेस व ईईएसएल या दोन मक्तेदारांचा समावेश असून, आता घनकचरा प्रकल्पाच्या बाबतीतदेखील हाच सावळागोंधळ पहायला मिळत आहे.

मनपात भाजप सत्तेत आल्यानंतर काही मोठ्या योजनांच्या निविदा प्रक्रियेत मोठा गोंधळ झालेला दिसून येत आहे. सफाईचा मक्ता, एलईडी,

मोकाट कुत्र्यांचा निर्बीजीकरण, घनकचरा प्रकल्प, बायोमायनिंग प्रक्रिया सर्व कामांच्या योजनेत एक बाब सारखीच असून, यापैकी एकाही मक्तेदाराने

पूर्ण काम केले नसून, या मक्तेदारांचे मक्ते कामांपेक्षा अन्य बाबींमुळेच चर्चेत राहत आहेत. एलईडीसाठी ईईएसएल या कंपनीला मक्ता देण्यात आला. यासाठी सत्ताधारी भाजपनेच आग्रह धरला; मात्र तीन महिन्यातच कंपनीने केलेल्या कामाच्या तक्रारी भाजप नगरसेवकांकडून करण्यात आल्या. नंतर हे काम थांबविण्यात आले. सफाईचा ७५ कोटींचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आला; मात्र सहा महिन्यातच तक्रारीनंतर हे काम थांबविण्यात आले. मोकाट कुत्र्यांचा नीर्बीजीकरणाचा ठेका अमरावती येथील कंपनीला देण्यात आला. चार महिन्यातच काम थांबविण्यात आले. आता घनकचरा प्रकल्पाचे काम औरंगाबाद येथील लक्ष्मी कंस्ट्रक्शनला देण्यात आले होते. कामाची मुदत संपल्यानंतरही मक्तेदाराने काम सुरू केलेले नाही. आता हा मक्ताही रद्द करण्याची तयारी मनपाने सुरू केली आहे. विशेष म्हणजे कामासाठी आग्रह सत्ताधाऱ्यांचा, कामासाठी विरोध सत्ताधाऱ्यांचा व पुन्हा संधीची मागणीही सत्ताधाऱ्यांची त्यामुळे हे ‘गौडबंगाल’ नेमके काय? हे समजण्यापलीकडे आहे; मात्र या निविदांचा घोळ, त्यानंतर निश्चित होणारा मक्तेदार, यामागची ‘मोडस ऑपरेंडी’ची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे व हे गौडबंगाल वाढतच जात आहे; मात्र यामुळे शहरवासीयांच्या नशिबी केवळ असुविधाच हाती लागत आहेत.