शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

परमात्माच सर्वव्यापी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 18:55 IST

अध्यात्म

अध्यात्मशास्त्र म्हणजे आत्मा या विषयाचे शास्त्र. अध्यात्म या शब्दात अधि अणि आत्मा हे दोन शब्द आहेत. अध्यात्म म्हणजे आत्म्याविषयीज्ञान होय. ‘अंतिम सत्य शोधून काढण्याच्या दृष्टीने केलेले अनुभवाचे मंथन’ अशीही अध्यात्मशास्त्राची व्याख्या आढळते. आपल्या अनुभवात येणारे जेवढे पदार्थ आहे, त्यातील नित्य काय व अनित्य काय हे शोधून काढण्याच्या दृष्टीने जे शास्त्र त्याकडे बघते ते अध्यात्म शास्त्र होय.अध्यात्मशास्त्र म्हणजे आत्मज्ञानाचे शास्त्र आणि अध्यात्म दर्शन म्हणजे आत्म्याविषयी दर्शन होय. या दृष्य जगाला आधारभूत असलेल्या आत्मस्वरुपाचे तर्काचे आणि नंतर त्याचा साक्षात अनुभव घेणे याला अध्यात्म दर्र्शन म्हटले जाते.अध्यात्मशास्त्राला पराविद्या असेही म्हणतात. हे तत्वज्ञान वेदामध्ये निर्माण होते व उपनिषदामध्ये पूर्ण होते. अध्यात्मशास्त्राच्या भांडारसाठी उपनिषदांना समजून घ्यायला हवे.या नश्वर जगात अमृत कुठे आहे तर याचा शोध घेता घेता वैदिक ऋषींना एकंसत्चा साक्षात्कार झाला. एकच परमात्मा सर्वव्यापी आहे. वारकरी सांप्रदायात सांगायचे झाले तर ‘विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला म्हणजेच ‘सभूमिंवृरत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम्’ याचा साक्षात अनुभव घेणे हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे. या अनुभवाप्रत ऋषी पोहोचले.प्राचीन व अर्वाचीन ब्रह्मज्ञानी पुरुषांनी अध्यात्मशास्त्राची परंपरा आजतगायत टिकवून ठेवलेली आहे. थोर संतांची त्यावरील अढळ निष्ठा यामुळेच ही परंपरा अखंडपणे टिकली आहे.संपूर्ण जगाला गवसणी घालणारे ज्याचे वर्णन करता येत नाही, ज्याचा कधीही विनाश होत अशा गोष्टीचा विचार करणे आणि त्या व्यक्त न होणाऱ्या गोष्टीतून निर्माण होणाºया व त्यातच पुन्हा लय पावणाºया या चराचर जगाचे ज्ञान करून घेणे यालाच वेदांतामध्ये अध्यात्मशास्त्र असे म्हणतात.- दादा महाराज जोशी, जळगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव