शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पाय घसरुन नदीत पडल्याने युवतीचा मृत्यू; जामनेर : पुरात वाहून गेलेल्या अन्य दोघांचा शोध सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 16:49 IST

हिवरखेडे बुद्रुक शिवारात तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पालक, खादगाव ग्रामस्थांनी पुलावर एकच गर्दी केली.

- मोहन सारस्वत

लोकमत न्यूज नेटवर्कजामनेर (जि. जळगाव)  : जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस मुक्कामी आहे. पुलावरुन पाय घसरुन कांग नदीत पडल्याने १७ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी जामनेर येथे घडली. दरम्यान, तालुक्यात सोमवारी आलेल्या पुरात दोन जण वाहून गेले आहेत. त्यांचा अजूनही शोध लागलेला नाही. 

 पूनम ज्ञानेश्वर बाविस्कर (१७. रा. खादगाव ता. जामनेर) असे या मृत युवतीचे नाव आहे. ती सकाळी शिकवणीसाठी खादगावहून जामनेरला आली. बसस्टॉप उतरुन ती पायीच शिकवणी वर्गाकडे जात होती.  त्याचवेळी कांग नदीवरील पुलावरुन पाय घसरुन ती पाण्यात बुडाली. 

 हा प्रकार लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तिचा शोध घेतला. हिवरखेडे बुद्रुक शिवारात तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पालक, खादगाव ग्रामस्थांनी पुलावर एकच गर्दी केली.

दरम्यान, जामनेर तालुक्यात सोमवारी आलेल्या पुरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मोहन पंडित सूर्यवंशी (४६, रा. शहापूर ता. जामनेर) आणि केदार पावरा (२४, रा. बोदवड) हे दोन्ही जण वाहून गेले आहेत. त्यांचा दुसऱ्या दिवशीही शोध लागलेला नाही.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणे