शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

आत्याच्या दफनविधीनंतर निघाली भाच्याची अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 21:19 IST

मन हेलावणारी घटना : थडग्यासाठी विटा पोचवायला गेलेला दानेश बोरीमाईच्या कुशीत कायमचा स्थिरावला

अमळनेर : आपल्या आत्याच्या निधनानंतर स्मशानभूमीत तिचे थडगे बांधण्यासाठी विटा पोचवायला गेलेल्या भाच्याचा परतताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना १७ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.कसाली मोहल्ल्यातील जयभारत हलवाईच्या कुटुंबातील खैरुनिसा निमन हलवाई (५८) यांचे १६ रोजी निधन झाल्यामुळे दुपारी १ वाजता त्यांच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू होती. कब्रस्थानमध्ये त्यांचे थडगे बांधण्यासाठी मयत महिलेचा भाचा दानेश शेख अरमान (वय १६) हा सोबत शाहीदखा रेहमानखा मेवाती (वय १७) याला घेऊन छोट्या टेम्पोवर विटा घेऊन स्मशानभूमीत गेला. विटा पोहचवून परतताना इतराना पाहून त्याला नदीत पोहण्याचा मोह झाला. म्हणून दोघांनी नदी पात्रात उड्या घेतल्या. मात्र काही क्षणातच शाहीदखा पाण्यात बुडायला लागला म्हणून त्याला वाचवण्यासाठी दानेश धावला. शाहीदने त्याला धरल्यामुळे तोदेखील बुडू लागला. हे दृश्य हिंगोणे येथील पंकज भगवान भिल या तरुणाला दिसले. त्याने क्षणाचाही विचार न करता धावत जाऊन पाण्यात उडी मारली. परंतु तोपर्यंत शाहिद पाण्यात बुडाला होता आणि दानेश डुबक्या घेत जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत होता. पंकजने दानेशला पकडून बाहेर आणले खरे, पण तोपर्यंत श्वास गुदमरून दानेशचा मृत्यू झालेला होता. तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे घटनास्थळी पोहचले. त्यावेळी अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले.हिंगोणे परिसरातून अवैध वाळू उपसा होत असल्याने २० ते २५ फुटाचे अनेक खड्डे नदी पात्रात केले असल्याने डोहात बुडून दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.दुपारी ४ वाजता दानेशच्या आत्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. दानेशचे शवविच्छेदन करून सायंकाळी ७ वाजता त्याचीही अंत्ययात्रा काढावी लागली. एकाच दिवशी आत्या व भाच्याची अंत्ययात्रा निघाल्याने कुटुंबाने दु:खाचा आक्रोश केला. दानेशला ३ भाऊ, १ बहीण आहे.शाहिद मेवाती याचा मृतदेह मंगळवारी सापडला नव्हता. तो बुधवारी आढळून आले. शाहिदचे कुटुंब या घटनेने दु:खात बुडाले आहे. शाहीदला १ भाऊ असून वडील गवंडीकाम करून कुटुंबाची उपजीविका भागवितात.

शाहेदचा मृतदेह सापडलाबोरी नदीपात्रात बुडालेल्या शाहिदचा मृतदेह हिंगोणे परिसरातून कसाली मोहल्ल्यापर्यंत वाहून आला. १८ रोजी सकाळी ६ वाजता परिसरातील नागरिकांच्या नजरेस पडल्यानंतर त्यांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले होते.घटनेचे वृत्त कळताच शहरातील नागरिकांनी, पट्टीच्या पोहणाऱ्यांनी धाव घेऊन शाहिदचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी लाईफ जॅकेट घालून स्वत: पाण्यात उडी मारून शोधाशोध केली. मात्र मंगळवारी मृतदेह आढळून आले नव्हते.