शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

हजारो नैसर्गिक प्रसूती करणाऱ्या वाकोदच्या गीताबाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:11 IST

हजारो प्रसूती

अर्पण लोढा,वाकोद, ता. जामनेर - अशिक्षीत असूनही एखाद्या प्रशिक्षित डॉक्टराप्रमाणे ग्रामीण भागातील महिलांची प्रसूती (बाळंतपण) करून प्रसंगी त्यांची काळजी घेणारी सुईन अर्थात दायी आज इतिहासात जमा झालेली आहे.‘शंभरात ऐन्शी सिझर’ होत असतांना ३५ वर्षात जवळपास हजारो नैसर्गिक प्रसूती करुन वाकोद येथील गीताबाई सपकाळे यांनी परिसरात बाळ व बाळंतिणींची नि:स्वार्थी मनाने त्यांनी सेवा करत सदैव आरोग्य सेवेचे व्रत जपले आहे. गीताबाईंनी तपासणी केली आणि बाळंतपणाची वेळ दिली तर त्यात अगदी तासाभराचाही फरक पडत नसायचा. असं तंतोतंत निदान त्या करीत. म्हणून परिसरातील महिलांच्या प्रसूतीसाठी त्या चांगल्याच प्रसिद्ध झोतात आल्या. विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या सर्व प्रसुतीतील बाळ-बाळांतीण सुखरुप झाले आहेत. प्रसूती काळ म्हणजे महिलांच्या आयुष्यातील पुनर्जन्मच असतो. त्यांनी कधी कुणाच्याही मदतीची अपेक्षा केली नाही.आतापर्यंत त्यांनी चार हजाराच्या वर सर्व जाती-धर्मातील स्त्रियांचे सुखरूप बाळंतपण केले आहे. गीताबाई यांनी पंचक्रोशीत केलेले अनोखे कार्य कौतुकास्पद आहे.मुंबईत सनी आणि बॉबी देओलची देखभालघरची परिस्थिती हलाकीची असताना यापूर्वी गीताबाई सपकाळे उदरनिवार्हासाठी मुंबईत त्या जवळपास २०-२२ वर्ष वास्तव्यात होत्या. त्यावेळी गीताबाई यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांच्या परिवारात मुंबई येथे गीताबाई सपकाळे यांनी तीन - चार वर्ष काम केले आहे. ज्या वेळी गीताबाई या धर्मेंद्र यांच्या कड़े काम करीत होत्या त्या वेळी सनी आणि बॉबी देओल अगदी लहान होते. या दोघांच्या आंघोळी पासून ते खाण्या पिण्या पर्यंत सर्व काम गीताबाईच पाहत होत्या.आज गीताबाई वाकोदला आपले आयुष्य घालवत असल्या तरी तत्कालीन आठवणीची तिजोरी आपल्या अंतकरणात जशाच्या तशा तेवत ठेवलेल्या आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या यांच्याशी देखील तेथे गीताबाईं यांची भेट झाली आहे.वाकोद व पंचक्रोशीत अल्पावधीतच दाई म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या व कुटुंबाची परिस्थिती बिकट असल्याने कोणतेच शिक्षण न घेतलेल्या तसेच अशिक्षित गीताबाईंच्या कविता, ओव्या चांगल्या शिकलेल्यांना देखील लजवणाऱ्या आहेत.गीताबाई यांना आपल्या गावा बद्दल मोठी कळकळ आहे. त्या सलग १० वर्ष वाकोद गृप ग्रा.पं. च्या सदस्यदेखील राहीलेल्या आहेत. जैन उद्योग समूहाचे संस्थापक भवरलाल जैन यांनी वाकोद गावासाठी केलेले काम पाहता वाकोद येथे झालेल्या ग्रामसभेतील विकासा वरील खालील कविता चांगलीच प्रसिद्ध झोतात आली होतीआलो फेडाया जन्मभूमीचं मी ऋणआई-बापाच्या लाभत्या पुण्यानंवाकोदचा विकास केलादारोदारी रोड भिडविलेबिन काठीचा आंधळा चालेनही लचक भरणार कमरालेसारं गाव चालतं आनंदानंआई-बापाच्या लाभत्या पुण्यानंआलो फेडाया जन्मभूमीचं मी ऋणआई-बापाच्या लाभत्या पुण्यानं..!

टॅग्स :Jalgaonजळगाव