शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

नदीच्या पुराने घेतला मुलीचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST

अमळनेर : बोरी नदीला पूर आलेला... सात्री गावातून येण्या-जाण्यास नदीवर पूल नाही... अशात या गावातील १३ वर्षांची मुलगी तापाने ...

अमळनेर : बोरी नदीला पूर आलेला... सात्री गावातून येण्या-जाण्यास नदीवर पूल नाही... अशात या गावातील १३ वर्षांची मुलगी तापाने फणफणत होती. ...गावात डॉक्टर नाही... अखेरचा प्रयत्न म्हणून तिला उपचारसाठी बाहेरगावी नेण्यासाठी नदी काठावर आणले... काहीतरी प्रयत्न करू... पण दुर्दैव...! तेथेच नदीकाठी त्या निष्पाप बालिकेचा मृत्यू झाला... आदिवासी आरुषीचा करुण अंत झाल्याने गाव हळहळला.

तालुक्यातील सात्री येथे आरुषी सुरेश भिल (१३) ही मुलगी तापाने आजारी होती. मात्र, बोरी नदीला पूर आलेला. वर्षानुवर्षे हे गाव अशा वेळी पूल नसल्याने जीव धोक्यात घालून नदी ओलांडते. मात्र, मंगळवारी ७ रोजी सकाळी पूर जास्तच असल्याने मुलीला वेळेत दवाखान्यात नेता आले नाही, तर डॉक्टरला गावात आणता आले नाही. ७ रोजी सकाळी मुलीचा ताप वाढला व ती अत्यवस्थ झाल्याने कसे तरी तिला खाटेवर टाकून ट्युबच्या साहाय्याने नदी ओलांडू म्हणून नदी काठावर आले. मात्र, आरुषीचे दुर्दैव आड आले. तिचा झटका येऊन तेथेच मृत्यू झाला. आई-वडिलांनी आक्रोश केला, पण तरीही तिचा मृत्यू झाला की नाही? याची खात्री पटावी, यासाठी चार-पाच लोकांनी मोटारसायकलचे ट्यूब टाकून स्वतःच जीव धोक्यात टाकून बोरी नदी पार केली. मात्र, तिला दवाखान्यात डॉक्टरांनी तपासले असता मृत घोषित केले. केवळ मार्ग बंद झाल्याने या मुलीचा जीव गेला. यामुळे संतापही व्यक्त होत आहे.

गावाचे आठ वर्षांपासून

पुनर्वसन रखडले

सात्री गाव हे निम्न तापी प्रकल्पात आलेले गाव आहे. आठ वर्षांपासून पुनर्वसन रखडले आहे. नदीला पूर आल्यास गावातून बाहेर निघायला जागाच नसते. दोनच दिवसांपूर्वी अप्पर जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी हे नव्या पुनर्वसित गावठाणाला भेट देऊन गेले. त्यावेळी माजी सरपंच महेंद्र बोरसे यांनी गावात व्हायरल तापाचे रुग्ण आहेत व त्यांना दवाखान्यात कसे नेऊ? आम्ही जगावे की मरावे? असा संतप्त सवाल केला होता. मात्र, निगरगट्ट प्रशासनाला जाग आली नाही. गावात डॉक्टर पाठविले नाही किंवा गावात जायला आपत्ती व्यवस्थापनाची बोटही पाठविली नाही. आज एका मुलीचा अंत झाला आहे. आणखी किती बळी प्रशासन घेणार, असा सवाल व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी आदिवासी बांधवांना घरपोच देण्यात येणारी खावटीही त्यांना नदीतून जाऊन डांगरी येथून आणावी लागली होती. याबाबत ‘लोकमत’ ने प्रकाश झोत टाकला होता. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना, तब्बल ७५ वर्षांपासून पूल नाही आणि गावात जायला रस्ता नाही, यापेक्षा विदारक चित्र काय असेल.

(आरुषीचे प्रेत आणले प्रांत कार्यालयात/ वृत्त रिजन अपडेटवर)