शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पहूरकरांसमोर भीषण ‘जलसंकट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:53 IST

पहूर ता. जामनेर : पहूर पेठ, कसबे येथे पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण होऊ घातली असून यावर उपाययोजना करण्यासाठी सरपंचांनी तहसीलदारांना निवेदन दिली आहेत. तथापि तालुका प्रशासन निद्रीस्त अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

ठळक मुद्देगोगडी धरणात अत्यल्प साठा शिल्लककमी पावसामुळे यंदा आॅक्टोबरपासूनच संकट

पहूर ता. जामनेर : पावसाळ्यात दमदार पाऊस झाला नाही. व परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने परिसरातील धरणे भरली नाहीत. काही धरणांमध्ये अल्प पाणीसाठे शिल्लक आहेत. पण या पाण्याचा उपसा होत असल्याने काही दिवसातच पहूरकरांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची स्थिती येऊन ठेपणार आहे. आरक्षित ठेवलेल्या पाण्यासाठी पेठ व कसबे ग्रामपंचायतीने तातडीने कठोर भूमिका घेऊन कृषीपंप उचलण्यासाठी तहसीलदारांसह सहाय्यक पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.मोतीआई धरणातून पेठ गावाला पाणी पुरवठा ग्रामपंचायत पेठच्या माध्यमातून केला जातो. यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही.तुरळक झालेल्या पावसाने वाघूर नदीला आलेल्या पाण्यामुळे मोतीआई धरणात अल्पसा पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा गावाच्या पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. तर गोगडी धरणातून कसबे गावाला पाणी पुरवठा केला जातो. या धरणातील पाणी साठा संपुष्टात आला असून मृत साठ्यातून पाणी पुरवठा करतांना कसबे ग्रामपंचायतची दमछाक होत आहे. आरक्षित केलेल्या पाणी साठ्यातून कृषीपंपाव्दारे उपसा केला जात असल्याने येत्या काही दिवसातच पहूरकरांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार असल्याचे दिसून येत आहे.दोन्ही गावांची लोकसंख्या जवळपास पंचवीस ते तीस हजार असून दोन्ही ग्रामपंचायतीसमोर पाण्याचा भीषण प्रश्न उभा ठाकला आहे. हा प्रश्न दरवर्षी मार्च, एप्रिल नंतर निर्माण होत असे यंदा मात्र आॅक्टोबर महिन्यापासूनच ही पाणी टंचाईची परिस्थिती पहावयास मिळत आहे.पहूर परिसरात दुष्काळसदृष्य स्थितीपुरेसा पाऊस न झाल्यामूळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. बरड जमीनीवरील कपाशी, मका, ज्वारी पिके करपून गेली आहेत. परीसरात उपलब्ध असलेले पाणी देऊन शेतकरी आहे ते कपाशी पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसून येत आहे. हा प्रश्न शेतकऱ्यांसाठी महत्वाचा बनला आहे. पाण्याअभावी हातातोंडाशी आलेले कृषी उत्पन्न मातीमोल झाल्याने दुष्काळाच्या झळा अधिकच जाणवू लागल्या आहेत.मोतीआई धरणात आरक्षित ठेवण्यात आलेल्या पाणी साठ्यातून गावाच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन केले आहे. या पाण्याचा उपसा करणाºया कृषीपंपाना उचलण्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. तसेच लघु पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार कृषीपंप उचलण्याची गावात दवंडी फिरविण्यात आली असून नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा.- नीता रामेश्वर पाटील, सरपंच, पहूर पेठगोगडी धरणात मृत साठ्यापेक्षाही कमी पाणीसाठा असून कृषीपंप उचलण्यासाठी एक महिन्यात दोन वेळा तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाटबंधारे विभाग यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रशासन उडवाउडवीचे उत्तरे देत असून कारवाई करण्यासाठी पाऊले उचलत नाही. काही दिवसातच पाणी समस्या गंभीर होणार आहे.-ज्योती शंकर घोंगडे, सरंपच कसबे 

टॅग्स :Waterपाणी