शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

राज्य शासनाने जळगाव मनपाच्या माथी मारलेले सहा रस्ते महासभेने नाकारले

By admin | Updated: April 29, 2017 17:14 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यांच्या मालकीतच बदल करून ते रस्ते जळगाव मनपाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला होता.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 29 -  राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या दारू दुकानांसंदर्भातील आदेशाला बगल देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यांच्या मालकीतच बदल करून ते रस्ते जळगाव मनपाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याने शनिवारी झालेल्या मनपाच्या महासभेत हे रस्ते नाकारत ते शासनाने ताब्यात घ्यावेत तसेच त्यांचा विकासही करावा, असा ठराव सत्ताधारी खान्देश विकास आघाडीच्या 2 व राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक सदस्याचा विरोध वगळता बहुमताने करण्यात आला. एक नगरसेवक तटस्थ राहिले. विशेष म्हणजे आमदार सुरेश भोळे यांनीच रस्ते हस्तांतरणासाठी पुढाकार घेतल्याचे उघड झालेले असताना पक्षावरील टीका थांबविण्यासाठी भाजपानेही या निर्णयात खाविआ, मनसे, राष्ट्रवादीला साथ दिली. महापौरांनी हा विषय मांडत प्रत्येक सदस्याने या विषयाच्या विरोधात अथवा बाजूने आपले मत व्यक्त करावे, असे आवाहन केले. त्यात माजी महापौर व खाविआचे नगरसेवक विष्णू भंगाळे, अजय चुडामण पाटील व राष्ट्रवादीच्या शालिनी काळे यांनी या विषयाला विरोध करीत विरोधात मत नोंदविले. तर महानगर विकास आघाडीचे नरेंद्र पाटील हे तटस्थ राहिले. त्यामुळे बहुमताने हे सहा रस्ते मनपाने नाकारत राज्य शासनाला परत करण्याचा ठराव मंजूर केला. दरम्यान, राज्य शासनाने केलेल्या रस्ते हस्तांतरणाच्या विरोधात काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने राज्य शासनाला फटकारले आहे. तसेच डॉ.चौधरी यांनी 28 रोजी स्वाक्षरी मोहिम राबविली होती. त्यात 10 हजार नागरिकांनी रस्त्यांच्या हस्तांतरणास तीव्र विरोध केला होता. या जनमताचा आदर करीत महासभेत हा ठराव करण्यात आला. काय आहे प्रकरण?सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून 500 मीटर अंतरावरील दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतल्याने मनपा हद्दीतील राज्य शासनाच्या मालकीच्या सहा रस्त्यांची मालकी बदलासाठी ‘लिकर’ लॉबी सक्रीय झाली होती. आमदार सुरेश भोळे यांनी त्यासाठी पुढाकार घेत शासनाला पत्रही दिले होते. त्यासाठी 2001 मध्ये तत्कालीन नगरपालिकेने केलेल्या ठरावाचा आधार घेण्यात आला होता. त्यानुसार शासनाने या सहा रस्त्यांच्या मालकीत बदल करून मनपाकडे सोपविण्याचा एकतर्फी घेतला होता. त्याविरोधात जळगावात तीव्र संताप व्यक्त होत होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे 21 एप्रिल रोजी जिल्हा दौ:यावर आले असता नगरसेवकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याचवेळी त्यांनी शासनाचा हा निर्णय रद्द करण्याची प्रक्रिया सुरु केल्याचे जाहीर केले होते व मनपानेही आपला निर्णय कळवावा, असे आवाहन केले होते.