शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आगामी पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसून येत आहे, शहरात दोन दिवसांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसून येत आहे, शहरात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यासह पुढील चार दिवस जिल्हाभरात अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. शुक्रवारीदेखील शहरात ढगाळ वातावरण कायम होते. शहरात दिवसभर ताशी २४ किलोमीटर वेगाने वारे वाहात होते.

अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. काही ठिकाणी रब्बीच्या पिकांची काढणी सुरू आहे तर काही ठिकाणी अद्याप गहू, हरभरा व दादर करण्यात आलेली नाही. त्यात पाऊस झाला तर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीदेखील १७ मार्च ते २१ मार्च दरम्यान जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातच जिल्ह्यात २४ ते ३० किमी वेगाने वारे वाहात असल्याने केळी व दादरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

अवकाळी पावसाचे काय आहे कारण

ओडिसा, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, झारखंड आणि पूर्व भारतातील ईशान्य भारतातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व हालचाली सुरू आहेत, यालाच नॉर्वेस्टर इफेक्ट् म्हणून ओळखले जाते. याच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी १८ ते २० मार्च आणि २१ ते २४ मार्च दरम्यान ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नॉर्वेस्टर इफेक्टच्या हालचाली एप्रिल ते जून महिन्यात साधारणतः पाहायला मिळतात, पण यावेळी त्या आधी होत आहेत. त्यामुळे जिथे प्रभाव जास्त असेल तिथे नुकसान जास्त होण्याची शक्यता आहे. जळगाव विभागात प्रभाव अत्यल्प राहण्याची शक्यता आहे.

कोट..

यावर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यादरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामानात होत असलेल्या बदलांमुळे हे बदल जाणवत आहेत. जिल्ह्यात पावसाची शक्यता असली तरी त्याचे प्रमाण ३० ते ४० टक्के इतकेच आहे.

- नीलेश गोरे, हवामानतज्ज्ञ