शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

गीतरामायण हे जीवनात धैर्य निर्माण करणारे - कवी आनंद माडगूळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 22:30 IST

‘गदिमां’ची प्रतिमा रसिकांच्या मनात ठासून

जळगाव : गदिमा लिखित गीतरामायण हे मानवी जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर उपाय शोधणारे तसेच संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य निर्माण करणारे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर यांचे चिरंजीव कवी व गायक आनंद माडगूळकर यांनी केले.रविवारी सायंकाळी शहरात आयोजित अग्निहोत्र कार्यक्रमासाठी ते शहरात आले होते. कार्यक्रमानंतर ‘लोकमत’ ने त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याशी झालेला हा प्रश्नोत्तररुपी संवादप्रश्न : गीतरामायणाच्या प्रयोगांना कधी सुरुवात केलीत?उत्तर : गदिमांचे निधन झाल्यानंतर सन १९८२ पासून अव्याहतपणे त्यांचे कार्य पुढे चालवीत आहे. समग्र जीवन यासाठीच समर्पित असून आतापर्यंत गीतरामायणाचे एक हजार प्रयोग सादर केले आहेत.प्रश्न : आताच्या तरुण पिढीने गदिमांना पाहिले नाही. मात्र ते आपल्या कार्याच्या रूपाने त्यांना अनुभवतात, काय सांगाल ?उत्तर : गदिमांनी श्रीरामांचे जीवन गीतरामायणाच्या माध्यमातून तळागाळातल्या माणसापर्यंत पोहचविले. म्हणूच त्यांची प्रतिमा मराठी रसिकांच्या मनात आजही ठासून भरलेली आहे. गदिमांचे कार्य तरुणांना आदर्श घेण्यासारखे निश्चित आहे.प्रश्न : पुण्यात गदिमांचे स्मारक उभारण्याबाबत ठोस भूमिका घेतली जात नाही, याबाबत आपले मत काय?उत्तर : कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर आले, तरीदेखील याबाबतचा निर्णय प्रलंबित राहत आहे. केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आश्वासने दिली जातात. याची खंत वाटते. हा निर्णय लवकर व्हावा. याबरोबरच अवघ्या महाराष्ट्रातील रसिकांच्या मनात गदिमांचा जागा कायम आहे. केवळ स्मारकापुरते ते मर्यादित अथवा संकुचित नाहीत, हेही आवर्जून सांगावेसे वाटते.प्रश्न : सामान्य माणसासाठी गदिमांना सोप्या भाषेत कसे समजवाल?उत्तर : गदिमा म्हणजे देशभरातील उन्नत अशा काव्यविचारांना एकत्र करून एक सर्वसामान्यांना पचेल व रुचेल असे काव्यरसायन. सामान्यांच्या भाषेत समजावणारा कवी. रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा मराठीतील वाल्मिकी. स्वत: ऋषितुल्य जीवन जगून समाजापुढे श्रीरामांचे आदर्श जीवन उलगडणारे अद्भुत असे रसायन म्हणजे गदिमा होत.प्रश्न : गीतरामायणातून आजच्या तरुण पिढीने काय आदर्श घ्यावा?उत्तर : गदिमांनी गीतरामायणातून श्रीरामांच्या अनेक गुणांचे वर्णन केले आहे. बाल्य, तरुण, प्रौढ, यौद्धा, कोमलहृदयी पण तितकाच कठोर अशी अनेकविध गुणदर्शने आहेत. आजच्या तरुणांनी प्रभू रामचंद्रांच्या आदर्श जीवनातला एक जरी गुण अंगीकारून सातत्याने त्याचे आचरण केले तरीदेखील तरुण नैराश्येतून मुक्त होतील, याची मला खात्री आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव