शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
6
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
7
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
9
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
10
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
11
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
12
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
13
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
14
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
15
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
16
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
17
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
18
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
19
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
20
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

सिमेंटच्या जंगलात पक्ष्यांचे अतोनात हाल - चाळीसगाव येथे आयोजित ‘पक्ष्यांपर्यंत पाणी’ उपक्रमातील सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 15:55 IST

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अन्न साखळी जिवंत ठेवा

चाळीसगाव : पक्ष्यांना दाणा-पाणी देण्याचे संस्कार नकळतपणे बालवयात आपणावर रुजवले जातात. पण आताच्या सिमेंटच्या जंगलांमध्ये पक्ष्यांना अन्न पाणी मिळत नसल्यामुळे त्यांचे अतोनात हाल होतात, असा सूर येथे आयोजित ‘पक्ष्यांपर्यंत पाणी’ उपक्रमाच्या समारोप्रसंगी उमटला. पक्षी निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका बजावत असतात, यासाठी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्ष्यांची अन्नसाखळी जिवंत ठेवायला हवी, असे आवाहन कळंत्री विद्यालयाचे चेअरमन डॉ. सुनील राजपूत यांनी केले.शहरातील चंपाबाई रामरतन कळंत्री महाविद्यालयात २३ रोजी ‘पक्ष्यांपर्यंत पाणी’ उपक्रमाची सांगता झाली, त्यावेळी ते बोलत होते. युगंधरा फाउंडेशन व हिरकणी महिला मंडळाच्यावतीने शाळा, महाविद्यालयातून जनजागृती करण्यात आली असून शाळेतील आवारात मातीच्या भांड्यांची व्यवस्था करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉ. सुनील राजपूत, युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव, हिरकणी महिला मंडळाच्या संस्थापिका सुचित्रा पाटील, मुख्याध्यापक प्रमोद दायमा आदी मान्यवर उपस्थित होते...तर पक्ष्यांचा जीव वाचू शकतोपाण्याच्या शोधात पक्षांना लांब भटकंती करावी लागते. उन्हाळ्यात पाण्याअभावी तहानेने व्याकूळ होऊन शेकडो पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागतात. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घराच्या गच्चीवर, झाडावर, सावलीच्या ठिकाणी पाण्याचे भांडी भरुन ठेवल्यास हजारो पक्ष्यांचा जीव वाचू शकतो, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.युगंधरा फाउंडेशन व हिरकणी महिला मंडळातर्फे जागतिक चिमणी दिनापासून ‘पक्ष्यांपर्यंत पाणी’ या उपक्रमास सुरुवात करण्यात आली असून याची सांगता शनिवारी करण्यात आली, अशी माहिती उपक्रमाचे समन्वयक स्वप्नील कोतकर यांनी दिली.पर्यावरण रक्षणासाठी पहिले पाऊलयावेळी सुचित्रा पाटील यांनी सांगितले की, स्वत:पासून सुरुवात केली तर सर्व काही बदलू शकते. पर्यावरण रक्षणासाठी पहिले पाऊल उचलण्याची गरज असून माणुसकीचा मूलमंत्र लक्षात ठेवून संस्थेच्यावतीने पक्ष्यांपर्यंत पाणी हा उपक्रम सुरु करण्याचा मानस हाती घेतला असून शहरातील विविध भागात परळ ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.बदलत्या जीवनशैलीने पक्ष्यांची संख्या घटतेयमानवाच्या राहणीमानाच्या बदलत्या संकल्पनेमुळे पक्ष्यांचीदेखील संख्या कमी होऊ लागली आहे. तहान आणि भुकेने व्याकूळ झालेल्या पक्ष्यांनादेखील सर्व नागरिकांच्या सहकार्याची जोड हवी आहे, तेव्हाच या उपक्रमाचे खरे सार्थक होईल, अशी भावना स्मिता बच्छाव यांनी व्यक्त केली आहे.अन् पक्षांना मिळाला आधार२० ते २३ मार्च पर्यंत ‘पक्ष्यांपर्यंत पाणी’ उपक्रम जागराने शहर ढवळून निघाले. पक्षीमित्र भावना जागविण्यात भरारी घेतली असून ही भावना आपल्यासह समाजामध्ये कायम रहावी यासाठी शहरातील विविध शाळांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचे पालकांमध्ये विशेष कौतूक असून विद्यार्थ्यांनी आपल्या घरात असलेली जुन्या भांड्यांची स्वत: परळ तयार करुन घराच्या परिसरात लावण्यासाठी हट्ट धरल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजली असल्याचे या वेळी पालकांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव