शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेकडून चार दुकाने सील ; शहरातील गर्दी मात्र कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा प्रशासनाने संचारबंदी जाहीर केली असली तरी शहरात नागरिकांची गर्दी कमी होतांना दिसून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा प्रशासनाने संचारबंदी जाहीर केली असली तरी शहरात नागरिकांची गर्दी कमी होतांना दिसून येत नाही. तसेच शहरातील दुकानदार व भाजीपाला विक्रेत्यांकडून जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली केली जात आहे. सोमवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील चार दुकाने सील करण्यात आली आहेत. तसेच अनेक हात गाड्या देखील महापालिकेकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

शहरातील अनेक दुकानदार व भाजीपाला विक्रेत्यांकडून महापालिकेचा पथका विरोधात जाऊन लपून छपून व्यवसाय सुरू आहे. सोमवारी देखील शहरातील फुले मार्केट, गांधी मार्केट व इतर भागातील अनेक दुकाने सुरू आढळून आले. विशेष म्हणजे काही दुकाने अर्धे शटर लावून सुरू होते. तर काही दुकानांमध्ये ग्राहक आल्यावर दुकाने उघडली जात होती व ग्राहकांना दुकानांमध्ये प्रवेश देऊन परत दुकाने बंद केली जात होती. सोमवारी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांचा पथकाकडून शहरातील चार दुकाने सील करण्यात आली आहेत. यासह मुख्य बाजारपेठ भागातील १८ विक्रेत्यांवर कारवाई करून , काही जणांचा माल देखील जप्त करण्यात आला.

मनपाचे पथक येताच व्यवसाय बंद, पथक परतताच व्यवसाय सुरू

शहरातील शिवाजी रोड, सुभाष चौक परिसर व बळीराम पेठ भागातील भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी मनपा पथकाच्या विरोधात जणू लपंडावाचा खेळ सुरू केल्याचे चित्र शहरातील बाजारपेठ परिसरात दिसून येत आहे. सकाळी दहा वाजेपासून याठिकाणी भाजीपाला व फळ विक्रेते जमा होत असतात. मात्र महापालिकेचे पथक येण्याअगोदरच सर्व विक्रेते आपआपला माल परिसरातील काही घरांमध्ये व दुकानांमध्ये लपवित असल्याचेही पहावयास मिळत आहे. अनेक विक्रेते आपला व्यवसाय न करता केवळ मनपाच्या पथकाकडे लक्ष ठेवून असतात. मनपाचे पथक महापालिकेतून निघाल्यानंतर तत्काळ विक्रेत्यांना माहिती दिली जाते. मनपाचे पथक येण्याअगोदरच ह्या भागातील दुकाने बंद होतात. तर विक्रेते देखील गायब होत असतात, तसेच मनपाचे पथक परतल्यानंतर या भागातील दुकाने पुन्हा सुरू होतात व भाजीपाला विक्रेते देखील आपली दुकाने शहरात थाटतात.

नागरिक देखील झाले अधिक बेजबाबदार

महापालिका प्रशासनाने भाजीपाला विक्रेत्यांना शहरातील ९ ठिकाणे व्यवसाय करण्यासाठी निश्चित करून दिली आहेत. मात्र या ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांकडून व्यवसाय करण्यास नकार दिला जात आहे. भाजीपाला विक्रेते अजूनही शहरातील मुख्य बाजारपेठ भागात व्यवसाय करत आहे. या ठिकाणी व्यवसाय करण्यामागे ग्राहकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात येत असल्याने भाजीपाला विक्रेत्यांकडून इतर ठिकाणी व्यवसाय करण्यास नकार दिला जात आहे. तसेच महापालिकेने निश्चित केलेल्या जागांवर ज्या भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत त्याठिकाणी ग्राहक देखील जात नसल्याने त्यांच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला आहे. नागरिकांनी जर महापालिकेने निश्चित केलेल्या जागांवर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांकडून भाजीपाल्याची खरेदी केली तर शहरातील मुख्य बाजारपेठ भागात होणारी गर्दी टाळता येऊ शकते.