शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
4
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
5
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
6
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
7
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
8
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
11
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
12
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
13
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
14
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
15
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
16
"मी पंकज कपूर यांचा मुलगा आहे, पण इंडस्ट्रीत एकटा लढलो", शाहिद कपूर स्पष्टच बोलला
17
हर्षित राणाला गौतम गंभीर इतक्या वेळा संधी का देतो? व्हायरल VIDEO मध्ये सापडलं उत्तर
18
सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?
19
केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार
20
कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ
Daily Top 2Weekly Top 5

नदीच्या पुराने घेतला मुलीचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST

अमळनेर : बोरी नदीला पूर आलेला... सात्री गावातून येण्या-जाण्यास नदीवर पूल नाही... अशात या गावातील १३ वर्षांची मुलगी तापाने ...

अमळनेर : बोरी नदीला पूर आलेला... सात्री गावातून येण्या-जाण्यास नदीवर पूल नाही... अशात या गावातील १३ वर्षांची मुलगी तापाने फणफणत होती. ...गावात डॉक्टर नाही... अखेरचा प्रयत्न म्हणून तिला उपचारसाठी बाहेरगावी नेण्यासाठी नदी काठावर आणले... काहीतरी प्रयत्न करू... पण दुर्दैव...! तेथेच नदीकाठी त्या निष्पाप बालिकेचा मृत्यू झाला... आदिवासी आरुषीचा करुण अंत झाल्याने गाव हळहळला.

तालुक्यातील सात्री येथे आरुषी सुरेश भिल (१३) ही मुलगी तापाने आजारी होती. मात्र, बोरी नदीला पूर आलेला. वर्षानुवर्षे हे गाव अशा वेळी पूल नसल्याने जीव धोक्यात घालून नदी ओलांडते. मात्र, मंगळवारी ७ रोजी सकाळी पूर जास्तच असल्याने मुलीला वेळेत दवाखान्यात नेता आले नाही, तर डॉक्टरला गावात आणता आले नाही. ७ रोजी सकाळी मुलीचा ताप वाढला व ती अत्यवस्थ झाल्याने कसे तरी तिला खाटेवर टाकून ट्युबच्या साहाय्याने नदी ओलांडू म्हणून नदी काठावर आले. मात्र, आरुषीचे दुर्दैव आड आले. तिचा झटका येऊन तेथेच मृत्यू झाला. आई-वडिलांनी आक्रोश केला, पण तरीही तिचा मृत्यू झाला की नाही? याची खात्री पटावी, यासाठी चार-पाच लोकांनी मोटारसायकलचे ट्यूब टाकून स्वतःच जीव धोक्यात टाकून बोरी नदी पार केली. मात्र, तिला दवाखान्यात डॉक्टरांनी तपासले असता मृत घोषित केले. केवळ मार्ग बंद झाल्याने या मुलीचा जीव गेला. यामुळे संतापही व्यक्त होत आहे.

गावाचे आठ वर्षांपासून

पुनर्वसन रखडले

सात्री गाव हे निम्न तापी प्रकल्पात आलेले गाव आहे. आठ वर्षांपासून पुनर्वसन रखडले आहे. नदीला पूर आल्यास गावातून बाहेर निघायला जागाच नसते. दोनच दिवसांपूर्वी अप्पर जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी हे नव्या पुनर्वसित गावठाणाला भेट देऊन गेले. त्यावेळी माजी सरपंच महेंद्र बोरसे यांनी गावात व्हायरल तापाचे रुग्ण आहेत व त्यांना दवाखान्यात कसे नेऊ? आम्ही जगावे की मरावे? असा संतप्त सवाल केला होता. मात्र, निगरगट्ट प्रशासनाला जाग आली नाही. गावात डॉक्टर पाठविले नाही किंवा गावात जायला आपत्ती व्यवस्थापनाची बोटही पाठविली नाही. आज एका मुलीचा अंत झाला आहे. आणखी किती बळी प्रशासन घेणार, असा सवाल व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी आदिवासी बांधवांना घरपोच देण्यात येणारी खावटीही त्यांना नदीतून जाऊन डांगरी येथून आणावी लागली होती. याबाबत ‘लोकमत’ ने प्रकाश झोत टाकला होता. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना, तब्बल ७५ वर्षांपासून पूल नाही आणि गावात जायला रस्ता नाही, यापेक्षा विदारक चित्र काय असेल.

(आरुषीचे प्रेत आणले प्रांत कार्यालयात/ वृत्त रिजन अपडेटवर)