शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

देह जावो अथवा राहो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:53 IST

महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी पैठण येथे जीवनाविषयी एक तत्त्व सांगितले. ते तत्त्व होते प्रयत्नशीलता, निष्ठा, कोणत्याही परिस्थितीत ...

महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी पैठण येथे जीवनाविषयी एक तत्त्व सांगितले. ते तत्त्व होते प्रयत्नशीलता, निष्ठा, कोणत्याही परिस्थितीत आपले विधी, आचरण, साधना न सोडण्याचे. अखंड साधना, भक्ती, आचरण कशी करावी, ती प्रत्यक्ष आचरणात आणल्यानंतरच तिच्यातल्या अडीअडचणी खाचखळगे लक्षात येतात. मग आपण त्या अडीअडचणींवर कौशल्याने आपल्या ध्येयप्राप्तीच्या निष्ठेने मात करायला शिकले पाहिजे.चक्रधर स्वामींनी वानरीचा दृष्टांत सांगितलावानरी असे, ऐल खांदीवरून पैल खांदी जाएपैल खांदीवरून ऐल खांदी,देखतेया परी हे पडेलपरी धरी ती परी, ते तेचि जाणे न सुटते सूत्र ते तेचि जाणे....वानरी आपल्या पिलाला घेऊन एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाते. त्यावेळी ती खाली पडेल असे आपल्याला वाटते पण ती पडत नाही कारण या फांदीवरून त्या फांदीवर चालतांना खाली न पडण्याचे कौशल्य तिने आधीच आत्मसात केलेले असते. त्याचप्रमाणे साधक हा भौतिक सुख, ऐश्वर्याच्या अधीन झाला की त्याला नरकवास भोगावा लागतो. यासाठी आपली परमेश्वरावरील भावभक्ती, निष्ठा, साधना सुटणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. ती साधना, निष्ठा त्याने प्रयत्नाने संपादन करायला हवी. चक्रधर स्वामींनी हे सूत्र परमेश्वर प्राप्तीच्या ध्येयासाठी सांगितले असले तरी संसार प्रापंचिक जीवनासाठीही ती आहे.आपल्या इच्छित ध्येय प्राप्तीसाठी या सूत्रातून निष्ठा, प्रयत्नवाद व कौशल्याची शिकवण मिळते. उद्दिष्ट प्राप्तीचा अडथळा पार करण्यासाठी हा दृष्टान्त सूत्र निश्चितच आपणास प्रेरणा दायी आहे. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी साधा मुंगळादेखील किती अढळ असतो, हे स्वामींनी त्यांच्या माकोड्याच्या दृष्टांतातून सांगितले आहे. एखाद्या वस्तूला तो लागला म्हणजे तो सोडत नाही त्याचे अर्धे धड तुटले तरी चालेल पण तो त्या वस्तूला चिटकून राहतो. त्याचप्रमाणे साधकाने आचरणाची प्रक्रिया आपल्या निष्ठेने, प्रयत्नाने साध्य करायला हवी व त्याचे पालनही करायला हवे. याविषयी संत तुकाराम महाराज म्हणतात ‘ देह जावो अथवा राहो’ असा साधक असो की प्रपंचातील व्यक्ती त्याला त्याच्या उद्दिष्ट प्राप्तीत निश्चितच यश मिळेल.- वासुदेव चव्हाण, शहापूर, ता.जामनेर

टॅग्स :Jalgaonजळगाव