शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘गेम आॅफ थ्रोन्स... २०१९’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 12:04 IST

गेम आॅफ थ्रोन्स’ ही केवळ एक परदेशी मालिका आहे असं नव्हे. तो एक असा खेळ आहे, जो इतिहासात अनेकदा, ...

गेम आॅफ थ्रोन्स’ ही केवळ एक परदेशी मालिका आहे असं नव्हे. तो एक असा खेळ आहे, जो इतिहासात अनेकदा, अनेक ठिकाणी, अनेकांनी प्रत्यक्ष खेळला आहे. आणि पडद्यावर दिसतो तेवढाच तो खेळ प्रत्यक्षातही धूर्त आणि निर्मम आहे. कालापरत्वे शस्त्रे बदलली.. पूर्वी तलवार होती, मग मतपत्रिका आली; आता ईव्हीएम आहे. ‘जी ओ टी’ तोच! हा 'गेम' आता लोकशाहीचा एक अपरिहार्य भाग आहे. एक डाव खेळण्याची संधी आपल्याला, सर्व मतदारांना कधीतरी मिळते. भारतात २०१९ चा 'सीझन' कालच संपला .....या निवडणुकीचं वर्णन बहुतेकांनी 'वेगळी' असं केलंय. तशी प्रत्येकच निवडणूक आधीपेक्षा वेगळी असतेच. मग या निवडणुकीचं सामान्य मतदारासाठी असलेलं वेगळेपण कोणतं? मतदार म्हणून मला जाणवलेल्या गोष्टी अशा ....पहिली गोष्ट म्हणजे, सोशल मीडियाचा झालेला प्रचंड वापर. उमेदवारांचा मतदारांशी किंवा मतदारांचा एकमेकांशी संपर्क या माध्यमांतून सतत होत राहिला. त्यामुळे मतदारांच्या मनात नक्की काय आहे, याचा अंदाज खरं तर कोणीच बांधू शकले नाही.सोशल मीडियावर कोणाच्याही बाजूने आणि विरोधातही इतक्या ढिगाने पोस्ट असायच्या, की त्या आधारे कसलाही निष्कर्ष निघू शकत नव्हता. आताही, लागलेल्या निकालाचं 'विश्लेषण' सगळ्यात जास्त फेसबुक अन ट्वीटरवरच सुरू आहे. दुसरं - या निवडणुकीच्या प्रचारात वैयक्तिक टीकेची पातळी 'न भूतो...' घसरली हा सगळ्यांचाच आक्षेप आहे. पण अर्थातच, प्रत्येकाच्या मते विरोधी विचारसरणीच्या लोकांनीच ही पातळी सोडली.आपापले नेते सगळ्यांनाच 'गुणाची बाळं' वाटतात. पण परस्पर चिखलफेकीचा परिणाम असा झाला की कित्येक नेत्यांच्या घरापर्यंत आणि कुटुंबीयांपर्यंत तो चिखल पोहोचला. यात उत्साही नेटकऱ्यांचे योगदानही फार मोठे आहे. या सगळ्यापेक्षा खेदजनक बाब अशी की, आपल्या चुका, पराभव हे कोणी मान्यच करत नाही. उलट त्याचं समर्थन करताना सगळे दिसतात. मोदी या एका व्यक्तीला हटवणे हा एककलमी कार्यक्रम घेऊन विरोधी पक्ष चालला. हे लोकांना आवडेल, असं त्यांनी गृहित धरलं.. किंबहुना, आवडलंच पाहिजे ही उर्मट अपेक्षा ठेवली. त्याचे परिणाम निकालात दिसले. पण, गंमत म्हणजे अजूनही अनेक नेते, प्रवक्ते आणि हो, पत्रकारही बेदरकारपणे टी.व्ही. वर सांगतात की या सरकारचे अपयश लोकांच्या लक्षात आलेलं नाही. काही दिवसांत याचे परिणाम देशाला भोगावे लागणार आहेत.?..वगैरे. या देशातल्या मतदाराला अक्कल नाही का? साºया देशाने एकमुखाने दिलेला जनादेश बिनकामाचा आहे? एका पक्षाला सत्ता दिली तर 'प्रगल्भ लोकशाही' आणि त्यांनीच दुसºया पक्षाला दिली तर 'दुर्दैवी निर्णय!' वा रे विचारवंत! काही 'घटनेच्या संरक्षकांनी' तर आमचे नेते निवडून आले नाहीत तर हिंसाचार अटळ आहे ही निलाजरी धमकी दिली. याचा अर्थ स्पष्ट आहे. या लोकांचा प्रत्यक्षात लोकशाहीवर विश्वासच नाहीये. एका अशाच माजी पत्रकाराने तर आज 'दारावर गेल्यासारखी' पोस्ट टाकलीय की तो या ( दु:खद?) प्रसंगी अल्पसंख्य बांधवांसोबत आहे ! या बौद्धिक दहशतवाद्यांची आपल्यासारख्या सामान्य माणसांबद्दलची तुच्छता या निवडणुकीत प्रकर्षाने दिसून आली, हे एक वैशिष्ट्य आहे.निवडून आलेल्या उमेदवारांचं, पक्षाचं निर्भेळ अभिनंदन करणं आणि जनादेश स्वीकारणं, ही आता कालबाह्य गोष्ट झालीय. हे चांगलं का वाईट, ते तुम्हीच ठरवा!प्रत्येकाच्या मते विरोधी विचारसरणीच्या लोकांनीच ही पातळी सोडली. आपापले नेते सगळ्यांनाच 'गुणाची बाळं' वाटतात. पण परस्पर चिखलफेकीचा परिणाम असा झाला की कित्येक नेत्यांच्या घरापर्यंत आणि कुटुंबीयांपर्यंत तो चिखल पोहोचला. यात उत्साही नेटकऱ्यांचे योगदानही फार मोठे आहे.अ‍ॅड.सुशील अत्रे, (वरिष्ठ फौजदारी वकील)

टॅग्स :Jalgaonजळगाव