शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातून आलेल्या भावी सैनिकांचे जळगावात हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 12:58 IST

सैन्य भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी वाहनांच्या छतावर झोपून काढली रात्र

ठळक मुद्देशिवतीर्थ मैदानावर दुर्गंधीबॅरिगेटस्जवळ मांडला ठिय्या

सागर दुबेजळगाव : सैन्य भरतीसाठी राज्याच्या कान्याकोपऱ्यातून दररोज सुमारे सुमारे ५ हजार तरुण येत असतानाही प्रशासनाकडून तात्पुरत्या निवासाची व शौचालयाची व्यवस्था न केल्याचे भावी सैनिकांची प्रचंड गैरसोय होत आहे़ परिणामी, उमेदवारांना नाईलाजास्तव मोकळे मैदान, उद्याने तसेच बंद दुकानांच्या ओट्यांसह फुटपाथचा झोपण्यासाठी आधार घ्यावा लागत आहे़ शौचालयाची सुविधाच उपलब्ध करून न दिल्यामुळे उमेदवारांना मोकळ्या जागेवरच प्रांत:विधी करावी लागत आहे़ यामुळे शिवतीर्थ मैदानावर प्रचंड दुर्गंधी पसरली आहे़सोमवारच्या मध्यरात्रीपासून छत्रपती महाराज क्रीडा संकुल येथे खुल्या सैन्यभरतीला सुरूवात झाली आहे़ या पार्श्वभूमीवर लोकमत प्रतिनिधीने बुधवारी रात्री शहरात फेरफटका मारत उमेदवारांच्या समस्या जाणून घेतल्या़ आतापर्यंत परभणी, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील उमेदवारांची मैदानी चाचण्या झाल्या आहेत़ बुधवारी मध्यरात्री जालना येथील उमेदवारांनी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती़ त्यामुळे जालना जिल्ह्याच्या कान्याकोपºयातून तब्बल ५ हजार ९२ उमेदवार बुधवारी रेल्वे, बस व स्वतंत्र वाहन करून शहरात दाखल झाले. सायंकाळनंतर उमेदवारांनी भरलेली शेकडो वाहन शहरात दाखल झाली़ म्हणून सायंकाळी ७ वाजेनंतर शहरातील महात्मा गांधी उद्यान ते रेल्वेस्टेशन रस्त्यापर्यंत तरूणांची प्रचंड गर्दी झाली होती.सैन्य भरती होत असल्यामुळे अनेक स्पर्धा परीक्षा चालकांकडून पॅम्पलेट वाटली जात आहेत़ त्यामुळे ती वाचून फेकली जात असल्यामुळे रात्री शिवतीर्थ मैदानापासून तर गांधी उद्यानापर्यंत जागो-जागी रस्त्यावर पॅम्पलेटस् पडलेली दिसून आले़ त्यामुळे चांगलाच कचरा साचलेला बघायला मिळाला़खाद्यपदार्थांचे ठिकाण फुल्लशहरातील खाऊगल्ली, स्टेडीयम परिसर, भजेगल्ली, बहिणाबाई उद्यान आदी परिसरातील खाद्य पदार्थांच्या ठिकाणांवर उमेदवारांची प्रचंड गर्दी होती़ अनेकांनी हॉटेलांमध्ये जेवन घेतले़ भजेगल्लीतील प्रत्येक हॉटेल्स उमेदवारांनी फुल्ल झालेली होती़बॅरिगेटस्जवळ मांडला ठिय्याउमेदवारांना पोलीस स्केटींग क्लब येथून प्रवेश दिला जात आहे़ त्यामुळे आपला क्रमांक लवकर लागावा म्हणून प्रवेशाच्या ठिकाणाजवळच उमेदवारांनी ठिय्या मांडला होता़ झोपही तेथेच घेतली़ मध्यरात्री बारावाजेपासून भरतीला सुरूवात झाली़ अन् ५ हजार ९२ उमेदवारांनी आत प्रवेश घेतला़ गुरूवारी सकाळपर्यंत सर्व उमेदवारांच्या चाचण्या घेण्यात आल्या़ या पाच हजार उमेदवारांमधून फक्त २९८ उमेदवाराच लेखी परीक्षेसाठी पात्र ठरली़ मध्यरात्री जे उमेदवार धावण्याच्या चाचणीत बाद झाले़ त्यांनी रात्रीच परतीचा मार्ग पकडला़ रात्री उशिरापर्यंत क्रीडा संकूल परिसर गजबलेले होते़उमेदवारांसाठी व्यवस्था़़़राज्य परिवहन निवृत्ती कर्मचारी संघटनेचे शिवाजी हटकर, गुलाब शेख, कामगार संघटनेचे सुरेश चांगरे यांच्यासह इतर संघटनेच्या पदाधिकाºयांनी उमेदवारांसाठी नवीन बसस्थानकात झोपण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे़ तसेच उमेदवारांना खिडची वाटप केली जात आहे़नारळपाणी, केळी हातगाड्यांवर गर्दीकाहींनी जेवन न करता केळी, नारळपाणी व पोहे खावून रात्र काढली. त्यामुळे रात्री दहा वाजेच्या सुमारास भजे गल्लीतील सफरचंद, केळी तसेच नारळपाणीच्या हातगाड्यांवर प्रचंड गर्दी झालेली होती़दुर्घटनेची शक्यता़़़़पोलीस मुख्यालयापासून तर क्रीडा संकूलपर्यंत भिंतीच्या आडोश्याला उमेदवार मिळेल त्या ठिकाणी झोपत आहेत़ या रस्त्यावरुन शेकडो वाहने ये-जा करतात. त्यामुळे एखादी दुर्घटना देखील घडण्याची शक्यता नाकारता येत नाही़ म्हणून त्या ठिकाणी पोलीस किंवा सैनिक उभा करावा अशी मागणी काही उमेदवार व नागरिकांकडून होत आहे़कागदपत्रांसाठी धावपळमोबाईलच्या टॉर्चच्या सहाय्याने आपण आणलेले कागदपत्र हे बरोबर आहेत की नाही तपासत कागदपत्रांची जुळवा-जुळव करीत होते़ ज्या उमेदवारांजवळ झेरॉक्स प्रती नाहीत असे उमेदवार झेरॉक्स दुकान शोधताना दिसून आले.वाहनांच्या छतावर काढली रात्ऱ़़़प्रशासनाकडून निवासस्थानाची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे अनेकांनी बंद दुकानांच्या बाहेर तर कुणी गांधी उद्यान, नवीन बसस्थानक तसेच रेल्वे स्टेशन, क्रीडा संकूल तसेच शिवतीर्थ मैदान आदी ठिकाणी आसरा घेतला़ या ठिकाणी झोपून रात्र काढली़ काहींनी वाहनातच झोप घेतली़ ज्यांना वाहनात जागा मिळाली नाही़ त्यांनी चक्क वाहनाच्या छतावर झोपून रात्र काढली़

टॅग्स :Jalgaonजळगाव