शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

परप्रांतीयांनी धरली घराची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:16 IST

कोरोना परिणाम : स्थानिक प्रवाशांना जागा मिळेना, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा रेल्वे गाड्या हाऊस फुल्ल : सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः ...

कोरोना परिणाम : स्थानिक प्रवाशांना जागा मिळेना, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

रेल्वे गाड्या हाऊस फुल्ल : सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्यात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने, दिवसेंदिवस बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. त्यात शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक संचारबंदी लागू केल्यामुळे परप्रांतीय बांधवांनी घराची वाट धरल्याने मुंबईहून जळगावकडे येणाऱ्या सर्व गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. परिणामी यामुळे स्थानिक प्रवाशांना जागा मिळत नसून, गर्दीमुळे गाडीत सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडत असल्याचे सोमवारी ''लोकमत'' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आले.

संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद असल्याने या व्यवसायावर पोट भरणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. विशेषतः मुंबईतील हॉटेल व्यवसायात मोठ्या संख्येने परप्रांतीय बांधव काम करीत असून, आता या संचारबंदीत हॉटेल व्यवसायही बंद असल्यामुळे ते आपल्या घराकडे परतू लागले आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मुंबईहून जळगावमार्गे उत्तर भारतात, पश्चिम बंगाल, झारखंड, दिल्ली व बिहारकडे जाणाऱ्या काशी एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस, पंजाब मेल या गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. परिणामी यामुळे स्थानिक प्रवाशांना गाडीत जागा मिळत नसल्यामुळे प्रवास करणे अवघड झाले आहे. विशेषतः यामुळे महिला प्रवाशांचे सर्वाधिक हाल होत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जादा डबे जोडण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

इन्फो :

डब्यात सोशल सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांना मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. मात्र, असे असतांना रेल्वेच्या आरक्षण डब्यातच प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

इन्फो :

मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना अल्प प्रतिसाद

एकीकडे मुंबईहून येणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी होत असतांना दुसरीकडे जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची अत्यल्प गर्दी दिसून येत आहे. विषय म्हणजे नेहमी गर्दी असणाऱ्या कामायनी एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस व महानगरी एक्स्प्रेस या गाड्यांनाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद आहे. जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या या गाड्यांचे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच प्रवाशांकडून आरक्षण होत असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

मुंबईत राहून काय करणार

''लोकमत'' प्रतिनिधीने परप्रांतीय बांधवांशी संवाद साधला. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुंबईत अत्यंत कडक निर्बंध लागू आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. संचार बंदीत मुंबईतील बाजारपेठ व हॉटेल व्यवसाय बंद असल्याने आमचा रोजगार बंद झाला आहे. हाताला काम नसल्याने मुंबईत राहून काय करणार, मुंबईची महागाई पाहता त्या ठिकाणी रोजगार नसताना राहणे सोयीचे नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होईपर्यंत आम्ही गावी जात असल्याचे या परप्रांतीय बांधवांनी ''लोकमत''शी बोलताना सांगितले.