शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
3
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
4
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
5
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
6
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
7
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
8
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
9
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
10
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
11
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
12
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
13
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
14
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
15
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
16
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
17
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
18
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
19
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
20
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे

लोकसभा निवडणुकीमुळे वायदे बाजाराची चलती : सरकारचे नियंत्रण नसल्याने महागाईच्या तीव्र झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 12:25 IST

धान्यासह डाळी, खाद्य तेलाचे चढते भाव

जळगाव : लोकसभा निवडणुकीमुळे सरकारचे बाजारपेठेवर नियंत्रण नसल्याने गेल्या दीड महिन्यापासून वायदे बाजाराची चलती आहे. त्यामुळे सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहे. दीड महिन्यात गव्हाचे भाव २०० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने तर डाळींचे भाव तब्बल १२०० ते १३०० रुपये प्रती क्विंटलने वाढले आहेत. या सोबतच शेंगदाणा तेलाचे भावदेखील ६०० रुपये प्रती क्विंटलने वाढल्याने गृहिणींचे बजेट चांगलेच कोलमडले आहे.१० मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर देशभरात वेगवेगळ््या टप्प्यात विविध राज्यांमध्ये मतदान सुरू झाले. यात आता शेवटच्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होत असून या निवडणुकीच्या धामधुमीत सरकारचे बाजारपेठेवरील नियंत्रण कमी झाल्याने त्याचा पुरेपूर फायदा वायदे बाजारातील मंडळी घेऊ लागले. त्यामुळेच दीड महिन्यातील महागाईचा आकडा पाहिला तर धान्याची चांगली आवक असली तरी त्यांचे भाव वाढू लागले.पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न तर प्रशासन तयारीत व्यस्तअनेक ग्राहक आपल्या घरात वर्षभरासाठी धान्य साठवून ठेवण्यासाठी साधारण मार्च महिन्यापासून धान्याची खरेदी करतात. त्यानुसार मार्च महिन्यापासून गव्हाला मागणी वाढली. असे असली आवक चांगली असल्याने गव्हाचे भाव एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपर्यंत स्थिर राहिले. मात्र या काळात सत्ताधारी पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी निवडणुकीत कंबर कसून उतरल्याने बाजारपेठेकडे दुर्लक्ष होत गेले. दुसरीकडे प्रशासनदेखील निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्याने बाजारपेठेकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याने दलाल मंडळींचे यात चांगले फावले व त्याचा फायदा उचलण्याचा पूर्ण प्रयत्न या मंडळींकडून सुरू झाला. त्याचाच प्रत्यय म्हणून धान्याचे भाव यंदा चांगलेत कडाडले.आवक असली तरी भाववाढमागणी वाढली तरी सुरुवातीला भाववाढ न झालेल्या गव्हाच्या भावात ३ एप्रिलपासून वाढ सुरू झाली. त्यानुसार या दिवशी गव्हाच्या भावात ५० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली. त्यानंतर ही वाढ अशीच सुरू राहून दीड महिन्यांपूर्वी २१५० ते २२५० रुपये प्रती क्विंटल असलेल्या १४७ गव्हाचे भाव सध्या २३५० ते २४५० रुपयांवर पोहचले आहे. लोकवन गव्हाचे भावदेखील २१५० ते २२५० रुपये प्रती क्विंटलवरून २२५० ते २३०० रुपयावर पोहचले आहे तर शरबती गव्हाचे भाव २३०० ते २४०० रुपये प्रती क्विंटलवरून २४०० ते २५०० रुपये प्रती क्विंटलवर गेले आहे. चंदोसीचे भाव ३६०० ते ३७०० रुपयांवरून ३८०० ते४०००रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहे. विशेष म्हणजे आवक असली तरीही भाववाढ होत आहे.डाळींमध्ये अवाक् करणारी भाववाढआधीच उत्पादन कमी असल्याने भाववाढ होत जाणाºया डाळींच्या भाववाढीत भर घातली ती वायदे बाजाराने. बाजारातील मोठ्या उलाढालीने डाळींचे भाव तब्बल १२०० ते १३०० रुपये प्रती क्विंटलने वाढले आहेत. यामध्ये दीड महिन्यांपूर्वी ६८०० ते ७२०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ सध्या ८००० ते ८५०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाच्या डाळीतही ८०० ते १००० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन ती ५२०० ते ५५०० रुपयांवरून ६००० ते ६५०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. ५३०० ते ५६०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव सध्या ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. तर तूरडाळदेखील ७३०० ते ७५०० रुपये प्रती क्विंटलवरून ८५०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे.तांदुळाचेही भाव वाढलेहिवाळ््यापासून स्थिर असलेल्या तांदळाच्या भावातही या काळात वाढ सुरू होऊन तेदेखील २०० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने वाढले. यात चिनोर ३३०० ते ३७०० रुपये प्रती क्विंटल, सुगंधी कालीमूछ ४३०० ते ४६०० रुपये प्रती क्विंटल, वाडा कोलम ४९०० ते ५२०० रुपये प्रती क्विंटल, मसुरी २८०० ते ३००० रुपये प्रती क्विंटल आणि बासमती तांदुळाचे भाव ९१०० ते १ हजार ३०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचेले आहेत.खाद्य तेलाला महागाईची फोडणीगेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या खाद्य तेलालादेखील वायदे बाजारामुळे महागाईची फोडणी बसली आहे. या मध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच शेंगदाणा तेलाच्या भावात ६०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली असून ती अद्यापही कायम आहे.एक तर आवक कमी असल्याने धान्य, डाळींचे भाव वाढत आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीमुळेही भर पडत आहे. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन.शेंगदाणा तेलाचे भाव १२४ रुपये प्रती किलोवरून १३० रुपये प्रती किलो झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तेलाचे भाव स्थिर होते. मात्र या महिन्यात ते वाढले आहेत.- मनीष देपुरा, तेल विक्रेते.

टॅग्स :Jalgaonजळगाव