शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

परप्रांतीयांनी धरली घराची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:16 IST

कोरोना परिणाम : स्थानिक प्रवाशांना जागा मिळेना, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा रेल्वे गाड्या हाऊस फुल्ल : सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः ...

कोरोना परिणाम : स्थानिक प्रवाशांना जागा मिळेना, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

रेल्वे गाड्या हाऊस फुल्ल : सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्यात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने, दिवसेंदिवस बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. त्यात शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक संचारबंदी लागू केल्यामुळे परप्रांतीय बांधवांनी घराची वाट धरल्याने मुंबईहून जळगावकडे येणाऱ्या सर्व गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. परिणामी यामुळे स्थानिक प्रवाशांना जागा मिळत नसून, गर्दीमुळे गाडीत सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडत असल्याचे सोमवारी ''लोकमत'' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आले.

संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद असल्याने या व्यवसायावर पोट भरणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. विशेषतः मुंबईतील हॉटेल व्यवसायात मोठ्या संख्येने परप्रांतीय बांधव काम करीत असून, आता या संचारबंदीत हॉटेल व्यवसायही बंद असल्यामुळे ते आपल्या घराकडे परतू लागले आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मुंबईहून जळगावमार्गे उत्तर भारतात, पश्चिम बंगाल, झारखंड, दिल्ली व बिहारकडे जाणाऱ्या काशी एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस, पंजाब मेल या गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. परिणामी यामुळे स्थानिक प्रवाशांना गाडीत जागा मिळत नसल्यामुळे प्रवास करणे अवघड झाले आहे. विशेषतः यामुळे महिला प्रवाशांचे सर्वाधिक हाल होत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जादा डबे जोडण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

इन्फो :

डब्यात सोशल सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांना मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. मात्र, असे असतांना रेल्वेच्या आरक्षण डब्यातच प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

इन्फो :

मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना अल्प प्रतिसाद

एकीकडे मुंबईहून येणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी होत असतांना दुसरीकडे जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची अत्यल्प गर्दी दिसून येत आहे. विषय म्हणजे नेहमी गर्दी असणाऱ्या कामायनी एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस व महानगरी एक्स्प्रेस या गाड्यांनाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद आहे. जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या या गाड्यांचे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच प्रवाशांकडून आरक्षण होत असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

मुंबईत राहून काय करणार

''लोकमत'' प्रतिनिधीने परप्रांतीय बांधवांशी संवाद साधला. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुंबईत अत्यंत कडक निर्बंध लागू आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. संचार बंदीत मुंबईतील बाजारपेठ व हॉटेल व्यवसाय बंद असल्याने आमचा रोजगार बंद झाला आहे. हाताला काम नसल्याने मुंबईत राहून काय करणार, मुंबईची महागाई पाहता त्या ठिकाणी रोजगार नसताना राहणे सोयीचे नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होईपर्यंत आम्ही गावी जात असल्याचे या परप्रांतीय बांधवांनी ''लोकमत''शी बोलताना सांगितले.