शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

परप्रांतीयांनी धरली घराची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:16 IST

कोरोना परिणाम : स्थानिक प्रवाशांना जागा मिळेना, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा रेल्वे गाड्या हाऊस फुल्ल : सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः ...

कोरोना परिणाम : स्थानिक प्रवाशांना जागा मिळेना, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

रेल्वे गाड्या हाऊस फुल्ल : सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्यात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने, दिवसेंदिवस बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. त्यात शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक संचारबंदी लागू केल्यामुळे परप्रांतीय बांधवांनी घराची वाट धरल्याने मुंबईहून जळगावकडे येणाऱ्या सर्व गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. परिणामी यामुळे स्थानिक प्रवाशांना जागा मिळत नसून, गर्दीमुळे गाडीत सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडत असल्याचे सोमवारी ''लोकमत'' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आले.

संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद असल्याने या व्यवसायावर पोट भरणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. विशेषतः मुंबईतील हॉटेल व्यवसायात मोठ्या संख्येने परप्रांतीय बांधव काम करीत असून, आता या संचारबंदीत हॉटेल व्यवसायही बंद असल्यामुळे ते आपल्या घराकडे परतू लागले आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मुंबईहून जळगावमार्गे उत्तर भारतात, पश्चिम बंगाल, झारखंड, दिल्ली व बिहारकडे जाणाऱ्या काशी एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस, पंजाब मेल या गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. परिणामी यामुळे स्थानिक प्रवाशांना गाडीत जागा मिळत नसल्यामुळे प्रवास करणे अवघड झाले आहे. विशेषतः यामुळे महिला प्रवाशांचे सर्वाधिक हाल होत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जादा डबे जोडण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

इन्फो :

डब्यात सोशल सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांना मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. मात्र, असे असतांना रेल्वेच्या आरक्षण डब्यातच प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

इन्फो :

मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना अल्प प्रतिसाद

एकीकडे मुंबईहून येणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी होत असतांना दुसरीकडे जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची अत्यल्प गर्दी दिसून येत आहे. विषय म्हणजे नेहमी गर्दी असणाऱ्या कामायनी एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस व महानगरी एक्स्प्रेस या गाड्यांनाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद आहे. जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या या गाड्यांचे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच प्रवाशांकडून आरक्षण होत असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

मुंबईत राहून काय करणार

''लोकमत'' प्रतिनिधीने परप्रांतीय बांधवांशी संवाद साधला. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुंबईत अत्यंत कडक निर्बंध लागू आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. संचार बंदीत मुंबईतील बाजारपेठ व हॉटेल व्यवसाय बंद असल्याने आमचा रोजगार बंद झाला आहे. हाताला काम नसल्याने मुंबईत राहून काय करणार, मुंबईची महागाई पाहता त्या ठिकाणी रोजगार नसताना राहणे सोयीचे नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होईपर्यंत आम्ही गावी जात असल्याचे या परप्रांतीय बांधवांनी ''लोकमत''शी बोलताना सांगितले.