ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.30 -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल मंगळवारी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेत मुलींनी आपल्या यशाची परंपरा कायम ठेवत यंदाही मुसंडी मारली आहे. जिल्ह्याचा निकाल 87.62 टक्के निकाला लागला आहे. त्यात मुलींचा 91.72 टक्के तर मुलांचा 84.75 टक्के निकाल लागला आहे.
गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यातून 49 हजार 179 विद्याथ्र्यानी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी 49 हजार 107 विद्याथ्र्यानी परीक्षा दिली. त्यापैकी 43 हजार 27 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. तसेच 28 हजार 938 मुलांनी या परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 28 हजार 896 मुलांनी परीक्षा दिली. त्यात 24 हजार 489 मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर 20 हजार 241 मुलींनी अर्ज भरले होते. त्यापैकी 20 हजार 211 विद्यार्थिंनीनी ही परीक्षा दिली. 18 हजार 538 मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलींचे वर्चस्व पून्हा एकदा सिध्द झाले आहे.
धाकधूक आणि आनंदोत्सव
बारावीच्या निकालाची तारीख जाहीर होतानाच बारावीची परीक्षा दिलेल्या विद्याथ्र्यासोबत पालकवर्गाची देखील धाकधूक वाढली होती. मंगळवारी दुपारी एक वाजता निकाल जाहीर होणार असल्याने शहरातील, सायबर कॅफे व महाविद्यालयाच्या परिसरात विद्याथ्र्यानी गर्दी केली होती. तसेच अनेक विद्यार्थी मोबाईलवर निकाल जाणून घेण्यासाठी उत्सुक दिसून आले. 1 वाजता निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांनी आनंदोत्सव साजरा केला. मोबाईलवरुन अनेकांनी आपल्या नातलगांना फोन करुन निकालाची बातमी देतांना दिसून आले. तर मिठाईच्या दुकानावर देखील पालकवर्गाची चांगलीच गर्दी झाली होती.