शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

राज्यभरातून आलेल्या भावी सैनिकांचे जळगावात हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 12:58 IST

सैन्य भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी वाहनांच्या छतावर झोपून काढली रात्र

ठळक मुद्देशिवतीर्थ मैदानावर दुर्गंधीबॅरिगेटस्जवळ मांडला ठिय्या

सागर दुबेजळगाव : सैन्य भरतीसाठी राज्याच्या कान्याकोपऱ्यातून दररोज सुमारे सुमारे ५ हजार तरुण येत असतानाही प्रशासनाकडून तात्पुरत्या निवासाची व शौचालयाची व्यवस्था न केल्याचे भावी सैनिकांची प्रचंड गैरसोय होत आहे़ परिणामी, उमेदवारांना नाईलाजास्तव मोकळे मैदान, उद्याने तसेच बंद दुकानांच्या ओट्यांसह फुटपाथचा झोपण्यासाठी आधार घ्यावा लागत आहे़ शौचालयाची सुविधाच उपलब्ध करून न दिल्यामुळे उमेदवारांना मोकळ्या जागेवरच प्रांत:विधी करावी लागत आहे़ यामुळे शिवतीर्थ मैदानावर प्रचंड दुर्गंधी पसरली आहे़सोमवारच्या मध्यरात्रीपासून छत्रपती महाराज क्रीडा संकुल येथे खुल्या सैन्यभरतीला सुरूवात झाली आहे़ या पार्श्वभूमीवर लोकमत प्रतिनिधीने बुधवारी रात्री शहरात फेरफटका मारत उमेदवारांच्या समस्या जाणून घेतल्या़ आतापर्यंत परभणी, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील उमेदवारांची मैदानी चाचण्या झाल्या आहेत़ बुधवारी मध्यरात्री जालना येथील उमेदवारांनी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती़ त्यामुळे जालना जिल्ह्याच्या कान्याकोपºयातून तब्बल ५ हजार ९२ उमेदवार बुधवारी रेल्वे, बस व स्वतंत्र वाहन करून शहरात दाखल झाले. सायंकाळनंतर उमेदवारांनी भरलेली शेकडो वाहन शहरात दाखल झाली़ म्हणून सायंकाळी ७ वाजेनंतर शहरातील महात्मा गांधी उद्यान ते रेल्वेस्टेशन रस्त्यापर्यंत तरूणांची प्रचंड गर्दी झाली होती.सैन्य भरती होत असल्यामुळे अनेक स्पर्धा परीक्षा चालकांकडून पॅम्पलेट वाटली जात आहेत़ त्यामुळे ती वाचून फेकली जात असल्यामुळे रात्री शिवतीर्थ मैदानापासून तर गांधी उद्यानापर्यंत जागो-जागी रस्त्यावर पॅम्पलेटस् पडलेली दिसून आले़ त्यामुळे चांगलाच कचरा साचलेला बघायला मिळाला़खाद्यपदार्थांचे ठिकाण फुल्लशहरातील खाऊगल्ली, स्टेडीयम परिसर, भजेगल्ली, बहिणाबाई उद्यान आदी परिसरातील खाद्य पदार्थांच्या ठिकाणांवर उमेदवारांची प्रचंड गर्दी होती़ अनेकांनी हॉटेलांमध्ये जेवन घेतले़ भजेगल्लीतील प्रत्येक हॉटेल्स उमेदवारांनी फुल्ल झालेली होती़बॅरिगेटस्जवळ मांडला ठिय्याउमेदवारांना पोलीस स्केटींग क्लब येथून प्रवेश दिला जात आहे़ त्यामुळे आपला क्रमांक लवकर लागावा म्हणून प्रवेशाच्या ठिकाणाजवळच उमेदवारांनी ठिय्या मांडला होता़ झोपही तेथेच घेतली़ मध्यरात्री बारावाजेपासून भरतीला सुरूवात झाली़ अन् ५ हजार ९२ उमेदवारांनी आत प्रवेश घेतला़ गुरूवारी सकाळपर्यंत सर्व उमेदवारांच्या चाचण्या घेण्यात आल्या़ या पाच हजार उमेदवारांमधून फक्त २९८ उमेदवाराच लेखी परीक्षेसाठी पात्र ठरली़ मध्यरात्री जे उमेदवार धावण्याच्या चाचणीत बाद झाले़ त्यांनी रात्रीच परतीचा मार्ग पकडला़ रात्री उशिरापर्यंत क्रीडा संकूल परिसर गजबलेले होते़उमेदवारांसाठी व्यवस्था़़़राज्य परिवहन निवृत्ती कर्मचारी संघटनेचे शिवाजी हटकर, गुलाब शेख, कामगार संघटनेचे सुरेश चांगरे यांच्यासह इतर संघटनेच्या पदाधिकाºयांनी उमेदवारांसाठी नवीन बसस्थानकात झोपण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे़ तसेच उमेदवारांना खिडची वाटप केली जात आहे़नारळपाणी, केळी हातगाड्यांवर गर्दीकाहींनी जेवन न करता केळी, नारळपाणी व पोहे खावून रात्र काढली. त्यामुळे रात्री दहा वाजेच्या सुमारास भजे गल्लीतील सफरचंद, केळी तसेच नारळपाणीच्या हातगाड्यांवर प्रचंड गर्दी झालेली होती़दुर्घटनेची शक्यता़़़़पोलीस मुख्यालयापासून तर क्रीडा संकूलपर्यंत भिंतीच्या आडोश्याला उमेदवार मिळेल त्या ठिकाणी झोपत आहेत़ या रस्त्यावरुन शेकडो वाहने ये-जा करतात. त्यामुळे एखादी दुर्घटना देखील घडण्याची शक्यता नाकारता येत नाही़ म्हणून त्या ठिकाणी पोलीस किंवा सैनिक उभा करावा अशी मागणी काही उमेदवार व नागरिकांकडून होत आहे़कागदपत्रांसाठी धावपळमोबाईलच्या टॉर्चच्या सहाय्याने आपण आणलेले कागदपत्र हे बरोबर आहेत की नाही तपासत कागदपत्रांची जुळवा-जुळव करीत होते़ ज्या उमेदवारांजवळ झेरॉक्स प्रती नाहीत असे उमेदवार झेरॉक्स दुकान शोधताना दिसून आले.वाहनांच्या छतावर काढली रात्ऱ़़़प्रशासनाकडून निवासस्थानाची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे अनेकांनी बंद दुकानांच्या बाहेर तर कुणी गांधी उद्यान, नवीन बसस्थानक तसेच रेल्वे स्टेशन, क्रीडा संकूल तसेच शिवतीर्थ मैदान आदी ठिकाणी आसरा घेतला़ या ठिकाणी झोपून रात्र काढली़ काहींनी वाहनातच झोप घेतली़ ज्यांना वाहनात जागा मिळाली नाही़ त्यांनी चक्क वाहनाच्या छतावर झोपून रात्र काढली़

टॅग्स :Jalgaonजळगाव