शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

दारूबंदीसाठी कमानी तांड्यावरील महिलांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 17:55 IST

दारूबंदी करावी या मागणीसाठी कमानी तांडा भागातील महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेत सरपंचांना घेराव घातला.

ठळक मुद्देकमानी तांडा ग्रामपंचायतीवर मोर्चासंतप्त महिलांनी सरपंचांना घातला घेरावगावठी दारूमुळे तरुण झाले व्यसनाधिन

पहूर, ता.जामनेर : पिंपळगाव कमानी तांडा परिसरात सुरु असलेल्या गावठी दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन काही दिवसापूर्वी एका युवकाने आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली. दारूबंदी करावी या मागणीसाठी कमानी तांडा भागातील महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेत सरपंचांना घेराव घातला. समस्येचे निवारण न झाल्यास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना घेराव घालण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला.

माजी सरपंच सावजी राठोड यांच्या साठ वर्षांच्या कार्यकाळापासून तांड्यात गावठी दारूला बंदी होती. काही दिवसांपासून तांडा परिसरात गावठी दारूची खुलेआम विक्री सुरु झाली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पांडूरंग धनसिंग चव्हाण या युवकाने दारूच्या नशेत विषारी द्रव्य सेवन करून जिवन यात्रा संपविली आहे. काही अल्पवयीन युवक व्यसनाधीन झाले आहेत. याबाबत अनेकवेळा पोलीस पाटील इंदलचंद चव्हाण, महिला सरंपच भागाबाई कपूरचंद चव्हाण यांनी पहूर पोलिस स्टेशनला निवेदन देऊन दारूबंदीची मागणी केली आहे.पोलीस तात्पुरती कारवाई करीत असल्याने समस्या कायम आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी रविवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. संतप्त महिलांनी सरपंच भागाबाई चव्हाण यांना घेराव घातला. यावेळी माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, रोजगार हमी योजनेचे तालुका अध्यक्ष समाधान पाटील यांनीसंतप्त महिलांची समजूत काढली. सरपंच भागाबाई चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी उपसरपंच कल्पना चव्हाण, पोलीस पाटील इंदलचंद चव्हाण, माजी सरपंच प्रेमराज चव्हाण, अर्जुन राठोड, दुर्गार्बाई प्रधान,कौशीबाई चव्हाण यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :JalgaonजळगावJamnerजामनेर