शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

मुंबईहून जळगावला पावणेचार तास उशीरा आले विमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 18:48 IST

विमानसेवा अखेर सुरू

ठळक मुद्दे पहिल्याच दिवशी विलंब प्रवाशांची झाली गैरसोय

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून बंद पडलेली जळगाव-मुंबई विमानसेवा शुक्रवार २० एप्रिलपासून पुन्हा सुरू झाली. मात्र पहिल्याच दिवशी मुंबईहून विमान सुमारे पावणेचार तास उशीरा पोहोचले. विमान सेवाबंद पडल्यानंतर ही सेवा सुरू होण्याचा पहिलाच दिवस होता. त्यात विमानाला उशीर झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. ही सेवा यापुढे अखंडपणे व वेळेवर सुरु रहावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.कंपनीने वेबसाईटवर जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मुंबईहून सकाळी ७.४० वाजता निघालेले विमान जळगावला ९.१५ ला पोहोचेल. तर जळगावहून मंगळ, बुध व गुरूवार असे तीन दिवस सकाळी ११.०५ वाजता निघून दुपारी १२.४५ वाजता मुंबईला पोहोचणार आहे. तर शुक्र, शनि व रविवार असे आठवड्यातील तीन दिवस दुपारी २.३० वाजता जळगावहून प्रवासी घेऊन हे विमान मुंबईला दुपारी ४.०५ ला पोहोचेल. त्यानुसार शुक्रवारी दुपारी २.३० वाजता हे विमान मुंबईकडे रवाना झाले. कंपनीच्या वेबसाईटवर तिकीट विक्रीही सुरू आहे. जळगाव-पुणे विमानसेवेबाबत मात्र अद्याप कंपनीकडून घोषणा झालेली नाही.--------पावणेचार तास उशीरमुंबईहून ७.४० हून विमान निघून जळगावला ९.१५ला पोहोचणे अपेक्षित असताना पहिल्या दिवशी या फ्लाईटला विलंब झाला. त्यामुळे विमान जळगावला दुपारी १ वाजता पोहोचले. जळगावहून मात्र वेळेवर दुपारी २.३० वाजता विमान मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली.