शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे ध्येय - आमदार सुरेश भोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 11:55 IST

निवडणुकीतील विजयानंतर ‘लोकमत’च्या दिलेल्या भेटीदरम्यान व्यक्त केला मनोदय

जळगाव : २०१४मध्ये विधानसभा निवडणुकीत मला जनतेने आशीर्वाद देऊन सेवेची संधी दिली. आता पुन्हा माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या बद्दल मी जनतेचा ऋणी असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचेच आपले ध्येय आहे व राहणार अशी ग्वाही नवनियुक्त आमदार सुरेश भोळे यांनी ‘लोकमत’ कार्यालयास दिलेल्या भेटीदरम्यान दिली. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवित दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवड झाल्यानंतर आमदार सुरेश भोळे यांनी शुक्रवार, २५ रोजी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते. येणाºया काळात करण्यात येणाºया कामांची माहिती देण्यासह त्यांचे संकल्पही सांगितले. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, सहाय्यक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी आमदार भोळे यांचे स्वागत केले. या वेळी त्यांच्याशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला हा संवाद.... प्रश्न - निवडणुकीदरम्यान विरोधकांनी आरोप केले तरीदेखील आपण शांत राहिलात व विजय खेचून आणला, हे कसे शक्य झाले? उत्तर - आपल्याला कोणी दगड मारला म्हणून त्याला पुन्हा दगड मारण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्या दगडापासून आपले घर कसे बांधावे, याचा विचार व्हावा. मी ‘ईजी अ‍ॅप्रोॅच’ असणारा आमदार असल्याने मी सहज कोणालाही उपलब्ध होतो. त्यामुळे प्रत्येकाला आपल्याबद्दल आपुलकी वाटते. मी सकाळी अनेकांना भेटतो, चहाच्या कट्ट्यावर लोकांसोबत चहा घेतो, कोणाच्याही सुख-दु:खात, धर्म कार्यात, लग्न सोहळ््यात सहभागी होतो. जनतेच्या भावनांचा आदर करीत आल्याने व केवळ निवडणुकीच्या काळात जनतेला न भेटता नेहमी त्यांच्या संपर्कात राहिल्याने मी जनतेला आपला वाटू लागलो व त्यांनी पुन्हा माझ्यावर विश्वास व्यक्त केला. प्रश्न - निवडणुकीत शिवसेनेचे सहकार्य कसे राहिले? उत्तर - हो, शिवसेनेकडून संपूर्ण सहकार्य मिळाले. उलट जिल्ह्यातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शहरातील नेत्यांना जायचे असल्यास त्यांना आपण प्रचारासाठी जाऊ दिले. शिवसेना उमेदवाराचा प्रचार करण्यासह आपल्यालाही सर्वांनी सहकार्य केले. सोबतच आरपीआय व सर्वच मित्रपक्षांचेही योगदान राहिले. प्रश्न - मंत्रीपदाची आशा आहे काय? उत्तर - मी कधी काही मागत नाही. मला पक्षाने, शहराने अगोदरच खूप काही दिले आले. त्यामुळे मंत्रीपदासाठी आपण आग्रह करणार नाही. पक्षाने जी जबाबदारी दिली, ती स्वीकारेल. ही माझी भूमिका सुरुवातीपासून आहे. प्रश्न - महापालिकेच्यावतीने होणाºया कामांना वेळमर्यादा ठरवून देणे आवश्यक आहे ? उत्तर - हो, प्रत्येक कामासाठी वेळ ठरविलेला पाहिजे. मात्र काही तांत्रिक अडचणी असतात, त्यामुळे विलंब होत असतो. कोणाची तक्रार आली म्हणून तेथे गेले पाहिजे, ही पद्धतच बंद करायची असून कोठे काय अडचणी आहे, यासाठी शहरात जावून पाहणी करावी व प्रत्येक काम वेळेत व्हावे, या विषयी सूचना देणार आहे. प्रश्न - पुढील धोरण काय आहे? उत्तर - शहराचा विकास हेच आपले प्रथम प्राधान्य राहणार असून यात या पूर्वीच मोठा निधी आलेला आहे व बहुतांश कामांना मंजुरी मिळाली आहे, ते कामे मार्गी लावणार आहे. आता निवडणूक झाली, राजकारण संपले असून आता केवळ समाजकारण करण्यावर भर राहणार आहे. थोड्याच दिवसात शहरातील रस्त्यांचे चित्र पालटलेले दिसेल. गाळेधारकांचाही प्रश्न मार्गी लावला जाईल. राजकारण न करता विकास करणे हेच ध्येय राहणार आहे. शहरातील प्रत्येकाला विमा काढणार शहरातील प्रत्येक व्यक्तीचा विमा काढण्यात येणार असल्याची घोषणा आमदार भोळे यांनी या वेळी केली. ज्याचे आधार कार्ड असेल अशा पाच ते ७० वर्षे वयोगटातील प्रत्येकाचा विमा काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव