शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

सनातन भारत संस्थेच्या संस्थापकांना अटक करा : अंनिसचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 20:24 IST

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात एसआयटीने पुण्यातील चिंचवड भागातून अमोल काळे उर्फ भाईसाहेब याला शनिवारी अटक केली. धर्माच्या नावाने कडवेपणा रुजविणाऱ्या सनात भारत संस्थेचे संस्थापक व मानसोपचार तज्ज्ञ डॉ.जयंत आठवले यांना अटक करावी अशी मागणी अंनिसचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी नूतन मराठा महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देव्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वेक्षणजातपंचायतीला मुठमातीबाबत जनप्रबोधन२० आॅगस्ट राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिन

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२ -पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात एसआयटीने पुण्यातील चिंचवड भागातून अमोल काळे उर्फ भाईसाहेब याला शनिवारी अटक केली. धर्माच्या नावाने कडवेपणा रुजविणाऱ्या सनात भारत संस्थेचे संस्थापक व मानसोपचार तज्ज्ञ डॉ.जयंत आठवले यांना अटक करावी अशी मागणी अंनिसचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी नूतन मराठा महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.शनिवारी दुपारी २ वाजता झालेल्या पत्रकार परिषदेस प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, राज्य सरचिटणीस डॉ.ठकसेण गोराणे, विनायक साळवे, राज्य व्यसनमुक्ती मंचचे सदस्य नवल ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे, विश्वजीत चौधरी उपस्थित होते.डॉ.जयंत आठवले यांना अटक करापत्रकार गौरी लंकेश, नरेंद्र दाभोलकर व विवेक पानसरे यांच्या हत्येप्रकरणात सनातन भारतशी संबधित साधकांचा सहभाग समोर येत आहे. गौरी लंकेश प्रकरणात अटकेत असलेले केटी नवीनकुमार यांच्यासोबत अमोल काळे याने बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. या संस्थेचे संस्थापक डॉ.जयंत आठवले हे स्वत: मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्या माध्यमातून ते बहुजन समाजातील तरुणांची डोकी भडकवित आहेत. या तरुणांना ह्युमन बॉम्ब बनवून सोडले. त्यातून संहारकता उभी राहत आहे. त्यामुळे डॉ.जयंत आठवले यांना तत्काळ अटक करून त्यांची तज्ज्ञांमार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.जातपंचायतीला मुठमातीबाबत जनप्रबोधनप्रदेश सरचिटणीस ठकसेन गोराणे यांनी जातपंचायतीच्या संदर्भात कायदा तयार झाल्यानंतर जात पंचायतीला मुठमाती यासाठी १ मे २०१९ पर्यंत राज्यभर जनप्रबोधन करणार असल्याचे सांगितले. १ जून पासून कोकण विभागात हा उपक्रम सुरु होणार असल्याचे सांगितले. विनायक साळवे यांनी जिल्हा पातळीवरील प्रशिक्षण शिबिर, त्याचे नियोजन आणि कार्यपद्धती याबाबत माहिती दिली.व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वेक्षणमहाराष्ट्र राज्याच्या हिरक महोत्सवानिमित्त अंनिसतर्फे व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरु आहे. त्या अंतर्गत समन्वय मंचाने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील साडे चार कोटी कुुंटुबातील किमान एक लाख व्यक्तीचा व्यसनामुळे मृत्यू होत असल्याचे त्यांनी सांगितले. व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी अंनिस काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव