शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

महामार्गाचे चौपदरीकरण पण अजिंठा चौफुलीच्या वाहतुक कोंडीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी खोटे नगर ते कालंका माता मंदिरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी खोटे नगर ते कालंका माता मंदिरा पर्यंतच्या रस्त्यावर काही ठिकाणी उड्डाण पुल तर काही ठिकाणी भुयारी मार्ग बनवले जात आहेत. मात्र त्यात मोठी वर्दळ असलेल्या अजिंठा चौफुली जवळ उड्डाणपुलाचे नियोजन करण्यात आलेले नाही. जळगाव जिल्हा मोटर ओनर्स व ट्रान्सपोर्ट एजंट्स असोसिएशनने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदनात येथे उड्डाण पुल उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना देखील पाठवण्यात आले आहे.

एका बाजुला औद्योगिक वसाहत, औरंगाबाद रस्ता, एका बाजुला शहरातील मुख्य बाजारपेठ आणि अहोरात्र सुरू असलेली राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळ असे अजिंठा चौफुलीचे चित्र आहे. दिवसाला या चौकातून किमान तीन ते चार हजार ट्रक ये जा करत असतात. त्याशिवाय औद्योगिक वसाहतीत जाणारे कर्मचारी हा चौक ओलांडूनच आपल्या घरी जातात. तसेच या भागातूनच रामेश्वर कॉलनी, अयोध्या नगर, सुप्रिम कॉलनी यासारख्या मोठ्या वसाहतीच्या भागांमध्ये जाता येते. मात्र तरीही येथे रहदारीचे कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही.

गेल्या काही काळापासून येथे एक सर्कल तयार करून रहदारीला शिस्त लावली जाणार असल्याचे प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाकडून सांगितले जात आहे. मात्र अशा प्रकारची कोणतीही पावले अद्याप उचलली गेलेली नाहीत. मात्र या चौकात रहदारीला शिस्त लावण्यासाठी सर्कल केले तर त्यामुळे अवजड वाहनांना वळण घेतांना मोठी अडचण येणार असल्याचा दावा ट्रान्सपोर्ट संघटनेचे अध्यक्ष जसपालसिंग बग्गा यांनी केला आहे.

मंदिर पाडले पण जागेचा अद्याप उपयोग नाही

अजिंठा चौकात कृष्ण मंदिर बांधण्यात आले होते. तीन ते चार वर्षांपुर्वी तत्कालिन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी हे मंदिर अतिक्रमित असल्याने तोडले आणि ही जागा वळण रस्त्यासाठी वापरली जाणार असल्याचे सांगितले. मात्र मंदिर तोडुन वर्षे उलटली तरी देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने येथे वळण रस्ता बांधलेला नाही.

कोट -

अजिंठा चौफुलीतून दररोज तीन ते चार हजार ट्रक ये-जा करत असतात. तसेच दिवसभर अनेक वाहने देखील ये-जा करत असतात. त्यामुळे येथे उड्डाणपुल बांधण्यात यावा, अशी मागणी आम्ही केलेली नाही. येथे सर्कल तयार केले जाणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. मात्र सर्कल तयार केल्यावर अवजड वाहनांना वळण घेणे कठीण होईल - जसपालसिंग बग्गा, अध्यक्ष जिल्हा मोटर ओनर्स आणि ट्रान्सपोर्ट एजंट्स असोसिएशन, जळगाव