शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

गिरीश महाजन यांनी जनतेला गृहीत धरू नये - दिलीप वळसे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 13:04 IST

मुख्यमंत्रीपदासाठी सेनेलाही दावा करण्याचा अधिकार

जळगाव : भाजप-सेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरून दावे-प्रतिदावे सुरू असताना हा वाद भाजप-सेनेतील अंतर्गत बाब असून सेनेलाही या पदावर दावा करण्याचा अधिकार आहे. कदाचित अडीच-अडीचवर्ष ते हे पद वाटूनही घेतील. मात्र त्यासाठी पुन्हा सत्तेत येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्टÑवादीचे जिल्हा प्रभारी तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. गिरीश महाजन यांनी जनतेला गृहित धरु नये, असा टोला त्यांनी मारला.विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ११ मतदार संघातून राष्टÑवादीकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतींसाठी बुधवार, २४ जुलै रोजी ते जळगावात आले होते. याप्रसंगी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी हे मत व्यक्त केले.गिरीश महाजनांनी जनतेला गृहित धरू नयेगिरीश महाजन यांनी जिल्ह्यात काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीला भुईसपाट करू असे विधान केले आहे. नियोजन समितीच्या बैठकीत राष्टÑवादीचे माजी जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील यांच्याशी त्यांची या विषयावरून शाब्दिक चकमकही झाली. याबाबत विचारणा केली असता वळसे पाटील म्हणाले की, जनतेला गृहित धरून चालत नाही. जनता-जनार्दनच सर्वकाही आहे. जनता काहीही करू शकते. तसेच लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुकीत फरक आहे. विधानसभेसाठीचे प्रश्न वेगळे आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. कर्जमाफी झालेली नाही. त्याचे पडसाद मतदानातून निश्चित उमटतील.पक्षातील नेत्यांच्यामते लोकसभा निवडणुकीतील भाजपचा विजय संशयास्पद आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवरच विधानसभा निवडणुक घेण्याची मागणी केली जात आहे. मात्र निवडणूक आयोग दखल घ्यायला तयार नाही. त्याचा पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल का? असे विचारले असता वळसे पाटील म्हणाले की, लोकसभेच्यावेळी देशात लोकमत हे सरकारविरोधी होते. लोकांनी मत देऊन निवडून देण्याआधीच सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांकडून आधीच किती जागा मिळतील? याचा आकडा जहीर झाला. म्हणून सर्वत्र संशयाचे वातावरण आहे. त्यामुळेच देशात व राज्यातही निवडणुका पारदर्शकपणे होण्यासाठी बॅलेटपेपरवरच मतदान घेण्याची मागणी आहे. पक्षही त्यासाठी आग्रही आहे. मात्र जरी निवडणूक आयोगाने मागणी मान्य केली नाही, तरी कार्यकर्ते मागील निवडणुकीपेक्षा अधिक जागृत झालेले आहेत. त्यामुळे ते सर्व परिस्थितीला तोंड द्यायला सज्ज आहेत.जिल्ह्यात उत्साही वातावरणआधी पालिका, मनपा व नंतर लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर जिल्ह्यातील पक्षासाठीचे वातावरण कसे आहे? याबाबत विचारणा केली असता वळसे पाटील म्हणाले की, जिल्ह्यात उत्साह आहे. कार्यकर्ता खचलेला नाही. लढाई करण्याची त्याची तयारी आहे. परिस्थितीशी सामना करण्याची तयारी आहे.मतदारसंघांची अदलाबदल शक्यआघाडी होण्यापूर्वीच राष्टÑवादीकडून सर्वच मतदारसंघांमधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत असल्याबद्दल विचारणा केली असता वळसे पाटील म्हणाले की, पक्षाने इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. त्यात सर्वच मतदार संघातून ५६ इच्छुकांचे अर्ज आले. त्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रदेशस्तरावरील कोअर कमिटीकडे याबाबतचा निर्णय सोपविला जाईल. मात्र काँग्रेस व मित्रपक्षांशी आघाडीबाबत चर्चा सुरू असून आघाडी झाल्यास मतदार संघांची अदलाबदलही होऊ शकते, असे सांगितले.आघाडीबाबतचा निर्णय पक्षाची कमिटी घेणारस्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्टÑवादीने मनसे, वंचितला सोबत घेतले तरच आघाडीसोबत येणार असल्याचे विधान केले असल्याबाबत विचारणा केली असता वळसेपाटील म्हणाले की, आघाडीबाबत मित्रपक्षांशी चर्चा सुरू आहे. पक्षाने त्यासाठी कमिटी केली असून त्यावर मत व्यक्त करणे योग्य होणार नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव