शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

उत्तर महाराष्ट्रातील ४७ पैकी ४० जागांवर भाजपचा विजय निश्चित - गिरीश महाजन यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 22:52 IST

जळगाव जिल्ह्यातील सर्व ११ जागा जिंकणार

जळगाव : लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील याचा आपण वर्तविलेला अंदाज खरा ठरला. आता विधानसभा निवडणुकीमध्येही उत्तर महाराष्ट्रातील ४७ पैकी ४० जागा हमखास भाजपला मिळतील असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी जळगावात केला. या सोबतच जळगाव जिल्ह्यातील सर्व अकराच्या अकरा जागांवर भाजपच विजय मिळवेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र एकीकडे युती होईल असे सांगितले जात असताना भाजपच्या संघटन बैठकीत मात्र सर्व जागांवर दावा केल्याने शिवसेनेच्या वाट्याला काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा भाजपच्यावतीने बुधवारी जळगाव लोकसभा मतदारसंघातील शक्तीकेंद्र प्रमुखांची संघटनात्मक बैठक जळगावात झाली. त्या वेळी त्यांनी हा दावा केला. या बैठकीला गिरीश महाजन यांच्यासह माजी मंत्री एकनाथराव खडसे, प्रदेश भाजप संघटन मंत्री विजयराव पुराणिक आदी उपस्थित होते. निवडणुकीच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात येऊन शक्तीकेंद्र प्रमुखांना मार्गदर्शन करण्यात आले. त्या वेळी लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या मोठ्या यशाचा उहापोह करण्यात येऊन लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीची गणिते वेगळी असतात, त्यामुळे गाफील न राहता सावधगिरीने कामे करा असा सल्ला या वेळी देण्यात आला. हा सल्ला दिला जात असताना गिरीश महाजन यांनी विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपला हमखास यश मिळण्याचा दावा केला. यात त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी सांगितलेल्या अंदाजाची आठवण करून देत विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात काय चित्र राहणार आहे, हे स्पष्ट केले. यात उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील ४७ पैकी ४० जागांवर भाजप विजय मिळवेल. यात १५ दिवसांनंतर आणखी ‘परफेक्ट’ आकडा मी सांगतो, असेही त्यांनी नमूद केले. यात जळगाव जिल्ह्यातील तर सर्व ११ जागा भाजपलाच मिळतील, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव