शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

चार महिन्यांचा साठवलेला, अळ्या पडलेला माल पोषण आहारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:17 IST

चौकशीत उघड झाला प्रकार

जळगाव : कन्हाळे येथील जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर व या प्रकरणी कारवाई झाल्यानंतर निकृष्ट पोषण आहाराचा मुद्दा ऐरणीवर आला़ दरम्यान, या शाळेने चार महिन्यांचा साठवून ठेवलेला माल कुठलीही स्वच्छता न करता विद्यार्थ्यांच्या आहारासाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीतून समोर आला आहे़ त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत़़जिल्हा परिषदेच्या कन्हाळे येथील शाळेमध्ये ९ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा झाली होती़ याप्रकरणाच्या चौकशीसाठी शिक्षणाधिकारी डी़ एम़ देवांग यांनी गटशिक्षणाधिकारी, रावेर येथील शालेय पोषण आहार अधीक्षक व जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी या तीन सदस्यांची चौकशी नेमली होती़ या समितीने चौकशी करून गुरुवारी आपला अहवाल जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी संजय मस्कर यांच्याकडे सादर केला आहे. यामध्ये भुसावळ तालुक्यातील ४२ शाळांपैकी २० शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचे धान्य आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता़ पल्लवी सावकारे यांनी शिक्षण समिती बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करून संबधित शाळांवर कारवाईची मागणी केली होती़ पोषण आहाराचा माल उतरविताना पन्नास दिवसांचा मालच उतरवावा, असे नियम आहेत मात्र, तरीही कन्हाळे शाळेने चार महिन्यांपासून हा माल घेऊन ठेवला होता व साठवून ठेवला होता़ त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून अन्य शाळांच्या मालाच्याही तपासणीची मागणी होत आहे़ती फाईल बंद होणार?पोषण आहाराच्या गैरव्यवहार प्रकरणात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी अद्याप सीईओंकडे अंतिम अहवाल सादर केलेला नाही़ ३१ जुलै रोजी मस्कर हे सेवानिवृत्त होत असल्याने आता उर्वरित दोन दिवसात या अहवालाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ही फाईलच बंद होईल की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे़ठेकेदाराची जबरदस्तीविद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर पल्लवी सावकारे यांनी या शाळेला भेट देऊन पाहणी केली असता तांदूळ व डाळीत थेट अळ्या आढळून आल्या होत्या़ शाळेच्या आवारात जेथे पोषण आहार शिजविला जातो तो परिसरही अगदी अस्वच्छ असल्याचेही तेव्हा समोर आले होते़ हा माल आपण नाकारल्यानंतरही ठेकेदाराने जबरदस्तीने दिल्याचे मुख्याध्यापिका पाटील यांनी सांगितल्याचे समजते़ त्यामुळे ठेकेदारावर कारवाई व्हावी, अशी मागणीही या प्रकाणात समोर येत असून आतापर्यंत शालेय पोषण आहारांच्या सर्व प्रकरणात ठेकेदारावर कुठलीही कारवाई होत नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे़गेल्या अडिच वर्षांपासून मी या पोषण आहारासंदर्भात भांडते आहे, आता कुठे कारवाईला सुरूवात झाली आहे़ मुख्याध्यापक व केंद्र प्रमुखांवर तर कारवाई झाली मात्र, याला जबाबदार ठेकेदार व पोषण आहार अधीक्षकांवरही सीईओंनी कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे़- पल्लवी सावकारे, जि़ प़ सदस्या

टॅग्स :Jalgaonजळगाव