शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
3
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
4
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
5
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
6
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
7
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
8
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
9
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
10
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
11
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
12
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
13
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
14
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
15
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
16
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
17
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
18
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
19
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
20
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात लवकरच जेनेरिक औषधीची अंमलबजावणी : केंदीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर

By admin | Updated: April 30, 2017 18:11 IST

शेतक:यांचा उत्पादन खर्च कमी करण्यावर भर. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण शून्य टक्क्यांवर आणणार

 जळगाव,दि.30- जेनेरिक औषधी ब्रॅण्डेड कंपन्यांच्या औषधीच्या तुलनेत केवळ 10 ते 20 टक्क्यातच मिळत असल्याने ती सर्वसामान्यांना परवडणारी आहे. सोबतच परिणामकारकही असल्याने ही औषधी वापराची  देशभरात सर्वत्र लवकरच अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

 डॉक्टरांनी जेनेरिक औषधीच लिहून द्यावी व त्यासाठी सरकार कडक नियम करणार असल्याचे गेल्या आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. त्या संदर्भात अहिर यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले जेनेरिक औषधी वापराकडे कल वाढत असून त्या स्वस्तदेखील असल्याने गरीबांना कमी दरात उपचार मिळू शकतात. त्यामुळे याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. राज्यांनीही याचा स्वीकार करावा, असेही ते म्हणाले. 
रखडलेल्या प्रकल्पांना मदत करणार
सिंचन योजनेबाबत बोलताना अहिर म्हणाले की, वाढत्या सिंचनामुळे रब्बीचे उत्पन्न चांगले आले असून यंदा हंगाम दुप्पट येणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आणखी सिंचनक्षेत्र वाढण्यासाठी रखडलेल्या प्रकल्पांनाही मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 
शेतक:यांचे उत्पादन खर्च कमी करणार
शेती मालाला हमी भाव मिळण्याविषयी बोलताना अहिर म्हणाले की, शेतक:यांचा उत्पादन खर्च कमी करण्यावर सरकारचा भर आहे. त्यासाठी खताचे भाव कमी करण्यात आले आहे. उत्पादन खर्च कमी झाल्यास शेतक:यांना सहज परवडू शकते असे सांगून ते म्हणाले हमी भाव देऊन ग्राहकांनाही खरेदीसाठी ते परवडले पाहिजे. या सर्वाचा समतोल साधण्यासाठी उत्पादन खर्च कमी करणे हा उत्तम पर्याय असल्याने सरकारचा  त्यावरच भर असल्याचे ते म्हणाले. शेतक:यांनी शेळी पालन, कुक्कुट पालन,मधमाशी पालन या सारख्या पूरक व्यवसायावरही भर देण्याचे आवाहन केले. 
तुरीवरून केवळ राजकारण
तूर खरेदीबाबत विरोधक  केवळ राजकारण करीत आहे.  आम्ही लाखो क्विंटल तूर खरेदी केली असून त्यांनी कधी एक लाख क्विंटल तरी तूर खरेदी केली का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कापसाला आम्ही वाढीव भाव दिल्याचा दावा त्यांनी केला. 
शेतक:यांचे आत्महत्यांचे प्रमाण शून्य टक्क्यावर आणणार
सरकारच्या धोरणामुळे शेतक:यांचे आत्महत्यांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा करीत हंसराज अहिर म्हणाले की, हे प्रमाण शून्य टक्क्यावर आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहे.