शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

कोरोेनामुळे बळी गेलेले चाळिशीच्या पुढील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:24 IST

धरणगाव तालुक्यात कोरोना महामारीमुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झालेली दिसून येतात. जगभरात या कोरोनाने थैमान घातलेले दिसून येते. मात्र, ...

धरणगाव तालुक्यात कोरोना महामारीमुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झालेली दिसून येतात. जगभरात या कोरोनाने थैमान घातलेले दिसून येते. मात्र, आता ही परिस्थिती आटोक्यात आली आहे. सद्यपरिस्थितीला धरणगाव कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते. याठिकाणी काही नागरिक मृत पावले तर काही योग्य पद्धतीने उपचार घेऊन घरी आलेत.

तालुक्यातील साखरे येथे दोन भावांनी कोरोनाकाळात जीव गमावला, तर वाणी गल्ली परिसरातही अशाच क्लेशदायक घटना घडल्या. त्याचबरोबर काही नावाजलेले लोकदेखील यात मृत पावले. या महामारीमुळे प्रचंड प्रमाणात संकटे आली. या ठिकाणी काही जणांनी गोरगरिबांना प्रचार, प्रसार न करत मदत केली. त्यांना अन्नदान केले. गेल्या आठ महिन्यांपासून या महामारीचा सामना सुरू आहे. सर्वांना उत्सुकता आहे ती शाळा कधी सुरू होणार, सर्व गावांना बस कधी धावणार, रेल्वे नियमित कधी सुरू होणार याचीच.

धरणगाव तालुक्यात आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या २१२६ असून, मयत संख्या ४९ आहे. बरे झालेले २०६७ असून, केवळ दहा जण आता येथे उपचार घेत आहेत. मयतांचा वयोगट हा ४० ते ८० दरम्यानचा होता. यात बऱ्याच जणांना अन्य व्याधीही होत्या.

सावधता गरजेची

कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी नागरिकांनी सावधता बाळगणे गरजेचे आहे. मात्र, तशी परिस्थिती आज शहरात नाही. अनेक जण मास्क न लावता बाजारात येतात. हीच स्थिती विक्रेत्यांची असते. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. प्रशासनही दुर्लक्ष करत असल्याचेच लक्षात येत असल्याने दुसऱ्या लाटेच्या भीतीने उपाययोजना केल्या जाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या महामारीमुळे पोलीस प्रशासन, तहसीलदार, नायब तहसीलदार, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, समाजसेवक, नगरसेवक, नगराध्यक्ष या पद्धतीने विविध प्रकारच्या संघटनांनी परिश्रम घेतले. त्यांनीही आता जनजागृती करणे गरजेचे आहे.