शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

चाळीसगावला बेलगंगा सहकारी साखर कारखान्यावर दहा वर्षानंतर झाले ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 12:40 IST

कामगारांच्या उपस्थित झाली बैठक

ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 28 - बेलगंगा सहकारी साखर कारखान्याची जिल्हा बँकेकडून हस्तांतर प्रक्रिया गेल्या आठवड्यात पुर्ण झाली. बेलगंगेचा ताबा अंबाजी गृपकडे आला आहे. प्रजासत्ताकदिनी  मुख्य प्रवर्तक व माजी चेअरमन चित्रसेन पाटील यांच्या हस्ते दहा वर्षानंतर कारखाना परिसरात ध्वजारोहण झाले. २००७-०८ गळीत हंगाम सुरु असतांनाच जिल्हा बँकेने भाडे करार रद्द केल्याने कारखान्याला कुलूप लागले. चित्रसेन पाटील यांनी लोकसहभागातून ३९ कोटी २० लाख रुपयांना बेलगंगा विकत घेतला. गेल्या आठवड्यात जिल्हा बँकेने भूमीपुत्रांकडे कारखान्याचा ताबा दिला. कामगारांशी सकारात्मक चर्चाअगोदरच जाहीर केल्यानुसार ध्वजारोहणानंतर कामगारांची बैठकही घेण्यात आली. यावेळी तीनशेहून अधिक कामगार उपस्थित होते. कामगारांचे थकीत वेतन (काम केलेले) याबरोबरच कामगारांच्या वारसांना गुणवत्तेनुसार काम देण्याबाबत दोन्ही बाजूने सकारात्मक चर्चा झाली. यावेळी प्रविण पटेल, दिलीप रामराव चौधरी, विजय अग्रवाल, दिनेश पटेल,  प्रेमचंद खिंवसरा, डॉ. अभिजीत पाटील, रविंद्र केदारसिंग पाटील, अजय शुक्ल, निशांत मोमया, डॉ. मुकूंद करंबेळकर, निलेश निकम, प्रशांत मोराणकर, भुषण ब्राम्हणकार, किरण देशमुख, राजेंद्र धामणे आदी उपस्थित होते.