शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
7
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
10
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
11
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
12
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
13
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
14
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
15
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
16
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
18
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
19
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
20
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे ध्येय - आमदार सुरेश भोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 11:55 IST

निवडणुकीतील विजयानंतर ‘लोकमत’च्या दिलेल्या भेटीदरम्यान व्यक्त केला मनोदय

जळगाव : २०१४मध्ये विधानसभा निवडणुकीत मला जनतेने आशीर्वाद देऊन सेवेची संधी दिली. आता पुन्हा माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या बद्दल मी जनतेचा ऋणी असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचेच आपले ध्येय आहे व राहणार अशी ग्वाही नवनियुक्त आमदार सुरेश भोळे यांनी ‘लोकमत’ कार्यालयास दिलेल्या भेटीदरम्यान दिली. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवित दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवड झाल्यानंतर आमदार सुरेश भोळे यांनी शुक्रवार, २५ रोजी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते. येणाºया काळात करण्यात येणाºया कामांची माहिती देण्यासह त्यांचे संकल्पही सांगितले. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, सहाय्यक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी आमदार भोळे यांचे स्वागत केले. या वेळी त्यांच्याशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला हा संवाद.... प्रश्न - निवडणुकीदरम्यान विरोधकांनी आरोप केले तरीदेखील आपण शांत राहिलात व विजय खेचून आणला, हे कसे शक्य झाले? उत्तर - आपल्याला कोणी दगड मारला म्हणून त्याला पुन्हा दगड मारण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्या दगडापासून आपले घर कसे बांधावे, याचा विचार व्हावा. मी ‘ईजी अ‍ॅप्रोॅच’ असणारा आमदार असल्याने मी सहज कोणालाही उपलब्ध होतो. त्यामुळे प्रत्येकाला आपल्याबद्दल आपुलकी वाटते. मी सकाळी अनेकांना भेटतो, चहाच्या कट्ट्यावर लोकांसोबत चहा घेतो, कोणाच्याही सुख-दु:खात, धर्म कार्यात, लग्न सोहळ््यात सहभागी होतो. जनतेच्या भावनांचा आदर करीत आल्याने व केवळ निवडणुकीच्या काळात जनतेला न भेटता नेहमी त्यांच्या संपर्कात राहिल्याने मी जनतेला आपला वाटू लागलो व त्यांनी पुन्हा माझ्यावर विश्वास व्यक्त केला. प्रश्न - निवडणुकीत शिवसेनेचे सहकार्य कसे राहिले? उत्तर - हो, शिवसेनेकडून संपूर्ण सहकार्य मिळाले. उलट जिल्ह्यातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शहरातील नेत्यांना जायचे असल्यास त्यांना आपण प्रचारासाठी जाऊ दिले. शिवसेना उमेदवाराचा प्रचार करण्यासह आपल्यालाही सर्वांनी सहकार्य केले. सोबतच आरपीआय व सर्वच मित्रपक्षांचेही योगदान राहिले. प्रश्न - मंत्रीपदाची आशा आहे काय? उत्तर - मी कधी काही मागत नाही. मला पक्षाने, शहराने अगोदरच खूप काही दिले आले. त्यामुळे मंत्रीपदासाठी आपण आग्रह करणार नाही. पक्षाने जी जबाबदारी दिली, ती स्वीकारेल. ही माझी भूमिका सुरुवातीपासून आहे. प्रश्न - महापालिकेच्यावतीने होणाºया कामांना वेळमर्यादा ठरवून देणे आवश्यक आहे ? उत्तर - हो, प्रत्येक कामासाठी वेळ ठरविलेला पाहिजे. मात्र काही तांत्रिक अडचणी असतात, त्यामुळे विलंब होत असतो. कोणाची तक्रार आली म्हणून तेथे गेले पाहिजे, ही पद्धतच बंद करायची असून कोठे काय अडचणी आहे, यासाठी शहरात जावून पाहणी करावी व प्रत्येक काम वेळेत व्हावे, या विषयी सूचना देणार आहे. प्रश्न - पुढील धोरण काय आहे? उत्तर - शहराचा विकास हेच आपले प्रथम प्राधान्य राहणार असून यात या पूर्वीच मोठा निधी आलेला आहे व बहुतांश कामांना मंजुरी मिळाली आहे, ते कामे मार्गी लावणार आहे. आता निवडणूक झाली, राजकारण संपले असून आता केवळ समाजकारण करण्यावर भर राहणार आहे. थोड्याच दिवसात शहरातील रस्त्यांचे चित्र पालटलेले दिसेल. गाळेधारकांचाही प्रश्न मार्गी लावला जाईल. राजकारण न करता विकास करणे हेच ध्येय राहणार आहे. शहरातील प्रत्येकाला विमा काढणार शहरातील प्रत्येक व्यक्तीचा विमा काढण्यात येणार असल्याची घोषणा आमदार भोळे यांनी या वेळी केली. ज्याचे आधार कार्ड असेल अशा पाच ते ७० वर्षे वयोगटातील प्रत्येकाचा विमा काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव