शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

गिरीशभाऊ... रखडलेल्या कामांचेही श्रेय घ्या - आयत्या पीठावर रेघोट्या मारल्याची खडसे समर्थकांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 12:32 IST

पोलीस प्रशिक्षण केंद्राला २० वर्षांपूर्वीच मिळाली होती मंजुरी

जळगाव : हतनूर (वरणगाव) ता. भुसावळ येथे राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने स्थापन करण्यास बुधवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. शासनाच्या माहिती कार्यालयामार्फत देखील महाजनांचे श्रेय असल्याच्या उल्लेखाचे वृत्त माध्यमांना देण्यात आले. त्यावरुन खडसे समर्थकांनी मात्र हा श्रेय लाटण्याचा प्रकार असल्याची टीका महाजनांवर केली आहे. यावर भाजपातील सुंदोपसुंदीला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे.२० वर्षांपूर्वीच या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्राला मंजुरी मिळाली होती. खडसे यांच्या पाठपुराव्याने, तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मंजुरी देऊन ७ डिसेंबर १९९८ रोजी वरणगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राचे भुमिपुजनही केले होते.त्यावेळी वरणगाव हे आ. खडसे यांच्या मतदार संघात होते, खडसे यांनी या प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करुन दिली होती.त्यानंतर आघाडीचे सरकार आल्याने निधी मिळू शकला नव्हता. २०१४ मध्ये पुन्हा युतीचे सरकार राज्यात आल्याने खडसे यांनी या पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी निधी व पदेही मंजूर केली होती. केंद्राच्या प्राचार्यपदी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचे नावही निश्चित झाले होते. मध्यंतरी खडसे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.या पोलीस प्रशिक्षण केंद्रालामिळालेली मंजुरी रद्द केली. तरीही खडसे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. दोन महिन्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी राज्य राखीव पोलीस बल गट स्थापण्यास मंजुरी देण्याचे आश्वासन खडसे यांना दिलेले होते.त्यानुसार ही मंजुरी मिळाली असताना गिरीश महाजन यांनी याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत हा प्रकार म्हणजे ‘आयत्या पिठावर रेघोट्या’ असा प्रकार असल्याची टीका खडसे समर्थकांनी केली आहे. याबाबत सोशल मिडियावर मेसेज फिरत असल्याचे दिसून आले.माहिती कार्यालयाच्या बातमीत महाजनांना श्रेयजिल्हा माहिती कार्यालयाने केवळ मंज़ुरी मिळाल्याचे वृत्त माध्यमांना देणे अपेक्षित असताना पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने ही पथक स्थापनेची मंजुरी मिळाली असल्याचा उल्लेख असलेले वृत्त प्रसिद्धीस दिले. त्यामुळे भाजपातील अंतर्गत राजकारणाने माहिती कार्यालयालाही वेठीस धरले गेल्याचे दिसून येत आहे.भाजपात सुंदोपसुंदीजिल्ह्यात भाजपात खडसे व महाजन या दोन गटांमध्ये राजकीय डावपेचही खेळले जात असले तरीही जाहीर कार्यक्रमांमधून सर्व आलबेल असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न होत असतो. मात्र प्रथमच खडसेंच्या मतदार संघातील कामाचे श्रेय महाजनांनी घेतल्याने व खडसे समर्थकांनी त्यावरून महाजनांना सोशल मिडियावर ट्रोल केल्याने भाजपातील सुंदोपसुंदी उघड झाली आहे. याबाबत खडसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते दिल्लीत असल्याने संपर्क होऊ शकला नाही....मग रखडलेल्या कामांचेही श्रेय घ्याजिल्ह्यातील महामार्गांची कामे रखडली आहेत. औरंगाबाद रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. पुण्याला जाणाऱ्या बसेसला तर धुळेमार्गे जाण्याची वेळ आली आहे. या त्रासाचे श्रेयही महाजनांनी घ्यावे. शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण रखडले आहे. महामार्गावर मात्र अपघातांमध्ये नागरिकांचे बळी जात आहेत. तरसोद-फागणे या टप्प्याचे चौपदरीकरण रखडले आहे. जळगाव एमआयडीसीत एकही नवीन उद्योग पाच वर्षात आलेला नाही. आहे ते उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जळगाव शहराचा विकास रखडला आहे. याचेही श्रेय महाजनांनी घ्यावे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव