शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

गिरीशभाऊ... रखडलेल्या कामांचेही श्रेय घ्या - आयत्या पीठावर रेघोट्या मारल्याची खडसे समर्थकांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 12:32 IST

पोलीस प्रशिक्षण केंद्राला २० वर्षांपूर्वीच मिळाली होती मंजुरी

जळगाव : हतनूर (वरणगाव) ता. भुसावळ येथे राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने स्थापन करण्यास बुधवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. शासनाच्या माहिती कार्यालयामार्फत देखील महाजनांचे श्रेय असल्याच्या उल्लेखाचे वृत्त माध्यमांना देण्यात आले. त्यावरुन खडसे समर्थकांनी मात्र हा श्रेय लाटण्याचा प्रकार असल्याची टीका महाजनांवर केली आहे. यावर भाजपातील सुंदोपसुंदीला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे.२० वर्षांपूर्वीच या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्राला मंजुरी मिळाली होती. खडसे यांच्या पाठपुराव्याने, तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मंजुरी देऊन ७ डिसेंबर १९९८ रोजी वरणगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राचे भुमिपुजनही केले होते.त्यावेळी वरणगाव हे आ. खडसे यांच्या मतदार संघात होते, खडसे यांनी या प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करुन दिली होती.त्यानंतर आघाडीचे सरकार आल्याने निधी मिळू शकला नव्हता. २०१४ मध्ये पुन्हा युतीचे सरकार राज्यात आल्याने खडसे यांनी या पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी निधी व पदेही मंजूर केली होती. केंद्राच्या प्राचार्यपदी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचे नावही निश्चित झाले होते. मध्यंतरी खडसे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.या पोलीस प्रशिक्षण केंद्रालामिळालेली मंजुरी रद्द केली. तरीही खडसे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. दोन महिन्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी राज्य राखीव पोलीस बल गट स्थापण्यास मंजुरी देण्याचे आश्वासन खडसे यांना दिलेले होते.त्यानुसार ही मंजुरी मिळाली असताना गिरीश महाजन यांनी याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत हा प्रकार म्हणजे ‘आयत्या पिठावर रेघोट्या’ असा प्रकार असल्याची टीका खडसे समर्थकांनी केली आहे. याबाबत सोशल मिडियावर मेसेज फिरत असल्याचे दिसून आले.माहिती कार्यालयाच्या बातमीत महाजनांना श्रेयजिल्हा माहिती कार्यालयाने केवळ मंज़ुरी मिळाल्याचे वृत्त माध्यमांना देणे अपेक्षित असताना पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने ही पथक स्थापनेची मंजुरी मिळाली असल्याचा उल्लेख असलेले वृत्त प्रसिद्धीस दिले. त्यामुळे भाजपातील अंतर्गत राजकारणाने माहिती कार्यालयालाही वेठीस धरले गेल्याचे दिसून येत आहे.भाजपात सुंदोपसुंदीजिल्ह्यात भाजपात खडसे व महाजन या दोन गटांमध्ये राजकीय डावपेचही खेळले जात असले तरीही जाहीर कार्यक्रमांमधून सर्व आलबेल असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न होत असतो. मात्र प्रथमच खडसेंच्या मतदार संघातील कामाचे श्रेय महाजनांनी घेतल्याने व खडसे समर्थकांनी त्यावरून महाजनांना सोशल मिडियावर ट्रोल केल्याने भाजपातील सुंदोपसुंदी उघड झाली आहे. याबाबत खडसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते दिल्लीत असल्याने संपर्क होऊ शकला नाही....मग रखडलेल्या कामांचेही श्रेय घ्याजिल्ह्यातील महामार्गांची कामे रखडली आहेत. औरंगाबाद रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. पुण्याला जाणाऱ्या बसेसला तर धुळेमार्गे जाण्याची वेळ आली आहे. या त्रासाचे श्रेयही महाजनांनी घ्यावे. शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण रखडले आहे. महामार्गावर मात्र अपघातांमध्ये नागरिकांचे बळी जात आहेत. तरसोद-फागणे या टप्प्याचे चौपदरीकरण रखडले आहे. जळगाव एमआयडीसीत एकही नवीन उद्योग पाच वर्षात आलेला नाही. आहे ते उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जळगाव शहराचा विकास रखडला आहे. याचेही श्रेय महाजनांनी घ्यावे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव