शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

जळगाव जिल्ह्यात चारा व व पाणी टंचाईचा गुरांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 19:09 IST

खरेदीदारही मिळत नसल्याने बाजार थंडावला

ठळक मुद्दे दुभत्या जनावरांनाही भाव मिळेनादुप्पट भाव देऊनही चारा मिळेना

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३ - चाऱ्याच्या कमतरतेसह पाणी टंचाईच्या तीव्र झळा मुक्या जनावरांना बसू लागल्या आहेत. चाराव पाण्याअभावी पशूपालक आपली गुरे विक्रीला काढत आहे तर दुसरीकडे याच कारणाने खरेदीदारही मिळत नसल्याचे विदारक चित्र गुरांच्या बाजारात आहे. नाईलाजास्तव पशूपालक आपले दुभती जनावरे विक्रीला काढत आहे. त्यांना भाव मिळत नाही तर भाकड जनावरे कोणी घेण्यास तयार नाही.वाढत्या उन्हासोबतच पाणी टंचाईच्याही झळा वाढू लागल्याने पिण्याचे पाणी मिळणे कठीण असताना गुरांनाही पाणी पुरविणे पशूपालकांसाठी कठीण होत आहे. अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने गुरांना कसे पाणी पुरवावे, असा प्रश्न पशूपालकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे गुरांना पाणीच देता येत नसल्याने ती विकून टाकलेली बरी या विचाराने पशूपालक आपली गुरे थेट बाजारात विक्रीसाठी आणत आहे.दुप्पट भाव देऊनही चारा मिळेनापाण्यासोबतच चाºयाचीही टंचाई असल्याने चाºयाचे भाव गगनाला भिडले आहेत. तीन हजार रुपये शेकडा पेंडी असलेला दादरचा कडबा सध्या सहा ते साडेसहा हजार रुपये शेकडा विक्री होत आहे. एवढा भाव देऊनही हा चारा मिळत नसल्याचे पशूपालकांनी सांगितले. उसाचा चाराही २८०० ते ३००० रुपये क्ंिवटलवर पोहचला आहे.महिनाभरात पालटले चित्रचारा व पाणी टंचाईमुळे सध्या गुरांच्या बाजारातील उलाढाल ३० ते ३५ टक्क्यांवर आली असल्याचे बाजारात आढळून आले. दर शनिवारी भरणाºया गुरांच्या बाजारात जिल्हाभरातून गुरे विक्रीसाठी येण्यासह खरेदीदारही मोठ्या प्रमाणात येत असतात. गेल्या महिन्यापर्यंत येथे दर शनिवारी साधारण ५० लाखाची उलाढाल होत असे. मात्र सध्या हीच उलाढाल १५ ते १६ लाखांवर आली आहे.दुभत्या जनावरांनाही भाव मिळेनाचारा, पाण्याअभावी पशूपालन करणे कठीण होत असल्याने पशूपालक नाईलाजास्तव आपली दुभती जनावरेही बाजारात विक्रीला आणत आहे. मात्र चारा, पाण्याअभावी खरेदीदारही खरेदी करण्यास धजावत नाही. त्यामुळे गुरांना अत्यंत कमी दरात मागणी होत आहे. ६५ हजारापर्यंत किंमत असलेल्या एका म्हशीला आज केवळ ५५ हजारात विकावे लागल्याचा अनुभव येथे एका विक्रेत्याने सांगितला.चारा, पाणी नसल्याने पशूपालक आपले गुरे बाजारात विक्रीला आणत आहे. मात्र ग्राहकी नसल्याने बाजार थंडावला आहे.- सदाशिव जोशी, गुरांचे व्यापारी.चाºयाचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने पशूपालन करणे कठीण होत आहे. त्यामुळे दुभती जनावरे बाजारात विक्रीला येत असले तरी त्यांना त्या प्रमाणात भाव मिळत नाही व भाकड जनावरे घेण्यास कोणी तयार होत नाही.- विशाल राजपूत, पशूपालक, कुसुंबा

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव