शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमद् भगवद्गीतेत ईश्वरवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 17:56 IST

भगवंताचे ज्ञान करुन देणारी जी सहा दर्शने आहे त्यात इतर दर्शनापेक्षा गीतेमध्ये ईश्वरवाद श्रेष्ठतम रुपाने प्रतिपादीत केलेला आहे. न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा ही षट्दर्शने जीवात्म्याच्या भल्यासाठीच आहे. पण त्यांच्यात ईश्वराचे वर्णन जास्त करुन होतच नाही. यापैकी न्यायदर्शनात जे काही होते ते ईश्वरेच्छेने होते. या प्रकाराने ...

भगवंताचे ज्ञान करुन देणारी जी सहा दर्शने आहे त्यात इतर दर्शनापेक्षा गीतेमध्ये ईश्वरवाद श्रेष्ठतम रुपाने प्रतिपादीत केलेला आहे. न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा ही षट्दर्शने जीवात्म्याच्या भल्यासाठीच आहे. पण त्यांच्यात ईश्वराचे वर्णन जास्त करुन होतच नाही. यापैकी न्यायदर्शनात जे काही होते ते ईश्वरेच्छेने होते. या प्रकाराने ईश्वराचा गौरव तर केलेलाच आहे पण जीवात्म्याला मुक्तीप्राप्त करण्यासाठी ईश्वराचे सहाय्य घ्यावेच लागते. ही गोष्ट ते ग्राह्य धरत नाही. ते २१ प्रकारच्या दु:खालाच व दु:ख विनाशालाच जीवात्म्याचे मुक्त होणे असे समजतात. वैशेषिक दर्शनात सुद्धा जीवात्म्याच्या कल्याणासाठी आवश्यकता दाखविली नाही तर अध्यात्मिक, अधिदैविक व अधिभौतिक या तिनही तापांचा नायनाट झालेला आहे. ही भूमिका प्रामुख्याने घेतलेली दिसून येते. ‘योग दर्शनात मुख्यत्वे करुन चित्तवृत्तींच्या निरोधाबद्दलच सांगितलेले आहे. चित्तवृत्तींच्या निरोधाने स्वस्वरुपामध्ये द्रष्ट्याची स्थिती होते. सांख्यदर्शन आणि पूर्व मीमांसा दर्शन तर जीवाच्या कल्याणासाठी ईश्वराचे अजिबात गरज नाही, असे समजतात. ‘उत्तर मीमांसा दर्शनातही ईश्वराबद्दल विशेषरुपाने काही उल्लेख आलेला आढळून येत नाही, पण उलट जीवात्मा आणि परमात्मा या दोघांच्या अभेदाबद्दल जास्त जोर दिला आहे. वैष्णव सांप्रदायांच्या आचार्यांनी सुद्धा आपल्या तत्वज्ञानामध्ये परमेश्वराचे श्रेष्ठतम महत्व आहे असे मानले आहे.गीतेत ईश्वरभक्ती मुख्यत्वे करुन आलेली आहे. अर्जुन जोपर्यंत भगवंताला अर्पण झाला नव्हता तोपर्यंत भगवंतांनी त्याला ‘गीतामृत’ पाजले नाही. ज्यावेळी अर्जुनाने नारायणरु पी भगवान श्रीकृष्णाची शरणागती पत्करली त्या आणि त्याच वेळी भगवान योगेश्वर श्रीकृष्णांनी गीतेचा उपदेश करायला प्रारंभ केला. गीतेने सांगितल्या प्रमाणे कर्मयोगामध्ये सुद्धा ईश्वराची आज्ञापक रुपाने श्रेष्ठत्ता वर्णन केलेली आपल्याला आढळून येते.अशा प्रकारे गीतेचा मूळपाठ करताना आपल्याला असे दिसते की, जीवात्म्याच्या मंगलतेसाठी परमात्मा परब्रह्म ईश्वराची नितांत आवश्यकता आहे.-दादा महाराज जोशी

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव