शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पहूरकरांसमोर भीषण ‘जलसंकट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:53 IST

पहूर ता. जामनेर : पहूर पेठ, कसबे येथे पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण होऊ घातली असून यावर उपाययोजना करण्यासाठी सरपंचांनी तहसीलदारांना निवेदन दिली आहेत. तथापि तालुका प्रशासन निद्रीस्त अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

ठळक मुद्देगोगडी धरणात अत्यल्प साठा शिल्लककमी पावसामुळे यंदा आॅक्टोबरपासूनच संकट

पहूर ता. जामनेर : पावसाळ्यात दमदार पाऊस झाला नाही. व परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने परिसरातील धरणे भरली नाहीत. काही धरणांमध्ये अल्प पाणीसाठे शिल्लक आहेत. पण या पाण्याचा उपसा होत असल्याने काही दिवसातच पहूरकरांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची स्थिती येऊन ठेपणार आहे. आरक्षित ठेवलेल्या पाण्यासाठी पेठ व कसबे ग्रामपंचायतीने तातडीने कठोर भूमिका घेऊन कृषीपंप उचलण्यासाठी तहसीलदारांसह सहाय्यक पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.मोतीआई धरणातून पेठ गावाला पाणी पुरवठा ग्रामपंचायत पेठच्या माध्यमातून केला जातो. यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही.तुरळक झालेल्या पावसाने वाघूर नदीला आलेल्या पाण्यामुळे मोतीआई धरणात अल्पसा पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा गावाच्या पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. तर गोगडी धरणातून कसबे गावाला पाणी पुरवठा केला जातो. या धरणातील पाणी साठा संपुष्टात आला असून मृत साठ्यातून पाणी पुरवठा करतांना कसबे ग्रामपंचायतची दमछाक होत आहे. आरक्षित केलेल्या पाणी साठ्यातून कृषीपंपाव्दारे उपसा केला जात असल्याने येत्या काही दिवसातच पहूरकरांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार असल्याचे दिसून येत आहे.दोन्ही गावांची लोकसंख्या जवळपास पंचवीस ते तीस हजार असून दोन्ही ग्रामपंचायतीसमोर पाण्याचा भीषण प्रश्न उभा ठाकला आहे. हा प्रश्न दरवर्षी मार्च, एप्रिल नंतर निर्माण होत असे यंदा मात्र आॅक्टोबर महिन्यापासूनच ही पाणी टंचाईची परिस्थिती पहावयास मिळत आहे.पहूर परिसरात दुष्काळसदृष्य स्थितीपुरेसा पाऊस न झाल्यामूळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. बरड जमीनीवरील कपाशी, मका, ज्वारी पिके करपून गेली आहेत. परीसरात उपलब्ध असलेले पाणी देऊन शेतकरी आहे ते कपाशी पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसून येत आहे. हा प्रश्न शेतकऱ्यांसाठी महत्वाचा बनला आहे. पाण्याअभावी हातातोंडाशी आलेले कृषी उत्पन्न मातीमोल झाल्याने दुष्काळाच्या झळा अधिकच जाणवू लागल्या आहेत.मोतीआई धरणात आरक्षित ठेवण्यात आलेल्या पाणी साठ्यातून गावाच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन केले आहे. या पाण्याचा उपसा करणाºया कृषीपंपाना उचलण्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. तसेच लघु पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार कृषीपंप उचलण्याची गावात दवंडी फिरविण्यात आली असून नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा.- नीता रामेश्वर पाटील, सरपंच, पहूर पेठगोगडी धरणात मृत साठ्यापेक्षाही कमी पाणीसाठा असून कृषीपंप उचलण्यासाठी एक महिन्यात दोन वेळा तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाटबंधारे विभाग यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रशासन उडवाउडवीचे उत्तरे देत असून कारवाई करण्यासाठी पाऊले उचलत नाही. काही दिवसातच पाणी समस्या गंभीर होणार आहे.-ज्योती शंकर घोंगडे, सरंपच कसबे 

टॅग्स :Waterपाणी