शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

चार महिन्यांचा कोरोनाचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वाढता वाढता कोरोनाने अखेर दोनशेचाही टप्पा ओलांडला असून रविवारी जिल्ह्यात २१६ रुग्णांची भर पडली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वाढता वाढता कोरोनाने अखेर दोनशेचाही टप्पा ओलांडला असून रविवारी जिल्ह्यात २१६ रुग्णांची भर पडली आहे. यात जळगाव शहरात सर्वाधिक ७९ तर चाळीसगावात ५४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. हे दोनही ठिकाणे गेल्या आठवडाभरापासून हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहे. त्यामुळे या ठिकाणी आता कडक निर्बंध लागण्याची शक्यता अधिक दाट झाली आहे.

गेल्या आठवडाभरापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. यात जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात रुग्णसमोर येत आहेत. त्यात सरासरी ७८ रुग्ण आढळून येत असल्याने चिंतेत भर पडली आहे. नवे रुग्ण अधिक आणि बरे होणाऱ्यांची संख्या कमी असे चिंताजनक चित्र असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या चारच दिवसात १०६६ वर पोहोचली आहे. यात ७३० रुग्ण होम आयसोलेशन मध्ये असून उर्वरित आरेाग्य यंत्रणेत उपचार घेत आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्याही वाढून ३२६ झालेली आहे. यात ऑक्सिजनची गरज असणारे रुग्णही वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आतातरी नियम पाळावे, लक्षणे आल्यास चाचण्या करून घ्याव्यात असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ऑक्टोबर नंतर प्रथमच २०० रुग्ण

१२ ऑक्टोबर २०२० मध्ये २११ रुग्ण नोंदविण्यात आले होते. चार महिने दहा दिवसातील रुग्णवाढीचा रविवारी उच्चांक नोंदविण्यात आला. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यात शंभर रुग्णही नोंदविण्यात आलेले नव्हते. मात्र, १५ फेब्रुवारीपासून शंभरापेक्षा अधिक रुग्ण समोर येत आहे.

चिंता वाढविणारे आकडे

एका दिवसात बाधित : २१६

सक्रिय रुग्ण : १०६६

प्रलंबित अहवाल : ११४९

ॲन्टीजन पॉझिटिव्हिटी : १६.३८ टक्के

जळगाव शहरातील रुग्ण : ७९

चाळीसगावातील रुग्ण : ५४

ऑक्सिजन वरील रुग्ण : ७३

आयसीयूमधील रुग्ण : ४९

स्वतंत्र पॉइंटर

दिलासा : मृत्यूदर घटला : २.३४ टक्के

चिंता : रिकव्हरी रेट घटला: ९५.८४ टक्के

४७ वर्षीय महिलेचा मृत्यू

कोरोना बाधित जळगाव शहरातील एका ४७ वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना या महिलेचा मृत्यू झाला आहे. ५० वर्षाखालील मृत्यू चिंता वाढविणारा आहे. मात्र, अन्य व्याधी असणे, मोठ्या प्रमाणात संसर्ग असणे या बाबी कमी वयाच्या मृत्यूमागे कारणीभूत असतात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

चाचण्या वाढल्या

रविवारी १११३ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या असून ९०४ अहवाल समोर आले तर ॲन्टीजच्या ७१४ चाचण्या जिल्हाभरात झाल्या आहेत. यात अनुक्रमे ९९ आणि ११७ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. दरम्यान, आरटीपीसीआर चाचणी करूनही आता विलगीकरणात ठेवले जात नसल्याने प्रलंबित अहवालांची संख्याही चिंता वाढविणारी आहे. चाचणी झाल्यावरही काही जण बिनधास्त बाहेर फिरत असल्याचे चित्र आहे.

सर्व भागात रुग्ण ही चिंतेची बाब

शहरातील सर्वच भागात रुग्ण समोर येत आहे. ही चिंतेची बाब असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे, रोज नवे हॉटस्पॉट समोर येत आहे. यात रविवारी भवानी पेठ ५ या भागात अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यासह भिकमचंद जैन नगर ३, गुजराल पेट्रोल पंप २, प्रोफेसर कॉलनी २, बीबा नगर २, गणेश कॉलनी, रिंगरोड, अयोध्यानगर, मुक्ताईनगर, राका पार्क, आराधना कॉलनी, बालाजी पेठ, रामदास कॉलनी, साईनगर, वर्षा कॉलनी, जीवननगर, सदाशिव कॉलनी, ओंकारेश्वर मंदिराजवळ, भूषण कॉलनी, जय नगर, वाटीका आश्रम, जय निवास, रायसोनीनगर तानाजी मालुसरे नगर या भागात प्रत्येकी १ बाधित रुग्ण आढळून आला आहे.