शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

मोठ्या संकटाला घालविण्यासाठी आघाडीची गरज : भारत पाटणकर

By सुनील पाटील | Updated: July 1, 2023 16:50 IST

भारत जोडो अभियानाच्या संमेलनाला सुरुवात

जळगाव : स्वप्नात जगायला, स्वप्न बघण्याच्या अधिकारावर आज गदा आलेली आहे, अशा पध्दतीची हुकूमशाही, हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मोठे संकट घालविण्यासाठी सर्व मिळून आघाडी बनविण्याची गरज आहे आणि या आघाडीला निवडून आणावे, असे आवाहन डॉ.भारत पाटणकर यांनी शनिवारी भारत जोडो अभियानातंर्गत कार्यकर्ता संमेलनात केले.

भारत जोडो अभियानातंर्गत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयजवळील विनूज वर्ल्ड येथे कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात अध्यक्षीय भाषणात पाटणकर बोलत होते. व्यासपीठावर सुभाष वारे, चंद्रशेखर शिखरे, प्रतिभा शिंदे, मुकूंद सपकाळे, करीम सालार, लीना पवार, विजय महाजन (दिल्ली), अजित झा, निता मिश्रा (उत्तर प्रदेश), एच.एम.देसर्डा, फैजल खान आदी उपस्थित होते. नांगर पूजन व शिवरायाच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन संमेलनाचे उद‌्घाटन झाले. पाटणकर पुढे म्हणाले की, नवा भारत निर्माण करण्यासाठी सजग राहण्याची गरज असून भारत जोडो सोबत माणूस जोडण्याची गरज निर्माण झाली आहे. यापेक्षा चार पट मोठे संमेलन घेऊ, महिनाभरात त्यासाठी समित्या स्थापन करु असेही त्यांनी नमूद केले.

समाजात भांडण लावण्याचे षडयंत्रसध्या समाजासमाजात भांडणे लावण्याचे षडयंत्र रचले जात आहे. जातीय दंगली घडवून आणल्या जाताहेत. जगण्याची साधणं हिसकावली जात आहेत. गरीब अधिक गरीब होत चालला आहे तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे. त्यावरुन षडयंत्र समजून घ्या, असे आवाहन सुभाष वारे यांनी केले.  १९५० मध्ये खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाला. त्याआधी फक्त २२ टक्के लोकांनाच मतदान करता येत होते. १९५० मध्ये संविधानाने स्वातंत्र्य दिले अन‌् झोडतीला माणूस मतदान करु लागला. मिलिंद बागुल यांनी सूत्रसंचालन केले. संमेलनाच्या प्रारंभी शाहीर रमेश धुरंधर यांनी क्रांती गीत सादर केले. रविवारी संमेलनाचा समारोप होणार आहे. राज्यासह परराज्यातील प्रतिनिधी यात सहभागी झालेले आहेत.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राJalgaonजळगाव