शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

टाकाऊ वस्तूंपासून बनविला किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 21:03 IST

मुलांनी केली सुंदर कलाकृती

सावदा ,ता.रावेर : दिवाळी आली म्हणजे सर्वांच्या आनंदाला उधाण येते. चिमुकल्या जीवांना फराळाची, तरुणांना फटाक्यांची व नवीन कपडे घालून मिरवण्याची आवाड असते. तर गृहिणींना फराळ तयार करून सर्वांना खाऊ घालण्याची लगबग असते. लेकीला माहेरची ओढ असते. अशा या दिवाळीत कलावंतांना सुद्धा काहीतरी नवीन करावसं वाटतं. त्याचप्रमाणे ईशान आणि वरद या दोघा मुलांनी दिवाळीत छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला बनविण्याचं ठरवल आणि सुंदर कलाकृतीही घडविली.सुरुवातीस मित्रमंडळीच्या बैठकीत किल्ला बनविण्यावर शिक्कामोर्तब झाले. नंदू सरांनी मातीच्या किल्ल्यापेक्षा वेस्टेज वस्तू वापरण्याचा सल्ला दिला. यात कापड, वर्तमानपत्र, बांबू,स्पंज रंगवून डोंगर टेकड्या व पुठ्ठ्याचे बुरुज तसेच दरवाजे केले. तुरखाटीच्या काड्या वापरून जुन्या साडीच्या चिंध्या तसेच वर्तमानपत्र वापरून त्यावर कापडी झेंडे लावून किल्ला तयार झाला. या किल्ल्याच्या अग्रभागी शिवछत्रपती शिवाजी राजे यांची मूर्ती ठेवून शिवाजी महाराज की जय असा जयघोष सुरू झाला. किल्ल्याच्या विविध भागांची चर्चा सुरू झाली. हा बुरुज... हा दरवाजा... हा कडा ...हा महल तसेच भंडारा घर, विहीर, तोफखाना असे शब्द कानावर आले. इतिहास मुलांच्या मनात रहावा हा उद्देश सफल झाला. किल्ला लोकांपर्यंत पोहोचला लोक पाहायला येऊ लागले त्यांच्या मेहनतीचे चीज झाल्यासारखे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.