शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
4
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
5
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
6
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
7
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
8
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
9
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
10
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
11
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
12
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
13
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
14
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
15
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
16
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
17
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
18
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
19
ITR भरल्यानंतर आता तासाभरात परतावा! आयकर विभागाचा स्पीड पाहून नागरिक थक्क, जाणून घ्या कसं झालं शक्य?
20
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 

महामार्गाचे चौपदरीकरण पण अजिंठा चौफुलीच्या वाहतुक कोंडीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी खोटे नगर ते कालंका माता मंदिरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी खोटे नगर ते कालंका माता मंदिरा पर्यंतच्या रस्त्यावर काही ठिकाणी उड्डाण पुल तर काही ठिकाणी भुयारी मार्ग बनवले जात आहेत. मात्र त्यात मोठी वर्दळ असलेल्या अजिंठा चौफुली जवळ उड्डाणपुलाचे नियोजन करण्यात आलेले नाही. जळगाव जिल्हा मोटर ओनर्स व ट्रान्सपोर्ट एजंट्स असोसिएशनने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदनात येथे उड्डाण पुल उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना देखील पाठवण्यात आले आहे.

एका बाजुला औद्योगिक वसाहत, औरंगाबाद रस्ता, एका बाजुला शहरातील मुख्य बाजारपेठ आणि अहोरात्र सुरू असलेली राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळ असे अजिंठा चौफुलीचे चित्र आहे. दिवसाला या चौकातून किमान तीन ते चार हजार ट्रक ये जा करत असतात. त्याशिवाय औद्योगिक वसाहतीत जाणारे कर्मचारी हा चौक ओलांडूनच आपल्या घरी जातात. तसेच या भागातूनच रामेश्वर कॉलनी, अयोध्या नगर, सुप्रिम कॉलनी यासारख्या मोठ्या वसाहतीच्या भागांमध्ये जाता येते. मात्र तरीही येथे रहदारीचे कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही.

गेल्या काही काळापासून येथे एक सर्कल तयार करून रहदारीला शिस्त लावली जाणार असल्याचे प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाकडून सांगितले जात आहे. मात्र अशा प्रकारची कोणतीही पावले अद्याप उचलली गेलेली नाहीत. मात्र या चौकात रहदारीला शिस्त लावण्यासाठी सर्कल केले तर त्यामुळे अवजड वाहनांना वळण घेतांना मोठी अडचण येणार असल्याचा दावा ट्रान्सपोर्ट संघटनेचे अध्यक्ष जसपालसिंग बग्गा यांनी केला आहे.

मंदिर पाडले पण जागेचा अद्याप उपयोग नाही

अजिंठा चौकात कृष्ण मंदिर बांधण्यात आले होते. तीन ते चार वर्षांपुर्वी तत्कालिन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी हे मंदिर अतिक्रमित असल्याने तोडले आणि ही जागा वळण रस्त्यासाठी वापरली जाणार असल्याचे सांगितले. मात्र मंदिर तोडुन वर्षे उलटली तरी देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने येथे वळण रस्ता बांधलेला नाही.

कोट -

अजिंठा चौफुलीतून दररोज तीन ते चार हजार ट्रक ये-जा करत असतात. तसेच दिवसभर अनेक वाहने देखील ये-जा करत असतात. त्यामुळे येथे उड्डाणपुल बांधण्यात यावा, अशी मागणी आम्ही केलेली नाही. येथे सर्कल तयार केले जाणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. मात्र सर्कल तयार केल्यावर अवजड वाहनांना वळण घेणे कठीण होईल - जसपालसिंग बग्गा, अध्यक्ष जिल्हा मोटर ओनर्स आणि ट्रान्सपोर्ट एजंट्स असोसिएशन, जळगाव