शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

परवानगी घ्या.. होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी जिल्हा प्रशासनाने घालून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेले नियम कायम आहेत. त्यातच गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे लग्नसमारंभाच्या वऱ्हाडींच्या संख्येवर मोठा परिणाम झाला आहे. त्यात परवानगीचा फार्स असल्याने वधू-वर पित्यांना परवानगी आणि अटींचे अग्निदिव्य पार पाडावे लागत आहे. तसेच भविष्यात कोरोनाची तिसरी लाटदेखील येण्याची शक्यता असल्याने आता मिळेल त्या मुहूर्तावर लग्न उरकावण्याची तयारी वधू-वर पित्यांनी केली आहे.

या आहेत अटी

आता लग्न समारंभासाठी कोरोनाच्या कडक निर्बंध काळात केवळ २५ जणांना परवानगी देण्यात आली होती. यामध्ये काहीअंशी शिथिलता आणून, लग्नाकरिता ५० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. एकाच हॉलमध्ये २ तासात लग्न समारंभ आयोजित करता येऊ शकतो. लग्न समारंभात नियमांचं उल्लंघन केल्यास ५० हजार दंड ठोठावण्यात येईल. तसेच मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालनदेखील पाडणे गरजेचे आहे.

परवानगीसाठी अग्निदिव्य

-लग्न कार्यासाठी बुकिंग केलेल्या मंगल कार्यालयाचा अर्ज घेऊन, मनपाच्या प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांकडे हा अर्ज दाखविण्यात येतो. सोबतच वधू व वराचे आधारकार्ड जोडून महापालिकेने दिलेले अर्ज भरून घ्यावा लागतो.

-महानगरपालिकेची परवानगी मिळाल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात अर्ज करावा लागतो. तिथेही मनपात दिलेली सर्व कागदपत्रे जोडावी लागतात. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वर,वधू येणार असतील त्या पोलीस ठाण्याचीही ना हरकत घ्यावी लागते.

-परवानगीसाठी अनेक कार्यालयांची पायपीट करावी लागते म्हणून, मनपाने परवानगीसाठी एक खिडकी योजना अंमलात आणण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

शुभमुहुर्त

जुलै महिन्यात एकूण १० मुहूर्त असून, या मुहूर्तांवर बार उडविण्याची तयारी वधू-वर पित्यांनी केली आहे. १, २,३,१३,१८,२२,२५,२६,२८,२९ जुलै या तारखांना लग्नांचा मुहूर्त चांगला आहे.

कोट...

आपल्याकडे एक म्हण असते, ‘लग्न बघावे करून’ या म्हणीचा प्रत्यय लग्न करणाऱ्या पित्यालाच येत असतो. त्यात कोरोना काळात परवानगीसाठी ज्या प्रकारे एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयाकडे जावे लागते, त्यापेक्षा घरातल्या घरातच लग्न करणे परवडते.

-शोभा चौधरी, वराची आई

गेल्यावर्षीच मुलाचे लग्न ठरले होते. काही दिवसात कोरोनाची तीव्रता कमी होईल व परवानगींचा फार्स राहणार नाही असे वाटले होते. त्यामुळे तेव्हा लग्न थांबविले. मात्र, पुन्हा निर्बंध असल्याने मुहूर्त थांबवू शकत नाही. त्यामुळे परवानगी घेऊनच लग्न कार्य उरकवण्यावर भर आहे.

-रमेश पाटील, वरपिता