शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

फुलारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 12:31 IST

पाठमोरी आहे तरी हे नक्की की, तिचा चेहरा निश्चितच तृप्त, आनंदी आणि प्रसन्न असणार आहे.

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 23 - हे अद्याप सिद्ध झाले की नाही; माहिती नाही. पण फुलांचे ताटवे, त्यांचे रंग व सुवास चित्त स्थिर करण्यास आणि विचारी करण्यास मदत करतात की कसे? आपण जे सोबतचे हातात फुलांचा गजरा असलेल्या एका वयोवृद्ध महिलेचे जे चित्र बघत आहात, त्याने मात्र मला हा एक लेख एकटाकी लिहिण्यास निश्चित मदत केली. मला त्या आजीचे आभार मानावयास पाहिजेत, मला ती फुलांकडे घेऊन गेली. बघा कशी उभी आहे! काही न बोलताही त्यांची सारी फुलं विकली जाणार आहेत. त्यांनी फार मन लावून हार केले आहेत, गजरे केले आहेत आणि त्या तुम्हाला सुटी फुलंही देणारच आहेत! सतत कार्यमग्न असणारी ही वृद्धा फार लोभी नाहीये, काटक आहे. ताठ उभी आहे, स्वाभिमानी आहे, तिची कुटुंबाला आपल्या परीने मदत करण्याची इच्छा पुष्कळ काही शिकवणारी आहे. तिचे मेहनतीचे पैसे आहेत. पाठमोरी आहे तरी हे नक्की की, तिचा चेहरा निश्चितच तृप्त, आनंदी आणि प्रसन्न असणार आहे.कोठेही दुस:या गावी जर मी गेलो, तर तिथला फुलबाजार पाहण्याकडे माझा ओढा असतो. हाराने लावलेली फुलं मन प्रसन्न करतात. बाग फुलवतात मनातल्या मनात. आज फुलांची बात करतोय. ही अनेक ठिकाणी देता येतात. दिल देणे-घेणे, इस्पितळातील एखादा रुग्ण, अभिनंदन करावे असा काही प्रसंग किंवा व्यक्ती, देवालय, बायकोला गजरा, नुसताच तो फ्लॉवर पॉट सजवणे यासाठी फुले फार कामाची असतात. त्यात त्यांचे ते विविध प्रकार, मी नावे नाही सांगत.. रंग वेगळा, आकार वेगळा आणि सुवास तोही. आता मला धुळ्याचा आणि चिंचवडय़ा फुलबाजार आठवत आहे. मी तेथे थांबलो, थबकलो आणि फुले घेतलीच नाहीत, असे कधीच झाले नाही. आपल्याकडेही आधी गोलाणीत खूप जण असत. नंतर ते वेगवेगळय़ा ठिकाणी गेलेत. मी शेगावला जातो, त्याचे खरे कारण म्हणजे महाराजांनी माङयावर कृपा करावी, हे नसतेच. महाराजांच्या गळ्यातील हार हे खरे आकर्षण असते! फार कलाकुसर केलेली असते; जी मी डोळे भरून पहातो आणि काही मागायचे विसरूनच जातो! माङो स्पष्ट असे म्हणणे आहे की, तो हार अंघोळ घातल्यावर गजानन महाराज जिवंत होत भक्तांना पावतात.देवघरासाठी बागेतून फुले आणताना फार काळजी घ्यावी लागते. दोन कळ्यांमध्ये एक फुल फुललेले असते. ते कळ्यांना अजिबात इजा न होता खुडावे लागते, नाहीतर त्या गेल्याच वाया! देवांसाठी फुले की, फुलांसाठी देव? हा प्रश्न मला नेहमी पडतो. याशिवाय फुले झाडांवरच का नाही ठेवायची, असाही संभ्रम असतो. पण देवघरसुद्धा सुवासिक होणे आणि देवांना प्रसन्न वाटणे ही गृहलक्ष्मीची आवड असते. मग मधला मार्ग! थोडी फुले झाडावरच ठेवणे! ती त्या निसर्ग देवाची! अगदी सगळी वेचून, खुडून आणली क्वचित, तरी हिला जर वेळ असेल तर ती बागेतून ओंजळभर फुले आणतेच आणि मग तिचा तो कटाक्ष मला स्पष्टपणे सांगतो- ‘बघा हा पुरावा- तुमचे कोणत्याच कामात लक्ष नव्हते!’ मला एकदा जे सांगायचेच आहे ते येथे लिहितो- ‘बाई, मी गेल्यावर लगेचच काही फुलं तुङयासाठी उमलतात त्याला मी काय करू?’पाने-फुले कवितेकडे, रेषेकडे, जुन्या आठवणीकडे, एखाद्या गाण्याकडे हमखास नेतात. फुले देणा:याचा आणि घेणा:याचा एकाचवेळेस सन्मान करतात. दरम्यान, त्या गुलदस्त्यातील आकर्षक फुलांचाही आपोआपच सन्मान होत असतो. त्या निसर्गाचा सन्मान होतो. सुवास पोहोचवणा:या त्या लहरींचा सन्मान होतो. फुले अगदी कोठेही उमलतात. रानात-वनात-बागेत-घरात-परसदारी- अगदी पाण्यातही! फुलांशिवायच्या जगाची कल्पनाच करवत नाही. ती देवाने आणि निसर्गाने आपल्याला दिलेली सर्वात आनंददायी आणि उत्साहदायी अशीच भेट आहे. त्या फुलांच्या गंधकोषी तो आत्मा टाकायचा विसरला असला, तरी फुलं आपल्याशी बोलतातच! पृथ्वी जर गाणे म्हणत असेल तर ते फक्त फुल फुलण्यासाठीच.. ऋतू बदलत असतील, तर तेही फुलांसाठीच आणि सूर्यदेवही त्यासाठीच दररोज उगवत असावा.फ्रिदा काहलो नावाची एक मोठी चित्रकार होऊन गेली. तिने एके ठिकाणी म्हटले आहे- ‘आय पेंट फ्लॉवर्स सो दे विल नॉट डाय..’ आपल्या बा.भ.बोरकर या कवीश्रेष्ठांची एका कवितेतील ओळ आहे- ‘पुजेतल्या पाना-फुला, मृत्यू सर्वाग सोहळा-धन्य निर्माल्याची कळा- धन्य निर्माल्याची कळा.’ ...आता यापुढे मला काही लिहिणे शक्यच नाहीये.- प्रदीप रस्से