शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

जळगाव जिल्ह्यात चारा व व पाणी टंचाईचा गुरांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 19:09 IST

खरेदीदारही मिळत नसल्याने बाजार थंडावला

ठळक मुद्दे दुभत्या जनावरांनाही भाव मिळेनादुप्पट भाव देऊनही चारा मिळेना

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३ - चाऱ्याच्या कमतरतेसह पाणी टंचाईच्या तीव्र झळा मुक्या जनावरांना बसू लागल्या आहेत. चाराव पाण्याअभावी पशूपालक आपली गुरे विक्रीला काढत आहे तर दुसरीकडे याच कारणाने खरेदीदारही मिळत नसल्याचे विदारक चित्र गुरांच्या बाजारात आहे. नाईलाजास्तव पशूपालक आपले दुभती जनावरे विक्रीला काढत आहे. त्यांना भाव मिळत नाही तर भाकड जनावरे कोणी घेण्यास तयार नाही.वाढत्या उन्हासोबतच पाणी टंचाईच्याही झळा वाढू लागल्याने पिण्याचे पाणी मिळणे कठीण असताना गुरांनाही पाणी पुरविणे पशूपालकांसाठी कठीण होत आहे. अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने गुरांना कसे पाणी पुरवावे, असा प्रश्न पशूपालकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे गुरांना पाणीच देता येत नसल्याने ती विकून टाकलेली बरी या विचाराने पशूपालक आपली गुरे थेट बाजारात विक्रीसाठी आणत आहे.दुप्पट भाव देऊनही चारा मिळेनापाण्यासोबतच चाºयाचीही टंचाई असल्याने चाºयाचे भाव गगनाला भिडले आहेत. तीन हजार रुपये शेकडा पेंडी असलेला दादरचा कडबा सध्या सहा ते साडेसहा हजार रुपये शेकडा विक्री होत आहे. एवढा भाव देऊनही हा चारा मिळत नसल्याचे पशूपालकांनी सांगितले. उसाचा चाराही २८०० ते ३००० रुपये क्ंिवटलवर पोहचला आहे.महिनाभरात पालटले चित्रचारा व पाणी टंचाईमुळे सध्या गुरांच्या बाजारातील उलाढाल ३० ते ३५ टक्क्यांवर आली असल्याचे बाजारात आढळून आले. दर शनिवारी भरणाºया गुरांच्या बाजारात जिल्हाभरातून गुरे विक्रीसाठी येण्यासह खरेदीदारही मोठ्या प्रमाणात येत असतात. गेल्या महिन्यापर्यंत येथे दर शनिवारी साधारण ५० लाखाची उलाढाल होत असे. मात्र सध्या हीच उलाढाल १५ ते १६ लाखांवर आली आहे.दुभत्या जनावरांनाही भाव मिळेनाचारा, पाण्याअभावी पशूपालन करणे कठीण होत असल्याने पशूपालक नाईलाजास्तव आपली दुभती जनावरेही बाजारात विक्रीला आणत आहे. मात्र चारा, पाण्याअभावी खरेदीदारही खरेदी करण्यास धजावत नाही. त्यामुळे गुरांना अत्यंत कमी दरात मागणी होत आहे. ६५ हजारापर्यंत किंमत असलेल्या एका म्हशीला आज केवळ ५५ हजारात विकावे लागल्याचा अनुभव येथे एका विक्रेत्याने सांगितला.चारा, पाणी नसल्याने पशूपालक आपले गुरे बाजारात विक्रीला आणत आहे. मात्र ग्राहकी नसल्याने बाजार थंडावला आहे.- सदाशिव जोशी, गुरांचे व्यापारी.चाºयाचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने पशूपालन करणे कठीण होत आहे. त्यामुळे दुभती जनावरे बाजारात विक्रीला येत असले तरी त्यांना त्या प्रमाणात भाव मिळत नाही व भाकड जनावरे घेण्यास कोणी तयार होत नाही.- विशाल राजपूत, पशूपालक, कुसुंबा

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव