शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

गिरीश महाजन यांनी जनतेला गृहीत धरू नये - दिलीप वळसे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 13:04 IST

मुख्यमंत्रीपदासाठी सेनेलाही दावा करण्याचा अधिकार

जळगाव : भाजप-सेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरून दावे-प्रतिदावे सुरू असताना हा वाद भाजप-सेनेतील अंतर्गत बाब असून सेनेलाही या पदावर दावा करण्याचा अधिकार आहे. कदाचित अडीच-अडीचवर्ष ते हे पद वाटूनही घेतील. मात्र त्यासाठी पुन्हा सत्तेत येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्टÑवादीचे जिल्हा प्रभारी तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. गिरीश महाजन यांनी जनतेला गृहित धरु नये, असा टोला त्यांनी मारला.विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ११ मतदार संघातून राष्टÑवादीकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतींसाठी बुधवार, २४ जुलै रोजी ते जळगावात आले होते. याप्रसंगी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी हे मत व्यक्त केले.गिरीश महाजनांनी जनतेला गृहित धरू नयेगिरीश महाजन यांनी जिल्ह्यात काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीला भुईसपाट करू असे विधान केले आहे. नियोजन समितीच्या बैठकीत राष्टÑवादीचे माजी जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील यांच्याशी त्यांची या विषयावरून शाब्दिक चकमकही झाली. याबाबत विचारणा केली असता वळसे पाटील म्हणाले की, जनतेला गृहित धरून चालत नाही. जनता-जनार्दनच सर्वकाही आहे. जनता काहीही करू शकते. तसेच लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुकीत फरक आहे. विधानसभेसाठीचे प्रश्न वेगळे आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. कर्जमाफी झालेली नाही. त्याचे पडसाद मतदानातून निश्चित उमटतील.पक्षातील नेत्यांच्यामते लोकसभा निवडणुकीतील भाजपचा विजय संशयास्पद आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवरच विधानसभा निवडणुक घेण्याची मागणी केली जात आहे. मात्र निवडणूक आयोग दखल घ्यायला तयार नाही. त्याचा पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल का? असे विचारले असता वळसे पाटील म्हणाले की, लोकसभेच्यावेळी देशात लोकमत हे सरकारविरोधी होते. लोकांनी मत देऊन निवडून देण्याआधीच सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांकडून आधीच किती जागा मिळतील? याचा आकडा जहीर झाला. म्हणून सर्वत्र संशयाचे वातावरण आहे. त्यामुळेच देशात व राज्यातही निवडणुका पारदर्शकपणे होण्यासाठी बॅलेटपेपरवरच मतदान घेण्याची मागणी आहे. पक्षही त्यासाठी आग्रही आहे. मात्र जरी निवडणूक आयोगाने मागणी मान्य केली नाही, तरी कार्यकर्ते मागील निवडणुकीपेक्षा अधिक जागृत झालेले आहेत. त्यामुळे ते सर्व परिस्थितीला तोंड द्यायला सज्ज आहेत.जिल्ह्यात उत्साही वातावरणआधी पालिका, मनपा व नंतर लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर जिल्ह्यातील पक्षासाठीचे वातावरण कसे आहे? याबाबत विचारणा केली असता वळसे पाटील म्हणाले की, जिल्ह्यात उत्साह आहे. कार्यकर्ता खचलेला नाही. लढाई करण्याची त्याची तयारी आहे. परिस्थितीशी सामना करण्याची तयारी आहे.मतदारसंघांची अदलाबदल शक्यआघाडी होण्यापूर्वीच राष्टÑवादीकडून सर्वच मतदारसंघांमधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत असल्याबद्दल विचारणा केली असता वळसे पाटील म्हणाले की, पक्षाने इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. त्यात सर्वच मतदार संघातून ५६ इच्छुकांचे अर्ज आले. त्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रदेशस्तरावरील कोअर कमिटीकडे याबाबतचा निर्णय सोपविला जाईल. मात्र काँग्रेस व मित्रपक्षांशी आघाडीबाबत चर्चा सुरू असून आघाडी झाल्यास मतदार संघांची अदलाबदलही होऊ शकते, असे सांगितले.आघाडीबाबतचा निर्णय पक्षाची कमिटी घेणारस्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्टÑवादीने मनसे, वंचितला सोबत घेतले तरच आघाडीसोबत येणार असल्याचे विधान केले असल्याबाबत विचारणा केली असता वळसेपाटील म्हणाले की, आघाडीबाबत मित्रपक्षांशी चर्चा सुरू आहे. पक्षाने त्यासाठी कमिटी केली असून त्यावर मत व्यक्त करणे योग्य होणार नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव