शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

मान-सन्मान द्या, नाही तर..., राष्ट्रवादीचा भाजपला इशारा, जिथे ताकद वाढेल, तिथे दावा ठोकू

By सुनील पाटील | Updated: March 30, 2024 18:33 IST

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अजित पवार गटाचा जिल्हा मेळावा शनिवारी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात झाला. त्यात अध्यक्षीय भाषणात मंत्री पाटील बोलत होते.

जळगाव : महायुती म्हणून लढत असताना ज्या पक्षाचा उमेदवार आहे, त्यांनी घटक पक्षाला विश्वासात घेतले पाहिजे. जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात भाजपाकडून विश्वासात घेतले जात नसेल तर आम्हीही आमच्या स्टाईलने वागू असा इशारा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी शनिवारी भाजपला दिला. या निवडणुकीच्या माध्यमातूनच पक्ष वाढविण्याची संधी आहे, जेथे आपली ताकद वाढेल तेथे थेट दावा ठोकल्याशिवाय राहणार नाही, मग ती निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्था असो कि विधानसभा. महायुतीचा मेळावा होईल तेव्हा आपल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांचे फोटो असायलाच हवे, नसेल तर तेथे पाय ठेवण्याची आवश्यकता नाही असेही पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अजित पवार गटाचा जिल्हा मेळावा शनिवारी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात झाला. त्यात अध्यक्षीय भाषणात मंत्री पाटील बोलत होते.

मेळाव्याच्या सुरुवातील महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, रावेर मतदार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी दोन्ही मतदारसंघात उमेदवार व भाजपच्या लोकांकडून आपल्याला विश्वासात घेतले जात नाही. मान, सन्मान मिळत नसल्याचे मुद्दे मांडले. त्यावर मंत्री अनिल पाटील यांनी मला मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांचा फोन आला होता. राष्ट्रवादीची ताकद जिल्ह्यात आहे. आम्हाला गृहीत धरायचे नाही. पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मान-सन्मान हवा तोपर्यंत ते काम करणार नाहीत तो त्यांना मिळायलाच हवा असे मी त्यांना सांगितले आहे. त्यावर तीनही पक्षाची जिल्हा व तालुका स्तरावर समन्वय समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खडसे आता कोथडीचे नेते

एकनाथ खडसेंचा आपण नेहमी आदर करतो. पण अलिकडे त्यांनी मी चार महिन्याचा मंत्री असल्याचे म्हटले. मुळात मला आमदारच व्हायचे होते, पण मंत्रीपदाची संधी मिळाली. त्यामुळे चार दिवस अन‌् चार महिने राहिलो तरी समाधानी आहे आणि राहिल. तुम्ही तर राज्याचे नेते होते. तुम्हाला तर राष्ट्रवादीतही कोणी घेत नव्हते. ज्या सभागृहाचे आमदार झाले, त्यात माझेही एक मत होते. इतर आमच्याच आमदारांचेही आहेत. आम्ही मतदान केले नसते तर कोथडीतच पाय चेपत बसले असते, आता तुम्ही कोथडीचेच नेते राहिले अशी टिका अनिल पाटील यांनी केली.