शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

आयएमएच्या डॉक्टर्सची पूर्ण वेळ सेवा सुरु - आयएमए अध्यक्ष डॉ़ दीपक पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 12:42 IST

चार डॉक्टर कार्यरत

आनंद सुरवाडे कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यानंतर मनुष्यबळाचा मुद्दा समोर आला. मात्र, त्यासाठी आयएमएने स्वत: पुढाकार घेऊन २५० डॉक्टरांची शासकीय पातळीवर सेवा देण्यासाठी नियुक्ती केली आहे़ एवढेच नव्हे तर अधिग्रहीत रुग्णालयातही तज्ज्ञ डॉक्टर पूर्ण वेळ सेवा देत असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमएचे अध्यक्ष डॉ़ दीपक पाटील यांनी दिली़ जळगावच्या कोविड रुग्णालयात आयएमएच्या डॉक्टरांनी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. याबाबतह्णलोकमतह्णला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध बाबी उलगडून सांगितल्या.प्रश्न : कोविड रुग्णालयात आयएमएचे नेमेक किती डॉक्टर्स व किती वेळ सेवा देत आहे?डॉ़ पाटील : कोविड रुग्णालयात मनुष्यबळाची खरच कमतरता आहे़ हा मुद्दा ओळखून जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आयएमएच्या २५० डॉक्टरांची कोविड रुग्णालयात सेवा लावण्यात आली आहे़ यात सकाळी दोन डॉक्टर्स तीन तास व सायंकाळी दोन डॉक्टर्स चार तास असे चार डॉक्टर दिवसातून सहा तास या रुग्णालयात सेवा देत आहे़प्रश्न : डॉक्टर पूर्ण वेळ सेवा देत नसल्याचा आरोप आहे़डॉ़ पाटील : तसे नाही, जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार तीन तास सेवा देणे पुरेसे आहे़ त्यादृष्टीने ही या डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे़ शिवाय अधिग्रहीत रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची पूर्ण वेळा सेवा सुरू करण्यात आली आहे़ त्यामुळे या आरोपात काही तथ्य नाही़प्रश्न : अमळनेर पॅटर्न जळगावात का राबविला जात नाही?डॉ़ पाटील : अमळनेर हे त्यामानाने छोटे शहर आहे़ त्या ठिकाणी डॉ़ अरविंद शिंदे यांनी कोविडसाठी रुग्णालय खुले करून दिले होते़ जळगावात अधिग्रहीत रुग्णालयात शुक्रवार ५ जूनपासून खासगी डॉक्टर्स पूर्ण वेळ सेवा देत आहेत. त्यामुळे अमळनेर पॅटर्न असा वेगळा राबविण्याची गरज नाही़डेथ आॅडिट कमिटीचे उद्दीष्ट काय?काही बाबींची अपूर्णत: असणे, मनुष्यबळाचा अभाव यामुळे वैद्यकीय सेवेवर परिणाम झाल्याचे चित्र आहेच़ या बाधितांच्या मृत्यूमध्ये नेमके चुकले कुठे काहींचे प्राण वाचविता आले असते का? कुठे काही हलगर्जीपणा झालेला आहे का? याची माहिती घेतली जाणार आहे.जळगावला मेडिकलची पंढरी म्हटले जाते तरी रुग्ण संख्या का वाढली ?नागरिक मास्कचा वापर नीट करीत नाहीत शिवाय सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. बाजार समिती, भाजीबाजार आदी ठिकाणी गर्दीवर नियंत्रण नाही, त्यामुळे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत आहे़ शिवाय लोक दवाखान्यात यायला घाबरत आहेत. समोर यायला घाबरत असल्याने आजार लपविला जात आहे. यातूनही संसर्गाचा धोका अधिक आहे़ त्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढले आहे़बाधितांच्या मृत्यूचा अभ्यास केल्यास अनेक लोक थेट मृतावस्थेतच रुग्णालयात आले़ अनेकांचा मृत्यू ४ ते ६ तासाच्या आत झाला़ ज्यांना अन्य व्याधी आहेत, त्यांचे प्रमाण अधिक आहे़ - डॉ़ दीपक पाटील, अध्यक्ष, आयएमए जळगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव