शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

राजकारणामुळे मैत्रीला बंधने : ‘जय आणि विरू’ची होतेय ताटातूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 12:23 IST

नगरसेवकांच्या जोड्या फुटल्या

ठळक मुद्देयंदाच्या निवडणुकीतील उलथापालथीमुळे फुटल्या जोड्या राजकारणापलिकडे जाऊन जपली मैत्री

सुशील देवकरजळगाव : ‘शोले’ चित्रपटातील ‘जय आणि विरू’च्या जोडीची मैत्रीची उपमा आजही अनेक मित्रांना दिली जाते. मनपातील आजी-माजी नगरसेवकांमधील अशा ‘जय आणि विरू’ची मात्र राजकीय उलथापालथीमुळे ताटातूट झाली आहे. तर काहींनी राजकारणापलिकडे जाऊन मैत्री जपली आहे.जुन्या नगरसेवकांमधील पांडुरंग काळे-प्रकाश बाबुराव पाटील, शिवचरण ढंढोरे- पांडुरंग काळे, विजय कोल्हे- गफ्फार मलिक, पुष्पा पाटील-सिंधुताई कोल्हे अशा अनेक जोड्यांची मैत्री प्रसिद्ध होती. तर नव्या नगरसेवकांमध्ये सुनील महाजन- ललित कोल्हे, अश्विन सोनवणे- सुनील महाजन, पृथ्वीराज सोनवणे-रवींद्र पाटील, अनंत जोशी-ललित कोल्हे, शाम सोनवणे-सुनील महाजन, वर्षा खडके-भारती जाधव, अशा जोड्या प्रसिद्ध आहेत. मात्र राजकारणाच्या उलथापालथीमुळे जुन्या नगरसेवकांच्या जोड्या फुटल्या. अन् आता नवीन नगरसेवकांच्याही जोड्या यंदाच्या निवडणुकीतील उलथापालथीमुळे फुटल्या आहेत.अनंत जोशी व ललित कोल्हे यांची जोडी महाविद्यालयापासूनची. राजकारणातही सोबत राहिले. मनसेत दोघांनी सोबत राहून काम केले. मात्र यंदाच्या निवडणुकीत ललित कोल्हे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. तर अनंत जोशी शिवसेनेत गेले. सुनील महाजन व ललित कोल्हे यांच्याबाबतही तसेच झाले.खाविआ व मनसेची सत्तेत भागीदारी असताना दोघांची मैत्री चर्चेचा विषय बनली. त्यामुळेच जेव्हा ललित कोल्हे यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा सुनील महाजनही भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आला. मात्र राजकारण व मैत्री आपआपल्या जागी असते हे सुनील महाजन यांनी कोल्हेंवर टीका करून सिद्ध केले. पृथ्वीराज सोनवणे व रवींद्र पाटील ही जोडीही मनपात कायम सोबत असायची. भाजपाकडून नगरसेवकपदाची पहिलीच टर्म असताना दोघांनी सोबतच अनेक विषय लावून धरले.मात्र उमेदवारीत सोनवणेंवर अन्याय झाला अन त्यांनी शिवसनेचा धनुष्यबाण हाती घेतला. रवींद्र पाटील यांना मात्र खडसेंच्या यादीत स्थान मिळाल्याने भाजपाची उमेदवारी मिळाली. वर्षा खडके-भारती जाधव यांच्यातील मैत्रीही जुनीच आहे. ती त्यांनी अजूनही जपली आहे. यंदा तर दोघी मैत्रिणी शिवसेनेकडूनच एकाच प्रभागातून निवडणूक लढवित आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव