शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

श्रीमद् भगवद्गीतेत ईश्वरवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 17:56 IST

भगवंताचे ज्ञान करुन देणारी जी सहा दर्शने आहे त्यात इतर दर्शनापेक्षा गीतेमध्ये ईश्वरवाद श्रेष्ठतम रुपाने प्रतिपादीत केलेला आहे. न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा ही षट्दर्शने जीवात्म्याच्या भल्यासाठीच आहे. पण त्यांच्यात ईश्वराचे वर्णन जास्त करुन होतच नाही. यापैकी न्यायदर्शनात जे काही होते ते ईश्वरेच्छेने होते. या प्रकाराने ...

भगवंताचे ज्ञान करुन देणारी जी सहा दर्शने आहे त्यात इतर दर्शनापेक्षा गीतेमध्ये ईश्वरवाद श्रेष्ठतम रुपाने प्रतिपादीत केलेला आहे. न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा ही षट्दर्शने जीवात्म्याच्या भल्यासाठीच आहे. पण त्यांच्यात ईश्वराचे वर्णन जास्त करुन होतच नाही. यापैकी न्यायदर्शनात जे काही होते ते ईश्वरेच्छेने होते. या प्रकाराने ईश्वराचा गौरव तर केलेलाच आहे पण जीवात्म्याला मुक्तीप्राप्त करण्यासाठी ईश्वराचे सहाय्य घ्यावेच लागते. ही गोष्ट ते ग्राह्य धरत नाही. ते २१ प्रकारच्या दु:खालाच व दु:ख विनाशालाच जीवात्म्याचे मुक्त होणे असे समजतात. वैशेषिक दर्शनात सुद्धा जीवात्म्याच्या कल्याणासाठी आवश्यकता दाखविली नाही तर अध्यात्मिक, अधिदैविक व अधिभौतिक या तिनही तापांचा नायनाट झालेला आहे. ही भूमिका प्रामुख्याने घेतलेली दिसून येते. ‘योग दर्शनात मुख्यत्वे करुन चित्तवृत्तींच्या निरोधाबद्दलच सांगितलेले आहे. चित्तवृत्तींच्या निरोधाने स्वस्वरुपामध्ये द्रष्ट्याची स्थिती होते. सांख्यदर्शन आणि पूर्व मीमांसा दर्शन तर जीवाच्या कल्याणासाठी ईश्वराचे अजिबात गरज नाही, असे समजतात. ‘उत्तर मीमांसा दर्शनातही ईश्वराबद्दल विशेषरुपाने काही उल्लेख आलेला आढळून येत नाही, पण उलट जीवात्मा आणि परमात्मा या दोघांच्या अभेदाबद्दल जास्त जोर दिला आहे. वैष्णव सांप्रदायांच्या आचार्यांनी सुद्धा आपल्या तत्वज्ञानामध्ये परमेश्वराचे श्रेष्ठतम महत्व आहे असे मानले आहे.गीतेत ईश्वरभक्ती मुख्यत्वे करुन आलेली आहे. अर्जुन जोपर्यंत भगवंताला अर्पण झाला नव्हता तोपर्यंत भगवंतांनी त्याला ‘गीतामृत’ पाजले नाही. ज्यावेळी अर्जुनाने नारायणरु पी भगवान श्रीकृष्णाची शरणागती पत्करली त्या आणि त्याच वेळी भगवान योगेश्वर श्रीकृष्णांनी गीतेचा उपदेश करायला प्रारंभ केला. गीतेने सांगितल्या प्रमाणे कर्मयोगामध्ये सुद्धा ईश्वराची आज्ञापक रुपाने श्रेष्ठत्ता वर्णन केलेली आपल्याला आढळून येते.अशा प्रकारे गीतेचा मूळपाठ करताना आपल्याला असे दिसते की, जीवात्म्याच्या मंगलतेसाठी परमात्मा परब्रह्म ईश्वराची नितांत आवश्यकता आहे.-दादा महाराज जोशी

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव