शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

महापालिकेकडून चार दुकाने सील ; शहरातील गर्दी मात्र कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा प्रशासनाने संचारबंदी जाहीर केली असली तरी शहरात नागरिकांची गर्दी कमी होतांना दिसून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा प्रशासनाने संचारबंदी जाहीर केली असली तरी शहरात नागरिकांची गर्दी कमी होतांना दिसून येत नाही. तसेच शहरातील दुकानदार व भाजीपाला विक्रेत्यांकडून जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली केली जात आहे. सोमवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील चार दुकाने सील करण्यात आली आहेत. तसेच अनेक हात गाड्या देखील महापालिकेकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

शहरातील अनेक दुकानदार व भाजीपाला विक्रेत्यांकडून महापालिकेचा पथका विरोधात जाऊन लपून छपून व्यवसाय सुरू आहे. सोमवारी देखील शहरातील फुले मार्केट, गांधी मार्केट व इतर भागातील अनेक दुकाने सुरू आढळून आले. विशेष म्हणजे काही दुकाने अर्धे शटर लावून सुरू होते. तर काही दुकानांमध्ये ग्राहक आल्यावर दुकाने उघडली जात होती व ग्राहकांना दुकानांमध्ये प्रवेश देऊन परत दुकाने बंद केली जात होती. सोमवारी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांचा पथकाकडून शहरातील चार दुकाने सील करण्यात आली आहेत. यासह मुख्य बाजारपेठ भागातील १८ विक्रेत्यांवर कारवाई करून , काही जणांचा माल देखील जप्त करण्यात आला.

मनपाचे पथक येताच व्यवसाय बंद, पथक परतताच व्यवसाय सुरू

शहरातील शिवाजी रोड, सुभाष चौक परिसर व बळीराम पेठ भागातील भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी मनपा पथकाच्या विरोधात जणू लपंडावाचा खेळ सुरू केल्याचे चित्र शहरातील बाजारपेठ परिसरात दिसून येत आहे. सकाळी दहा वाजेपासून याठिकाणी भाजीपाला व फळ विक्रेते जमा होत असतात. मात्र महापालिकेचे पथक येण्याअगोदरच सर्व विक्रेते आपआपला माल परिसरातील काही घरांमध्ये व दुकानांमध्ये लपवित असल्याचेही पहावयास मिळत आहे. अनेक विक्रेते आपला व्यवसाय न करता केवळ मनपाच्या पथकाकडे लक्ष ठेवून असतात. मनपाचे पथक महापालिकेतून निघाल्यानंतर तत्काळ विक्रेत्यांना माहिती दिली जाते. मनपाचे पथक येण्याअगोदरच ह्या भागातील दुकाने बंद होतात. तर विक्रेते देखील गायब होत असतात, तसेच मनपाचे पथक परतल्यानंतर या भागातील दुकाने पुन्हा सुरू होतात व भाजीपाला विक्रेते देखील आपली दुकाने शहरात थाटतात.

नागरिक देखील झाले अधिक बेजबाबदार

महापालिका प्रशासनाने भाजीपाला विक्रेत्यांना शहरातील ९ ठिकाणे व्यवसाय करण्यासाठी निश्चित करून दिली आहेत. मात्र या ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांकडून व्यवसाय करण्यास नकार दिला जात आहे. भाजीपाला विक्रेते अजूनही शहरातील मुख्य बाजारपेठ भागात व्यवसाय करत आहे. या ठिकाणी व्यवसाय करण्यामागे ग्राहकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात येत असल्याने भाजीपाला विक्रेत्यांकडून इतर ठिकाणी व्यवसाय करण्यास नकार दिला जात आहे. तसेच महापालिकेने निश्चित केलेल्या जागांवर ज्या भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत त्याठिकाणी ग्राहक देखील जात नसल्याने त्यांच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला आहे. नागरिकांनी जर महापालिकेने निश्चित केलेल्या जागांवर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांकडून भाजीपाल्याची खरेदी केली तर शहरातील मुख्य बाजारपेठ भागात होणारी गर्दी टाळता येऊ शकते.