शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

नदीच्या पुराने घेतला मुलीचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST

अमळनेर : बोरी नदीला पूर आलेला... सात्री गावातून येण्या-जाण्यास नदीवर पूल नाही... अशात या गावातील १३ वर्षांची मुलगी तापाने ...

अमळनेर : बोरी नदीला पूर आलेला... सात्री गावातून येण्या-जाण्यास नदीवर पूल नाही... अशात या गावातील १३ वर्षांची मुलगी तापाने फणफणत होती. ...गावात डॉक्टर नाही... अखेरचा प्रयत्न म्हणून तिला उपचारसाठी बाहेरगावी नेण्यासाठी नदी काठावर आणले... काहीतरी प्रयत्न करू... पण दुर्दैव...! तेथेच नदीकाठी त्या निष्पाप बालिकेचा मृत्यू झाला... आदिवासी आरुषीचा करुण अंत झाल्याने गाव हळहळला.

तालुक्यातील सात्री येथे आरुषी सुरेश भिल (१३) ही मुलगी तापाने आजारी होती. मात्र, बोरी नदीला पूर आलेला. वर्षानुवर्षे हे गाव अशा वेळी पूल नसल्याने जीव धोक्यात घालून नदी ओलांडते. मात्र, मंगळवारी ७ रोजी सकाळी पूर जास्तच असल्याने मुलीला वेळेत दवाखान्यात नेता आले नाही, तर डॉक्टरला गावात आणता आले नाही. ७ रोजी सकाळी मुलीचा ताप वाढला व ती अत्यवस्थ झाल्याने कसे तरी तिला खाटेवर टाकून ट्युबच्या साहाय्याने नदी ओलांडू म्हणून नदी काठावर आले. मात्र, आरुषीचे दुर्दैव आड आले. तिचा झटका येऊन तेथेच मृत्यू झाला. आई-वडिलांनी आक्रोश केला, पण तरीही तिचा मृत्यू झाला की नाही? याची खात्री पटावी, यासाठी चार-पाच लोकांनी मोटारसायकलचे ट्यूब टाकून स्वतःच जीव धोक्यात टाकून बोरी नदी पार केली. मात्र, तिला दवाखान्यात डॉक्टरांनी तपासले असता मृत घोषित केले. केवळ मार्ग बंद झाल्याने या मुलीचा जीव गेला. यामुळे संतापही व्यक्त होत आहे.

गावाचे आठ वर्षांपासून

पुनर्वसन रखडले

सात्री गाव हे निम्न तापी प्रकल्पात आलेले गाव आहे. आठ वर्षांपासून पुनर्वसन रखडले आहे. नदीला पूर आल्यास गावातून बाहेर निघायला जागाच नसते. दोनच दिवसांपूर्वी अप्पर जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी हे नव्या पुनर्वसित गावठाणाला भेट देऊन गेले. त्यावेळी माजी सरपंच महेंद्र बोरसे यांनी गावात व्हायरल तापाचे रुग्ण आहेत व त्यांना दवाखान्यात कसे नेऊ? आम्ही जगावे की मरावे? असा संतप्त सवाल केला होता. मात्र, निगरगट्ट प्रशासनाला जाग आली नाही. गावात डॉक्टर पाठविले नाही किंवा गावात जायला आपत्ती व्यवस्थापनाची बोटही पाठविली नाही. आज एका मुलीचा अंत झाला आहे. आणखी किती बळी प्रशासन घेणार, असा सवाल व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी आदिवासी बांधवांना घरपोच देण्यात येणारी खावटीही त्यांना नदीतून जाऊन डांगरी येथून आणावी लागली होती. याबाबत ‘लोकमत’ ने प्रकाश झोत टाकला होता. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना, तब्बल ७५ वर्षांपासून पूल नाही आणि गावात जायला रस्ता नाही, यापेक्षा विदारक चित्र काय असेल.

(आरुषीचे प्रेत आणले प्रांत कार्यालयात/ वृत्त रिजन अपडेटवर)