शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

महामार्गाचे चौपदरीकरण पण अजिंठा चौफुलीच्या वाहतुक कोंडीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी खोटे नगर ते कालंका माता मंदिरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी खोटे नगर ते कालंका माता मंदिरा पर्यंतच्या रस्त्यावर काही ठिकाणी उड्डाण पुल तर काही ठिकाणी भुयारी मार्ग बनवले जात आहेत. मात्र त्यात मोठी वर्दळ असलेल्या अजिंठा चौफुली जवळ उड्डाणपुलाचे नियोजन करण्यात आलेले नाही. जळगाव जिल्हा मोटर ओनर्स व ट्रान्सपोर्ट एजंट्स असोसिएशनने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदनात येथे उड्डाण पुल उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना देखील पाठवण्यात आले आहे.

एका बाजुला औद्योगिक वसाहत, औरंगाबाद रस्ता, एका बाजुला शहरातील मुख्य बाजारपेठ आणि अहोरात्र सुरू असलेली राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळ असे अजिंठा चौफुलीचे चित्र आहे. दिवसाला या चौकातून किमान तीन ते चार हजार ट्रक ये जा करत असतात. त्याशिवाय औद्योगिक वसाहतीत जाणारे कर्मचारी हा चौक ओलांडूनच आपल्या घरी जातात. तसेच या भागातूनच रामेश्वर कॉलनी, अयोध्या नगर, सुप्रिम कॉलनी यासारख्या मोठ्या वसाहतीच्या भागांमध्ये जाता येते. मात्र तरीही येथे रहदारीचे कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही.

गेल्या काही काळापासून येथे एक सर्कल तयार करून रहदारीला शिस्त लावली जाणार असल्याचे प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाकडून सांगितले जात आहे. मात्र अशा प्रकारची कोणतीही पावले अद्याप उचलली गेलेली नाहीत. मात्र या चौकात रहदारीला शिस्त लावण्यासाठी सर्कल केले तर त्यामुळे अवजड वाहनांना वळण घेतांना मोठी अडचण येणार असल्याचा दावा ट्रान्सपोर्ट संघटनेचे अध्यक्ष जसपालसिंग बग्गा यांनी केला आहे.

मंदिर पाडले पण जागेचा अद्याप उपयोग नाही

अजिंठा चौकात कृष्ण मंदिर बांधण्यात आले होते. तीन ते चार वर्षांपुर्वी तत्कालिन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी हे मंदिर अतिक्रमित असल्याने तोडले आणि ही जागा वळण रस्त्यासाठी वापरली जाणार असल्याचे सांगितले. मात्र मंदिर तोडुन वर्षे उलटली तरी देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने येथे वळण रस्ता बांधलेला नाही.

कोट -

अजिंठा चौफुलीतून दररोज तीन ते चार हजार ट्रक ये-जा करत असतात. तसेच दिवसभर अनेक वाहने देखील ये-जा करत असतात. त्यामुळे येथे उड्डाणपुल बांधण्यात यावा, अशी मागणी आम्ही केलेली नाही. येथे सर्कल तयार केले जाणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. मात्र सर्कल तयार केल्यावर अवजड वाहनांना वळण घेणे कठीण होईल - जसपालसिंग बग्गा, अध्यक्ष जिल्हा मोटर ओनर्स आणि ट्रान्सपोर्ट एजंट्स असोसिएशन, जळगाव