शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
6
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
7
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
8
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
9
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
10
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
11
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
12
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
13
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
14
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
15
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
16
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
17
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
19
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
20
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."

आयएमएच्या डॉक्टर्सची पूर्ण वेळ सेवा सुरु - आयएमए अध्यक्ष डॉ़ दीपक पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 12:42 IST

चार डॉक्टर कार्यरत

आनंद सुरवाडे कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यानंतर मनुष्यबळाचा मुद्दा समोर आला. मात्र, त्यासाठी आयएमएने स्वत: पुढाकार घेऊन २५० डॉक्टरांची शासकीय पातळीवर सेवा देण्यासाठी नियुक्ती केली आहे़ एवढेच नव्हे तर अधिग्रहीत रुग्णालयातही तज्ज्ञ डॉक्टर पूर्ण वेळ सेवा देत असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमएचे अध्यक्ष डॉ़ दीपक पाटील यांनी दिली़ जळगावच्या कोविड रुग्णालयात आयएमएच्या डॉक्टरांनी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. याबाबतह्णलोकमतह्णला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध बाबी उलगडून सांगितल्या.प्रश्न : कोविड रुग्णालयात आयएमएचे नेमेक किती डॉक्टर्स व किती वेळ सेवा देत आहे?डॉ़ पाटील : कोविड रुग्णालयात मनुष्यबळाची खरच कमतरता आहे़ हा मुद्दा ओळखून जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आयएमएच्या २५० डॉक्टरांची कोविड रुग्णालयात सेवा लावण्यात आली आहे़ यात सकाळी दोन डॉक्टर्स तीन तास व सायंकाळी दोन डॉक्टर्स चार तास असे चार डॉक्टर दिवसातून सहा तास या रुग्णालयात सेवा देत आहे़प्रश्न : डॉक्टर पूर्ण वेळ सेवा देत नसल्याचा आरोप आहे़डॉ़ पाटील : तसे नाही, जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार तीन तास सेवा देणे पुरेसे आहे़ त्यादृष्टीने ही या डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे़ शिवाय अधिग्रहीत रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची पूर्ण वेळा सेवा सुरू करण्यात आली आहे़ त्यामुळे या आरोपात काही तथ्य नाही़प्रश्न : अमळनेर पॅटर्न जळगावात का राबविला जात नाही?डॉ़ पाटील : अमळनेर हे त्यामानाने छोटे शहर आहे़ त्या ठिकाणी डॉ़ अरविंद शिंदे यांनी कोविडसाठी रुग्णालय खुले करून दिले होते़ जळगावात अधिग्रहीत रुग्णालयात शुक्रवार ५ जूनपासून खासगी डॉक्टर्स पूर्ण वेळ सेवा देत आहेत. त्यामुळे अमळनेर पॅटर्न असा वेगळा राबविण्याची गरज नाही़डेथ आॅडिट कमिटीचे उद्दीष्ट काय?काही बाबींची अपूर्णत: असणे, मनुष्यबळाचा अभाव यामुळे वैद्यकीय सेवेवर परिणाम झाल्याचे चित्र आहेच़ या बाधितांच्या मृत्यूमध्ये नेमके चुकले कुठे काहींचे प्राण वाचविता आले असते का? कुठे काही हलगर्जीपणा झालेला आहे का? याची माहिती घेतली जाणार आहे.जळगावला मेडिकलची पंढरी म्हटले जाते तरी रुग्ण संख्या का वाढली ?नागरिक मास्कचा वापर नीट करीत नाहीत शिवाय सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. बाजार समिती, भाजीबाजार आदी ठिकाणी गर्दीवर नियंत्रण नाही, त्यामुळे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत आहे़ शिवाय लोक दवाखान्यात यायला घाबरत आहेत. समोर यायला घाबरत असल्याने आजार लपविला जात आहे. यातूनही संसर्गाचा धोका अधिक आहे़ त्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढले आहे़बाधितांच्या मृत्यूचा अभ्यास केल्यास अनेक लोक थेट मृतावस्थेतच रुग्णालयात आले़ अनेकांचा मृत्यू ४ ते ६ तासाच्या आत झाला़ ज्यांना अन्य व्याधी आहेत, त्यांचे प्रमाण अधिक आहे़ - डॉ़ दीपक पाटील, अध्यक्ष, आयएमए जळगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव