शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात चारा व व पाणी टंचाईचा गुरांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 19:09 IST

खरेदीदारही मिळत नसल्याने बाजार थंडावला

ठळक मुद्दे दुभत्या जनावरांनाही भाव मिळेनादुप्पट भाव देऊनही चारा मिळेना

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३ - चाऱ्याच्या कमतरतेसह पाणी टंचाईच्या तीव्र झळा मुक्या जनावरांना बसू लागल्या आहेत. चाराव पाण्याअभावी पशूपालक आपली गुरे विक्रीला काढत आहे तर दुसरीकडे याच कारणाने खरेदीदारही मिळत नसल्याचे विदारक चित्र गुरांच्या बाजारात आहे. नाईलाजास्तव पशूपालक आपले दुभती जनावरे विक्रीला काढत आहे. त्यांना भाव मिळत नाही तर भाकड जनावरे कोणी घेण्यास तयार नाही.वाढत्या उन्हासोबतच पाणी टंचाईच्याही झळा वाढू लागल्याने पिण्याचे पाणी मिळणे कठीण असताना गुरांनाही पाणी पुरविणे पशूपालकांसाठी कठीण होत आहे. अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने गुरांना कसे पाणी पुरवावे, असा प्रश्न पशूपालकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे गुरांना पाणीच देता येत नसल्याने ती विकून टाकलेली बरी या विचाराने पशूपालक आपली गुरे थेट बाजारात विक्रीसाठी आणत आहे.दुप्पट भाव देऊनही चारा मिळेनापाण्यासोबतच चाºयाचीही टंचाई असल्याने चाºयाचे भाव गगनाला भिडले आहेत. तीन हजार रुपये शेकडा पेंडी असलेला दादरचा कडबा सध्या सहा ते साडेसहा हजार रुपये शेकडा विक्री होत आहे. एवढा भाव देऊनही हा चारा मिळत नसल्याचे पशूपालकांनी सांगितले. उसाचा चाराही २८०० ते ३००० रुपये क्ंिवटलवर पोहचला आहे.महिनाभरात पालटले चित्रचारा व पाणी टंचाईमुळे सध्या गुरांच्या बाजारातील उलाढाल ३० ते ३५ टक्क्यांवर आली असल्याचे बाजारात आढळून आले. दर शनिवारी भरणाºया गुरांच्या बाजारात जिल्हाभरातून गुरे विक्रीसाठी येण्यासह खरेदीदारही मोठ्या प्रमाणात येत असतात. गेल्या महिन्यापर्यंत येथे दर शनिवारी साधारण ५० लाखाची उलाढाल होत असे. मात्र सध्या हीच उलाढाल १५ ते १६ लाखांवर आली आहे.दुभत्या जनावरांनाही भाव मिळेनाचारा, पाण्याअभावी पशूपालन करणे कठीण होत असल्याने पशूपालक नाईलाजास्तव आपली दुभती जनावरेही बाजारात विक्रीला आणत आहे. मात्र चारा, पाण्याअभावी खरेदीदारही खरेदी करण्यास धजावत नाही. त्यामुळे गुरांना अत्यंत कमी दरात मागणी होत आहे. ६५ हजारापर्यंत किंमत असलेल्या एका म्हशीला आज केवळ ५५ हजारात विकावे लागल्याचा अनुभव येथे एका विक्रेत्याने सांगितला.चारा, पाणी नसल्याने पशूपालक आपले गुरे बाजारात विक्रीला आणत आहे. मात्र ग्राहकी नसल्याने बाजार थंडावला आहे.- सदाशिव जोशी, गुरांचे व्यापारी.चाºयाचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने पशूपालन करणे कठीण होत आहे. त्यामुळे दुभती जनावरे बाजारात विक्रीला येत असले तरी त्यांना त्या प्रमाणात भाव मिळत नाही व भाकड जनावरे घेण्यास कोणी तयार होत नाही.- विशाल राजपूत, पशूपालक, कुसुंबा

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव