शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

जळगाव जिल्ह्यात २५ हजार बीपीएलधारकांना मोफत वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 12:50 IST

सौभाग्य योजना

ठळक मुद्दे३९ हजार एपीएलधारकांनाही मिळणार लाभशहरात ७२५ जणांना मिळणार लाभ

सागर दुबेजळगाव : सौभाग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील २५ हजार ५५८ दारिद्रय रेषेखालील (बीपीएलधारक) लाभार्थी कुटुंबियांना महावितरणतर्फे मोफत वीज जोडणी देण्यात येणार असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे़ एवढेच नव्हे तर दारिद्र्य रेषेवरील (एपीएलधारक) ३९ हजार ३०१ लाभार्थी कुटुंबियांकडून १० महिने दरमहा ५० रुपये आकारण्यात येऊन वीजजोडणी देण्यात येणार आहे़प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना 'सौभाग्य' या योजनेंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील ६४ हजार १३४ लाभार्थ्यांना वीजपुरवठा देण्यात येणार आहे. यातील २४ हजार ९४१ बीपीएल लाभार्थ्यांना विना शुल्क तर एपीएल धारकांना फक्त ५०० रुपयात वीज जोडणी देण्यात येईल़ एपीएलधारकांना दर महा ५० रुपये प्रमाणे १० महिन्यासाठी ५०० रुपये बिलांतून घेण्यात येणार आहे. यात महावितरण कंपनीकडून त्याठिकाणी लागणारी विद्युत यंत्रणा व साहित्य मोफत पुरविले जाणार आहे.दीड लाख वीज जोडणीचे उद्दीष्टसौभाग्य योजनेंतर्गत जळगांव परिमंडळात धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातून १ लाख ७० हजार १७५ लाभार्थ्यांना वीजपुरवठा देण्याचे उद्दिष्ट आहे. यापैकी १ लाख ४८ हजार ९३४ लाभार्थ्यांना पारंपरिक पध्दतीने तर २१ हजार २४१ लाभार्थ्यांना अपारंपरिक पध्दतीने वीजपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे़वीज साहित्य मोफत पुरविले जाणारलाभार्थ्यांना वीजेसह वीज जोडणी देखील मोफत देण्यात येणार आहे़ त्यासाठी लागणारे विद्युत साहित्य अर्थात वीज मीटर, वायर तसेच पोल सुध्दा महावितरणतर्फे पुरविण्यात येणार आहे़ त्यामुळे एकही रूपया लाभार्थ्यांना भरण्याची गरज भासणार नाही़शहरात ७२५ जणांना मिळणार लाभसौभाग्य योजनेतंर्गत योजनेतंर्गत ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत शहरी व ग्रामीण भागातील सर्व लाभार्थ्यांना वीज जोडणी करून मिळणार आहे़ यासाठी लाभार्थ्यांना एक रूपयाही खर्च करण्याची गरज पडणार नाही़ दरम्यान,मोफत वीज जोडणीसाठी लाभार्थी कुटुंबांची पात्रता २०११ च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे निश्चित करण्यात येणार आली आहे़ महावितरण कंपनीकडून सौभाग्य योजनेतंर्गत शहरातील ६१७ बीपीएलधारकांना मोफत तर १०८ एपीएल धारकांना ५०० रुपयात वीजजोडणी दिली जाणार आहे. ही योजना आजपर्यत वीज जोडणी न घेतलेल्या बीपीएल व एपीएलधारकांसाठी राबविण्यात येत आहे़

टॅग्स :electricityवीजJalgaonजळगाव