शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता झालेल्या माजी आमदारपुत्र तीन दिवसानंतर परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 12:34 IST

ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत अमोल पाटील बेपत्ता झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते.

जळगाव : कौटुंबिक वादातून घरातून बेपत्ता झालेले शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील यांचे पुत्र अमोल पाटील तीन दिवसानंतर सोमवारी सायंकाळी घरी परतले. जळगावात आल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्यात ते हजर झाले. तेथे जबाब दिल्यानंतर ते घरी परत गेले. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत अमोल पाटील बेपत्ता झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल चिमणराव पाटील (४२, रा.पारोळा,सुमन हाईटस्, ह.मु.विक्रीकर कार्यालयासमोर, जळगाव) हे ६ रोजी सकाळी १० वाजता घरात कोणालाच काहीही न सांगता स्वत:च्या चारचाकीसह (क्र.एम.एच.१९ सी.यु.०५५५) घरातून निघाले. बाहेर जातांना त्यांनी मोबाईल घरीच ठेवला होता. त्या मोबाईलवर दुपारी एटीएममधून पैसे काढल्याचा संदेश प्राप्त झाला.पती अमोल हे घरातून निघून गेल्याची माहिती पत्नी मृणाल यांनी अमोल यांचे आतेभाऊ अतुल प्रभाकर कदम (रा.रायसोनी नगर, जळगाव) यांना दिली. त्यांनी पारोळा व इतर नातेवाईकांकडे चौकशी केली, मात्र रात्री उशिरापर्यंत शोध न लागल्याने अतुल कदम यांनी रात्री बारा वाजता रामानंद नगर पोलिसात अमोल हरविल्याची तक्रार दिली. त्यानुसार हरविल्याची नोंद करण्यात आली. पोलीस ठाण्यात नोंद झाल्यानंतरही ठाणे अंमलदार अरुण पाटील यांनी ही माहिती पत्रकारांना दिली नव्हती.पत्नीशी वाद झाल्याची चर्चापत्नी मृणाल यांच्याशी अमोल यांचा वाद झाला होता व त्यातूनच त्यांनी घर सोडल्याचे सांगितले जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी चौकशी केली असता अमोल हे शेगाव येथे असल्याचे निष्पन्न झाले. अतुल हे स्वत: अमोल यांना घेण्यासाठी गेले होते. सोमवारी सायंकाळी ते परत आले. व्यवसायाच्या ताणतणावातून आपण विश्रांतीसाठी शेगाव येथे गेलो होतो असा जबाब अमोल यांनी दिल्याची माहिती सहायक निरीक्षक बेंद्रे यांनी ‘लोकमत’ ला दिली.अमोल घर सोडून जाण्याला राजकीय व इतर असे महत्वाचे कोणतेच कारण नव्हते. शेगाव येथे दर्शनासाठी गेला होता. तो आता घरी परत आला आहे.-चिमणराव पाटील, माजी आमदार

टॅग्स :Jalgaonजळगाव