शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

श्रीमद् भगवद्गीतेत ईश्वरवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 17:56 IST

भगवंताचे ज्ञान करुन देणारी जी सहा दर्शने आहे त्यात इतर दर्शनापेक्षा गीतेमध्ये ईश्वरवाद श्रेष्ठतम रुपाने प्रतिपादीत केलेला आहे. न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा ही षट्दर्शने जीवात्म्याच्या भल्यासाठीच आहे. पण त्यांच्यात ईश्वराचे वर्णन जास्त करुन होतच नाही. यापैकी न्यायदर्शनात जे काही होते ते ईश्वरेच्छेने होते. या प्रकाराने ...

भगवंताचे ज्ञान करुन देणारी जी सहा दर्शने आहे त्यात इतर दर्शनापेक्षा गीतेमध्ये ईश्वरवाद श्रेष्ठतम रुपाने प्रतिपादीत केलेला आहे. न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा ही षट्दर्शने जीवात्म्याच्या भल्यासाठीच आहे. पण त्यांच्यात ईश्वराचे वर्णन जास्त करुन होतच नाही. यापैकी न्यायदर्शनात जे काही होते ते ईश्वरेच्छेने होते. या प्रकाराने ईश्वराचा गौरव तर केलेलाच आहे पण जीवात्म्याला मुक्तीप्राप्त करण्यासाठी ईश्वराचे सहाय्य घ्यावेच लागते. ही गोष्ट ते ग्राह्य धरत नाही. ते २१ प्रकारच्या दु:खालाच व दु:ख विनाशालाच जीवात्म्याचे मुक्त होणे असे समजतात. वैशेषिक दर्शनात सुद्धा जीवात्म्याच्या कल्याणासाठी आवश्यकता दाखविली नाही तर अध्यात्मिक, अधिदैविक व अधिभौतिक या तिनही तापांचा नायनाट झालेला आहे. ही भूमिका प्रामुख्याने घेतलेली दिसून येते. ‘योग दर्शनात मुख्यत्वे करुन चित्तवृत्तींच्या निरोधाबद्दलच सांगितलेले आहे. चित्तवृत्तींच्या निरोधाने स्वस्वरुपामध्ये द्रष्ट्याची स्थिती होते. सांख्यदर्शन आणि पूर्व मीमांसा दर्शन तर जीवाच्या कल्याणासाठी ईश्वराचे अजिबात गरज नाही, असे समजतात. ‘उत्तर मीमांसा दर्शनातही ईश्वराबद्दल विशेषरुपाने काही उल्लेख आलेला आढळून येत नाही, पण उलट जीवात्मा आणि परमात्मा या दोघांच्या अभेदाबद्दल जास्त जोर दिला आहे. वैष्णव सांप्रदायांच्या आचार्यांनी सुद्धा आपल्या तत्वज्ञानामध्ये परमेश्वराचे श्रेष्ठतम महत्व आहे असे मानले आहे.गीतेत ईश्वरभक्ती मुख्यत्वे करुन आलेली आहे. अर्जुन जोपर्यंत भगवंताला अर्पण झाला नव्हता तोपर्यंत भगवंतांनी त्याला ‘गीतामृत’ पाजले नाही. ज्यावेळी अर्जुनाने नारायणरु पी भगवान श्रीकृष्णाची शरणागती पत्करली त्या आणि त्याच वेळी भगवान योगेश्वर श्रीकृष्णांनी गीतेचा उपदेश करायला प्रारंभ केला. गीतेने सांगितल्या प्रमाणे कर्मयोगामध्ये सुद्धा ईश्वराची आज्ञापक रुपाने श्रेष्ठत्ता वर्णन केलेली आपल्याला आढळून येते.अशा प्रकारे गीतेचा मूळपाठ करताना आपल्याला असे दिसते की, जीवात्म्याच्या मंगलतेसाठी परमात्मा परब्रह्म ईश्वराची नितांत आवश्यकता आहे.-दादा महाराज जोशी

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव