शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून चार तरूणांची ५६ लाखात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:29 IST

जळगाव : रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्ती देऊन चार तरुणांची ५६ लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी शुक्रवारी शहर ...

जळगाव : रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्ती देऊन चार तरुणांची ५६ लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी शुक्रवारी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक गयभु पाटील (रा. पिंपळेसिम ता. धरणगाव), कांतीलाल पंडीत पाटील, संदीप छोटू पाटील, दीपक मच्छिंद्र पाटील या तरूणांची तब्बल ५६ लाख रूपयात फसवणूक झाली आहे. त्यानुसार संशयित आरोपी दिनेश अशोक चौधरी, गजानन ऊखा राठोड, अजय पंजाबराव रामटोके, सनिकुमार अल्लखनिरंजनसिंग यांच्यासह इतरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकार

सन २०१८ मध्ये रेल्वे खात्यात ग्रुप डी पदासाठी जाहिरात निघाली होती. या पदांसाठी दीपक पाटील यांच्यासह कांतीलाल, संदीप आणि दीपक यांनी अर्ज भरले होते. त्या काळातच चौघांची दिनेश चौधरी व त्याचा मित्र गजानन राठोड यांच्याशी ओळख झाली. यवतमाळ येथील अजय रामटेके हा ओळखीचा असून त्याचे रेल्वेतील अधिका-यांशी चांगले संबंध आहे. बिहारचे सनीकुमार अल्लखनिरंजन यांच्या माध्यमातून ते तरूणांना रेल्वेत नोकरीला लावून देतात, असे दिनेश याने चौघांना त्यावेळी सांगितले. नंतर चार ते पाच दिवसांची दिनेश याने चौघांना जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमधील त्याच्या कार्यालयात बोलवून घेतले व रामटेके यांच्याशी बोलणे झाले असून नोकरी लावून देण्यासाठी प्रत्येकी १४ लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले.

पेपर न लिहिण्याचे सांगितले

दरम्यान, ३ डिसेंबर २०१८ रोजी तरूणांना रेल्वेच्या लेखी परीक्षेसाठीचे हॉल तिकिट प्राप्त झाले. त्यावेळी चौघांना दिनेशने पेपर न सोडविण्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी ऑनलाईन पेपर हा त्यांचा क्रमांक टाकून कोरा सोडला. त्यानंतर वेळोवेळी दिनेश व रामटेके याने तरूणांकडून पैसे घेतले. जानेवारी २०१९ मध्ये पटणा येथे वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर नियुक्ती पत्र पाठविण्यात येईल, सांगितले गेले. ११ मार्च २०१९ रोजी अजय रामटेके हा पुन्हा जळगावात आल्यानंतर चौघा तरूणांनी १७ लाख ५७ हजार रुपये त्यास दिले. त्याच महिन्यात दीपक व कांतीलाल या तरूणांनी बिहार येथील सासाराम रेल्वे जंक्शन येथे प्रशिक्षण घेतले. पण, रेल्वे विभागाचा प्रशिक्षणात कुठलाही संबंध नसल्याचे त्यांना कळाले. डिसेंबर २०१८ मध्ये संदीप पाटील व कांतीलाल पाटील या तरूणांना धनबाद (झारखंड) येथील नियुक्तपत्र प्राप्त झाले. पण त्यांना कामावर घेतले गेले नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे त्यांना कळाले. त्यानंतर चौघांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली होती. या शाखेने चौकशी केल्यानंतर हा गुन्हा दाखल केला.