शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

दापोरा बंधाऱ्याचे दरवाजे उघडे असल्याने पाणी जातेय वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गिरणा धरणातून आवर्तन सोडण्यात आले असले तरी याचा दापोरासह परिसरातील गावांना लाभ होणार नसल्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गिरणा धरणातून आवर्तन सोडण्यात आले असले तरी याचा दापोरासह परिसरातील गावांना लाभ होणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दापोरा बंधाऱ्याचे दरवाजे उघडे असल्याने संपूर्ण पाणी वाया जात आहे. यामध्ये बंधाऱ्यालगत असलेल्या पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने बांधाऱ्याचे दरवाजे उघडल्याचा आरोप केला जात आहे. मात्र त्याचा ठेकेदाराने इन्कार केला आहे.

गेल्या आठवड्यात गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले. हे आवर्तन दापोरा बंधाऱ्यापर्यंत पोहचून बंधारा पूर्ण भरेल अशी अपेक्षा परिसरात व्यक्त केली जात होती. मात्र बंधाऱ्याचे दरवाजे उघडे असल्याने हे पाणी वाहून जात आहे. याविषयी परिसरातील ग्रामस्थांनी या बंधाऱ्यालगत काम करणाऱ्या ठेकेदारावर आरोप करीत त्यांनीच दरवाजे उघडले असल्याचा आरोप केला आहे. दापोरा बंधाऱ्यानजीक लमांजन रस्त्यावरील कुरखून नाल्यावर पुलाचे काम मंजूर झाले आहे. त्या कामास सुरुवात झाली. मात्र तिथपर्यंत बंधाराच्या पाण्याचा प्रवाह आल्यास कामात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे ठेकेदाराने बंधाऱ्याचे दरवाजे उघडले असल्याचा आरोप केला जात आहे.

याविषयी पुलाचे काम करणारे ठेकेदार राहुल महाजन यांनी सांगितले की, बंधाऱ्याचे दरवाजे पूर्वीपासूनच उघडे आहे. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी राहावे म्हणून आपण स्वतः दापोरा येथील ग्रामस्थांना बोलवून बंधाऱ्याच्या ठिकाणी पाट्या लावल्या. याविषयी ग्रामपंचायतकडे आपण मागणी करीत पाण्याची पातळी कमी करण्याविषयी कळविले आहे. तसे झाल्यास पुलाचे काम होऊ शकेल व याचा ग्रामस्थांना देखील दळणवळणासाठी फायदा होईल. हा विषय मंगळवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मांडण्यात येणार असून ते जे सुचवणार आहे ते मान्य राहणार असल्याचे ठेकेदार राहुल महाजन यांनी सांगितले.

पाणी योजनांचे पाणी जातेय वाया

दापोरा बंधाऱ्यावर शिरसोली प्र.न., शिरसोली प्र.बो. या मोठ्या गावांसह दापोरा, दापोरी, लमांजन, खर्ची रिंगणगाव, सावदा या गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा अवलंबून आहे. सोबतच परिसरातील बागायती क्षेत्राला या बंधाऱ्यातील पाण्याचा लाभ होतो. त्यामुळे हे पाणी तिथेच अडविले जावे अशी मागणी केली जात आहे. आवर्तन वाया जात असले तरी याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.