शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
4
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
5
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
6
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
7
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
8
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
9
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
10
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
11
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
12
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
13
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
14
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
15
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
16
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
17
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
18
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
19
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
20
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस

गिरीशभाऊ... रखडलेल्या कामांचेही श्रेय घ्या - आयत्या पीठावर रेघोट्या मारल्याची खडसे समर्थकांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 12:32 IST

पोलीस प्रशिक्षण केंद्राला २० वर्षांपूर्वीच मिळाली होती मंजुरी

जळगाव : हतनूर (वरणगाव) ता. भुसावळ येथे राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने स्थापन करण्यास बुधवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. शासनाच्या माहिती कार्यालयामार्फत देखील महाजनांचे श्रेय असल्याच्या उल्लेखाचे वृत्त माध्यमांना देण्यात आले. त्यावरुन खडसे समर्थकांनी मात्र हा श्रेय लाटण्याचा प्रकार असल्याची टीका महाजनांवर केली आहे. यावर भाजपातील सुंदोपसुंदीला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे.२० वर्षांपूर्वीच या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्राला मंजुरी मिळाली होती. खडसे यांच्या पाठपुराव्याने, तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मंजुरी देऊन ७ डिसेंबर १९९८ रोजी वरणगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राचे भुमिपुजनही केले होते.त्यावेळी वरणगाव हे आ. खडसे यांच्या मतदार संघात होते, खडसे यांनी या प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करुन दिली होती.त्यानंतर आघाडीचे सरकार आल्याने निधी मिळू शकला नव्हता. २०१४ मध्ये पुन्हा युतीचे सरकार राज्यात आल्याने खडसे यांनी या पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी निधी व पदेही मंजूर केली होती. केंद्राच्या प्राचार्यपदी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचे नावही निश्चित झाले होते. मध्यंतरी खडसे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.या पोलीस प्रशिक्षण केंद्रालामिळालेली मंजुरी रद्द केली. तरीही खडसे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. दोन महिन्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी राज्य राखीव पोलीस बल गट स्थापण्यास मंजुरी देण्याचे आश्वासन खडसे यांना दिलेले होते.त्यानुसार ही मंजुरी मिळाली असताना गिरीश महाजन यांनी याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत हा प्रकार म्हणजे ‘आयत्या पिठावर रेघोट्या’ असा प्रकार असल्याची टीका खडसे समर्थकांनी केली आहे. याबाबत सोशल मिडियावर मेसेज फिरत असल्याचे दिसून आले.माहिती कार्यालयाच्या बातमीत महाजनांना श्रेयजिल्हा माहिती कार्यालयाने केवळ मंज़ुरी मिळाल्याचे वृत्त माध्यमांना देणे अपेक्षित असताना पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने ही पथक स्थापनेची मंजुरी मिळाली असल्याचा उल्लेख असलेले वृत्त प्रसिद्धीस दिले. त्यामुळे भाजपातील अंतर्गत राजकारणाने माहिती कार्यालयालाही वेठीस धरले गेल्याचे दिसून येत आहे.भाजपात सुंदोपसुंदीजिल्ह्यात भाजपात खडसे व महाजन या दोन गटांमध्ये राजकीय डावपेचही खेळले जात असले तरीही जाहीर कार्यक्रमांमधून सर्व आलबेल असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न होत असतो. मात्र प्रथमच खडसेंच्या मतदार संघातील कामाचे श्रेय महाजनांनी घेतल्याने व खडसे समर्थकांनी त्यावरून महाजनांना सोशल मिडियावर ट्रोल केल्याने भाजपातील सुंदोपसुंदी उघड झाली आहे. याबाबत खडसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते दिल्लीत असल्याने संपर्क होऊ शकला नाही....मग रखडलेल्या कामांचेही श्रेय घ्याजिल्ह्यातील महामार्गांची कामे रखडली आहेत. औरंगाबाद रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. पुण्याला जाणाऱ्या बसेसला तर धुळेमार्गे जाण्याची वेळ आली आहे. या त्रासाचे श्रेयही महाजनांनी घ्यावे. शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण रखडले आहे. महामार्गावर मात्र अपघातांमध्ये नागरिकांचे बळी जात आहेत. तरसोद-फागणे या टप्प्याचे चौपदरीकरण रखडले आहे. जळगाव एमआयडीसीत एकही नवीन उद्योग पाच वर्षात आलेला नाही. आहे ते उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जळगाव शहराचा विकास रखडला आहे. याचेही श्रेय महाजनांनी घ्यावे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव