शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मोठ्या संकटाला घालविण्यासाठी आघाडीची गरज : भारत पाटणकर

By सुनील पाटील | Updated: July 1, 2023 16:50 IST

भारत जोडो अभियानाच्या संमेलनाला सुरुवात

जळगाव : स्वप्नात जगायला, स्वप्न बघण्याच्या अधिकारावर आज गदा आलेली आहे, अशा पध्दतीची हुकूमशाही, हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मोठे संकट घालविण्यासाठी सर्व मिळून आघाडी बनविण्याची गरज आहे आणि या आघाडीला निवडून आणावे, असे आवाहन डॉ.भारत पाटणकर यांनी शनिवारी भारत जोडो अभियानातंर्गत कार्यकर्ता संमेलनात केले.

भारत जोडो अभियानातंर्गत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयजवळील विनूज वर्ल्ड येथे कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात अध्यक्षीय भाषणात पाटणकर बोलत होते. व्यासपीठावर सुभाष वारे, चंद्रशेखर शिखरे, प्रतिभा शिंदे, मुकूंद सपकाळे, करीम सालार, लीना पवार, विजय महाजन (दिल्ली), अजित झा, निता मिश्रा (उत्तर प्रदेश), एच.एम.देसर्डा, फैजल खान आदी उपस्थित होते. नांगर पूजन व शिवरायाच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन संमेलनाचे उद‌्घाटन झाले. पाटणकर पुढे म्हणाले की, नवा भारत निर्माण करण्यासाठी सजग राहण्याची गरज असून भारत जोडो सोबत माणूस जोडण्याची गरज निर्माण झाली आहे. यापेक्षा चार पट मोठे संमेलन घेऊ, महिनाभरात त्यासाठी समित्या स्थापन करु असेही त्यांनी नमूद केले.

समाजात भांडण लावण्याचे षडयंत्रसध्या समाजासमाजात भांडणे लावण्याचे षडयंत्र रचले जात आहे. जातीय दंगली घडवून आणल्या जाताहेत. जगण्याची साधणं हिसकावली जात आहेत. गरीब अधिक गरीब होत चालला आहे तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे. त्यावरुन षडयंत्र समजून घ्या, असे आवाहन सुभाष वारे यांनी केले.  १९५० मध्ये खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाला. त्याआधी फक्त २२ टक्के लोकांनाच मतदान करता येत होते. १९५० मध्ये संविधानाने स्वातंत्र्य दिले अन‌् झोडतीला माणूस मतदान करु लागला. मिलिंद बागुल यांनी सूत्रसंचालन केले. संमेलनाच्या प्रारंभी शाहीर रमेश धुरंधर यांनी क्रांती गीत सादर केले. रविवारी संमेलनाचा समारोप होणार आहे. राज्यासह परराज्यातील प्रतिनिधी यात सहभागी झालेले आहेत.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राJalgaonजळगाव