शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

मोठ्या संकटाला घालविण्यासाठी आघाडीची गरज : भारत पाटणकर

By सुनील पाटील | Updated: July 1, 2023 16:50 IST

भारत जोडो अभियानाच्या संमेलनाला सुरुवात

जळगाव : स्वप्नात जगायला, स्वप्न बघण्याच्या अधिकारावर आज गदा आलेली आहे, अशा पध्दतीची हुकूमशाही, हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मोठे संकट घालविण्यासाठी सर्व मिळून आघाडी बनविण्याची गरज आहे आणि या आघाडीला निवडून आणावे, असे आवाहन डॉ.भारत पाटणकर यांनी शनिवारी भारत जोडो अभियानातंर्गत कार्यकर्ता संमेलनात केले.

भारत जोडो अभियानातंर्गत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयजवळील विनूज वर्ल्ड येथे कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात अध्यक्षीय भाषणात पाटणकर बोलत होते. व्यासपीठावर सुभाष वारे, चंद्रशेखर शिखरे, प्रतिभा शिंदे, मुकूंद सपकाळे, करीम सालार, लीना पवार, विजय महाजन (दिल्ली), अजित झा, निता मिश्रा (उत्तर प्रदेश), एच.एम.देसर्डा, फैजल खान आदी उपस्थित होते. नांगर पूजन व शिवरायाच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन संमेलनाचे उद‌्घाटन झाले. पाटणकर पुढे म्हणाले की, नवा भारत निर्माण करण्यासाठी सजग राहण्याची गरज असून भारत जोडो सोबत माणूस जोडण्याची गरज निर्माण झाली आहे. यापेक्षा चार पट मोठे संमेलन घेऊ, महिनाभरात त्यासाठी समित्या स्थापन करु असेही त्यांनी नमूद केले.

समाजात भांडण लावण्याचे षडयंत्रसध्या समाजासमाजात भांडणे लावण्याचे षडयंत्र रचले जात आहे. जातीय दंगली घडवून आणल्या जाताहेत. जगण्याची साधणं हिसकावली जात आहेत. गरीब अधिक गरीब होत चालला आहे तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे. त्यावरुन षडयंत्र समजून घ्या, असे आवाहन सुभाष वारे यांनी केले.  १९५० मध्ये खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाला. त्याआधी फक्त २२ टक्के लोकांनाच मतदान करता येत होते. १९५० मध्ये संविधानाने स्वातंत्र्य दिले अन‌् झोडतीला माणूस मतदान करु लागला. मिलिंद बागुल यांनी सूत्रसंचालन केले. संमेलनाच्या प्रारंभी शाहीर रमेश धुरंधर यांनी क्रांती गीत सादर केले. रविवारी संमेलनाचा समारोप होणार आहे. राज्यासह परराज्यातील प्रतिनिधी यात सहभागी झालेले आहेत.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राJalgaonजळगाव