शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

महापालिकेकडून चार दुकाने सील ; शहरातील गर्दी मात्र कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा प्रशासनाने संचारबंदी जाहीर केली असली तरी शहरात नागरिकांची गर्दी कमी होतांना दिसून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा प्रशासनाने संचारबंदी जाहीर केली असली तरी शहरात नागरिकांची गर्दी कमी होतांना दिसून येत नाही. तसेच शहरातील दुकानदार व भाजीपाला विक्रेत्यांकडून जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली केली जात आहे. सोमवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील चार दुकाने सील करण्यात आली आहेत. तसेच अनेक हात गाड्या देखील महापालिकेकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

शहरातील अनेक दुकानदार व भाजीपाला विक्रेत्यांकडून महापालिकेचा पथका विरोधात जाऊन लपून छपून व्यवसाय सुरू आहे. सोमवारी देखील शहरातील फुले मार्केट, गांधी मार्केट व इतर भागातील अनेक दुकाने सुरू आढळून आले. विशेष म्हणजे काही दुकाने अर्धे शटर लावून सुरू होते. तर काही दुकानांमध्ये ग्राहक आल्यावर दुकाने उघडली जात होती व ग्राहकांना दुकानांमध्ये प्रवेश देऊन परत दुकाने बंद केली जात होती. सोमवारी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांचा पथकाकडून शहरातील चार दुकाने सील करण्यात आली आहेत. यासह मुख्य बाजारपेठ भागातील १८ विक्रेत्यांवर कारवाई करून , काही जणांचा माल देखील जप्त करण्यात आला.

मनपाचे पथक येताच व्यवसाय बंद, पथक परतताच व्यवसाय सुरू

शहरातील शिवाजी रोड, सुभाष चौक परिसर व बळीराम पेठ भागातील भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी मनपा पथकाच्या विरोधात जणू लपंडावाचा खेळ सुरू केल्याचे चित्र शहरातील बाजारपेठ परिसरात दिसून येत आहे. सकाळी दहा वाजेपासून याठिकाणी भाजीपाला व फळ विक्रेते जमा होत असतात. मात्र महापालिकेचे पथक येण्याअगोदरच सर्व विक्रेते आपआपला माल परिसरातील काही घरांमध्ये व दुकानांमध्ये लपवित असल्याचेही पहावयास मिळत आहे. अनेक विक्रेते आपला व्यवसाय न करता केवळ मनपाच्या पथकाकडे लक्ष ठेवून असतात. मनपाचे पथक महापालिकेतून निघाल्यानंतर तत्काळ विक्रेत्यांना माहिती दिली जाते. मनपाचे पथक येण्याअगोदरच ह्या भागातील दुकाने बंद होतात. तर विक्रेते देखील गायब होत असतात, तसेच मनपाचे पथक परतल्यानंतर या भागातील दुकाने पुन्हा सुरू होतात व भाजीपाला विक्रेते देखील आपली दुकाने शहरात थाटतात.

नागरिक देखील झाले अधिक बेजबाबदार

महापालिका प्रशासनाने भाजीपाला विक्रेत्यांना शहरातील ९ ठिकाणे व्यवसाय करण्यासाठी निश्चित करून दिली आहेत. मात्र या ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांकडून व्यवसाय करण्यास नकार दिला जात आहे. भाजीपाला विक्रेते अजूनही शहरातील मुख्य बाजारपेठ भागात व्यवसाय करत आहे. या ठिकाणी व्यवसाय करण्यामागे ग्राहकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात येत असल्याने भाजीपाला विक्रेत्यांकडून इतर ठिकाणी व्यवसाय करण्यास नकार दिला जात आहे. तसेच महापालिकेने निश्चित केलेल्या जागांवर ज्या भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत त्याठिकाणी ग्राहक देखील जात नसल्याने त्यांच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला आहे. नागरिकांनी जर महापालिकेने निश्चित केलेल्या जागांवर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांकडून भाजीपाल्याची खरेदी केली तर शहरातील मुख्य बाजारपेठ भागात होणारी गर्दी टाळता येऊ शकते.