शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

महामार्गाचे चौपदरीकरण पण अजिंठा चौफुलीच्या वाहतुक कोंडीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी खोटे नगर ते कालंका माता मंदिरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी खोटे नगर ते कालंका माता मंदिरा पर्यंतच्या रस्त्यावर काही ठिकाणी उड्डाण पुल तर काही ठिकाणी भुयारी मार्ग बनवले जात आहेत. मात्र त्यात मोठी वर्दळ असलेल्या अजिंठा चौफुली जवळ उड्डाणपुलाचे नियोजन करण्यात आलेले नाही. जळगाव जिल्हा मोटर ओनर्स व ट्रान्सपोर्ट एजंट्स असोसिएशनने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदनात येथे उड्डाण पुल उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना देखील पाठवण्यात आले आहे.

एका बाजुला औद्योगिक वसाहत, औरंगाबाद रस्ता, एका बाजुला शहरातील मुख्य बाजारपेठ आणि अहोरात्र सुरू असलेली राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळ असे अजिंठा चौफुलीचे चित्र आहे. दिवसाला या चौकातून किमान तीन ते चार हजार ट्रक ये जा करत असतात. त्याशिवाय औद्योगिक वसाहतीत जाणारे कर्मचारी हा चौक ओलांडूनच आपल्या घरी जातात. तसेच या भागातूनच रामेश्वर कॉलनी, अयोध्या नगर, सुप्रिम कॉलनी यासारख्या मोठ्या वसाहतीच्या भागांमध्ये जाता येते. मात्र तरीही येथे रहदारीचे कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही.

गेल्या काही काळापासून येथे एक सर्कल तयार करून रहदारीला शिस्त लावली जाणार असल्याचे प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाकडून सांगितले जात आहे. मात्र अशा प्रकारची कोणतीही पावले अद्याप उचलली गेलेली नाहीत. मात्र या चौकात रहदारीला शिस्त लावण्यासाठी सर्कल केले तर त्यामुळे अवजड वाहनांना वळण घेतांना मोठी अडचण येणार असल्याचा दावा ट्रान्सपोर्ट संघटनेचे अध्यक्ष जसपालसिंग बग्गा यांनी केला आहे.

मंदिर पाडले पण जागेचा अद्याप उपयोग नाही

अजिंठा चौकात कृष्ण मंदिर बांधण्यात आले होते. तीन ते चार वर्षांपुर्वी तत्कालिन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी हे मंदिर अतिक्रमित असल्याने तोडले आणि ही जागा वळण रस्त्यासाठी वापरली जाणार असल्याचे सांगितले. मात्र मंदिर तोडुन वर्षे उलटली तरी देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने येथे वळण रस्ता बांधलेला नाही.

कोट -

अजिंठा चौफुलीतून दररोज तीन ते चार हजार ट्रक ये-जा करत असतात. तसेच दिवसभर अनेक वाहने देखील ये-जा करत असतात. त्यामुळे येथे उड्डाणपुल बांधण्यात यावा, अशी मागणी आम्ही केलेली नाही. येथे सर्कल तयार केले जाणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. मात्र सर्कल तयार केल्यावर अवजड वाहनांना वळण घेणे कठीण होईल - जसपालसिंग बग्गा, अध्यक्ष जिल्हा मोटर ओनर्स आणि ट्रान्सपोर्ट एजंट्स असोसिएशन, जळगाव