शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा

By admin | Updated: June 1, 2017 12:35 IST

शेतक:यांची सरकारी धोरणांबाबत तीव्र नाराजी : कोरडवाहू, बागायती शेतकरी अडचणीत

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.1-  देशात इतर कुणावर झाला नाही एवढा अन्याय सातत्याने शेतक:यांवर झाला. शेतमाल घरात आल्यानंतर दर पडतात. कुठले पीक पेरावे, लागवड करावी, असा संभ्रम सततच्या नुकसानीने निर्माण झाला. शेती नुकसानीत आहे. अशा स्थितीत शेतक:यांना जगावेसे वाटत नाही. शेतकरी निद्रीस्त नाही. तो शेतमालास उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर मिळत नसल्याने व सरकार लक्ष देत नसल्याने पुरता अडचणीत आला आहे. जो व्यवसाय करतो त्यात काही टक्के नफा हवा असतो. पण शेतीत सातत्याने नुकसानच होते. आता शेतक:यासमोर संपावर जाण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे मत विविध संघटना, संस्थांच्या शेतकरी प्रतिनिधींनी ‘लोकमत’तर्फे आयोजित चर्चासत्रात व्यक्त केले. 
1 जूनपासून शेतकरी संपावर जात आहे. या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर लोकमत शहर कार्यालयात चर्चासत्र झाले. त्यात किसान क्रांती शेतकरी कृती समितीचे राज्य समन्वयक एस.बी.पाटील,  कृषितज्ज्ञ वसंतराव महाजन, जगन्नाथ धनसिंग पाटील,  किशोर चौधरी, डॉ.राधेश्याम चौधरी, जगतराव बारकू पाटील, देवराम पाटील,   किसान सभेचे अमृतराव महाजन,  संजय नारायण चौधरी, अजित  पाटील, राजेश चिरमाडे, संजीव जे.बाविस्कर, सचिन प्रभाकर पवार, विवेक रणदिवे हे सहभागी झाले. 
माधव भंडारींचा निषेध
शेतकरी संपाने काहीही फरक पडत नाही असे भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगून शेतक:यांच्या जखमांवर मीठ टाकण्याचे काम केले आहे. शेतक:यांचा अनादर केला म्हणून माधव भंडारी यांचा या चर्चासत्रात शेतक:यांनी निषेध केला. 
शेतक:यांचा सातबारा कोरा करा
राज्य शासनाच्या हातात शेतक:यांना कजर्माफी व विजबिल माफी हे निर्णय आहेत. हे निर्णय तातडीने सरकारने जाहीर करावेत. कांदा, धान्य, कापूस आयात निर्यात यासह खतांवरील अनुदान घटविणे, शेतमालाच्या आधारभूत किमतीत वाढ करणे याच्या धोरणांवरील निर्णय केंद्राने शेतक:यांसाठी सकारात्मक पद्धतीने घ्यावेत.