शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

सनातन भारत संस्थेच्या संस्थापकांना अटक करा : अंनिसचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 20:24 IST

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात एसआयटीने पुण्यातील चिंचवड भागातून अमोल काळे उर्फ भाईसाहेब याला शनिवारी अटक केली. धर्माच्या नावाने कडवेपणा रुजविणाऱ्या सनात भारत संस्थेचे संस्थापक व मानसोपचार तज्ज्ञ डॉ.जयंत आठवले यांना अटक करावी अशी मागणी अंनिसचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी नूतन मराठा महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देव्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वेक्षणजातपंचायतीला मुठमातीबाबत जनप्रबोधन२० आॅगस्ट राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिन

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२ -पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात एसआयटीने पुण्यातील चिंचवड भागातून अमोल काळे उर्फ भाईसाहेब याला शनिवारी अटक केली. धर्माच्या नावाने कडवेपणा रुजविणाऱ्या सनात भारत संस्थेचे संस्थापक व मानसोपचार तज्ज्ञ डॉ.जयंत आठवले यांना अटक करावी अशी मागणी अंनिसचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी नूतन मराठा महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.शनिवारी दुपारी २ वाजता झालेल्या पत्रकार परिषदेस प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, राज्य सरचिटणीस डॉ.ठकसेण गोराणे, विनायक साळवे, राज्य व्यसनमुक्ती मंचचे सदस्य नवल ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे, विश्वजीत चौधरी उपस्थित होते.डॉ.जयंत आठवले यांना अटक करापत्रकार गौरी लंकेश, नरेंद्र दाभोलकर व विवेक पानसरे यांच्या हत्येप्रकरणात सनातन भारतशी संबधित साधकांचा सहभाग समोर येत आहे. गौरी लंकेश प्रकरणात अटकेत असलेले केटी नवीनकुमार यांच्यासोबत अमोल काळे याने बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. या संस्थेचे संस्थापक डॉ.जयंत आठवले हे स्वत: मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्या माध्यमातून ते बहुजन समाजातील तरुणांची डोकी भडकवित आहेत. या तरुणांना ह्युमन बॉम्ब बनवून सोडले. त्यातून संहारकता उभी राहत आहे. त्यामुळे डॉ.जयंत आठवले यांना तत्काळ अटक करून त्यांची तज्ज्ञांमार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.जातपंचायतीला मुठमातीबाबत जनप्रबोधनप्रदेश सरचिटणीस ठकसेन गोराणे यांनी जातपंचायतीच्या संदर्भात कायदा तयार झाल्यानंतर जात पंचायतीला मुठमाती यासाठी १ मे २०१९ पर्यंत राज्यभर जनप्रबोधन करणार असल्याचे सांगितले. १ जून पासून कोकण विभागात हा उपक्रम सुरु होणार असल्याचे सांगितले. विनायक साळवे यांनी जिल्हा पातळीवरील प्रशिक्षण शिबिर, त्याचे नियोजन आणि कार्यपद्धती याबाबत माहिती दिली.व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वेक्षणमहाराष्ट्र राज्याच्या हिरक महोत्सवानिमित्त अंनिसतर्फे व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरु आहे. त्या अंतर्गत समन्वय मंचाने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील साडे चार कोटी कुुंटुबातील किमान एक लाख व्यक्तीचा व्यसनामुळे मृत्यू होत असल्याचे त्यांनी सांगितले. व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी अंनिस काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव