शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांना नागरिकत्व द्या, अन्यथा विधेयक रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 12:44 IST

प्रतिक्रिया : विधेयक भारतीय संविधानाला धरुन योग्य नाही; सर्वत्र अन्यायाच्या भावना

जळगाव : भाजपा सरकार संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडून भारतात वास्तव्यास आलेल्या बांगलादेश, अफगणिस्थान येथील खिश्चन व बौद्ध समुदायाला भारतीय नागरिकत्व देणार आहे. मात्र, या समुदायासोबत मुस्लिम समाजदेखील भारतात आला आहे. त्यामुळे भारताने मुस्लिम समाजालाही भारतीय नागरिकत्व द्यावे, अन्यथा हे विधेयक रद्द करावे, असा सूर मुस्लिम बांधवांनी व्यक्त केला आहे.सोमवारी संसदेत नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले. मुस्लिम समुदायाला भारतीय नागरिकत्व देण्यात येत नसेल, तर हे विधेयक संविधानाला धरुन नसल्याचेही या पदाधिकाऱ्यांनीम्हटले आहे.ही तर फसवणूकहे विधेयक लजास्पद व दु:खद आहे़ ते लोकसभा व राज्यसभेत सादर करणे म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली मान खाली जाणे होय़ हिंदू-मुस्लीम भाई- भाई ही जी आपली संकल्पना आहे, जी परंपरा आहे यामुळे मलिन होणार आहे़ धर्म पाहून नागरिकत्व देणे म्हणजे बोलायचे काही व करायचे काही असा हा प्रकार आहे़ एका समाजाला सोडून तुम्ही देशविकासाची स्वप्ने कशी बघू शकतात़ हे विधेयक म्हणजे केवळ वोट बँक व राजकीय हेतूतून आलेले आहे़ आपली अर्थव्यवस्था सातत्याने ढासळत आहे़ जीडीपी खाली जात आहे़ लाखो युवक बेरोजगार आहे़, कंपन्यां बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, अशा स्थितीत माणसाच्या आयुष्याशी निगडीत मूळ विषयांना डावलून नको त्या दिशेने भरकटवले जात आहे़-मुश्ताक करीमी,मुख्याध्यापक तथा उर्दू साहित्यिकसंसदेत मांडण्यात आलेला नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा संविधानाच्या विरूध्द आहे़ यामुळे मुस्लिम बांधवांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो़ बाहेरील व्यक्तींना प्रवेश व आतील व्यक्तींना रहिवास दाखवावा लागेल तर नागरिकत्व सुधारणा विधेयक हे देशाचे हिताचे नाही़-जाकीर सैय्यद,शिक्षक, डी़वाय़शाह उर्दु हायस्कूलसंसदेमध्ये जे विधेयक मांडले गेले, ते संविधानाला धरुन नाही. संविधानामध्ये सर्वांना समान अधिकार सांगितला आहे. त्यामुळे दुसºया देशातुन आलेल्या नागरिकांना ज्या प्रमाणे भारतीय नागरिकत्व दिले जात आहे. त्याच प्रमाणे इतर देशाातून भारतात आलेल्या मुस्लिम समाज बांधवांनांही भारतीय नागरिकत्व द्यावे. त्यांच्यावर या सरकारने अन्याय करायला नको. त्यानांही भारतीय नागरिकत्व द्यावे, अन्यथा हे विधेयक रद्द करावे.-अकबर काकर,प्रदेश उपाध्यक्ष, काकर समाज महामंच, जळगाव.या विधेयकाला आमचा विरोध नाही. मात्र, दुसºया देशातून भारतात आलेल्या खिश्चन, बौद्ध व इतर समाज बांधवांना हे सरकार भारतीय नागरिकत्व देत असेल तर त्यांच्या सोबत बाहेरील देशातून मुस्लिम समाज बांधवही भारतात आले आहे. त्यानांही भारतीय नागरिकत्व देऊन, त्यांचा सन्मान करण्याची गरज आहे. जर या मुस्लिम बांधवांना भारतीय नागरिकत्व देण्यात येत नसेल, तर हा त्यांच्यावर एक प्रकारे अन्यायचं आहे. त्यामुळे सर्वांना समान न्याया द्यावा, अन्यथा कुणालाही भारतीय नागरिकत्व देऊ नये.-जहाँगीर ए. खान.प्रदेशाध्यक्ष, अल्पसंख्याक सेवा संघटना, जळगाव.नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे आम्ही विरोध करतो़ ही सुधारणा संविधानाच्या विरूध्द तर आहेच, परंतु देशाला तोडणारी सुध्दा आहे़ या विधेयकामुळे मुस्लिम बांधवांना हक्काच्या न्यायापासून वंचित राहण्याची वेळ येईल़-प्रा़ काझी मुजम्मिल नदवी,एच़जे़थीम महाविद्यालय

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव