शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

पाच गावांना मिळतेय अशुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 20:15 IST

नागरिकांचे आरोग्य धोक्यात : शुद्ध पाणी न मिळाल्यास आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा

नागरिकांचे आरोग्य धोक्यात : शुद्ध पाणी न मिळाल्यास आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारातासखेडा, ता. रावेर : तासखेडा गावासह नजीकच्या पाच गावांना अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार असून हा प्रकार म्हणजे नागरिकाच्या आरोग्याशी खेळ असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. हा विषय गांभीर्याने घेऊन तात्काळ उपाययोजना केल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.तासखेडा गावासह रणगाव, गहूखेडा, रायपूर, सुदगाव या पाच गावांसाठी सामुहिक पाणी पुरवठा योजना आहे. ही योजना रणगाव व गहूखेडा येथे कार्यान्वित आहे.या योजनेच्या देखभाल व दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून २२ लाखांचा निधी गेल्या वर्षी खर्च झाला. काम सुरू असेपर्यंत ग्रामस्थांना मागील दोन वर्षे पाणी पुरवठा बंद होता. निधी योजनेवर खर्च केल्यानंतर सद्य स्थितीत योजना दोन ते तीन महिन्यांपासून सुरू करण्यात आली आहे.पाण्याचा जसाच्या तसा पुरवठायोजनेचे पाणी तापी नदीपात्रातून उचलले जाते. सध्या नदीला पूर असल्यामुळे जसेच्या तसे पाणी नागरिकांना पुरविले जात आहे. अतिशय गढूळ पाणी नागरिकांना मिळत असते. हा प्रकार म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असल्याची टीका पाच गावांमधील नागरिकांकडून केली जात आहे.काम कोणते केलेजिल्हा परिषदेकडून पाणी पाणी पुरवठा योजनेसाठी निधी देण्यात आला. तब्बल २२ लाखांचा हा निधी मिळाला. तरीही जर नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा होत असेल तर नेमके या निधीतून काम कोणते केले? दोन वर्षांच्या कालावधीत कोणते काम झाले? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. नागरिकांकडून दुषित पाणी पुरवठ्या विरोधात ओरड सुरू झाल्याने या संदर्भात पाचही गावांच्या सरपंचांनी वरिष्ठांकडे कैफियत मांडली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्षच होत असल्याचे लक्षात येत आहे.सध्या होणारा पाणी पुरवठा असा आहे की, गुरेढोरेही हे पाणी पिण्यास धजावत नसल्याची परिस्थिती या पाच गावांमध्ये दिसून येत आहे. या पाच गावांना सध्या एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असतो. पाण्याची स्थिती लक्षात घेता, साथीच्या आजारांची लागण या परिसरात उद्भवण्याची भिती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.तीन महिन्यापूर्वी दिले पत्रहा विषय गांभीर्याने घेऊन जिल्हा परिषद सदस्य कैलास यांच्याशी गहूखेडा सरपंचांनी चर्चा केल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेकडे याबाबत तीन महिन्यापासून पत्रव्यवहार सुरू केला आहे. तीन महिन्यापूर्वी पत्र दिल्यावरही हा प्रश्न सुटू शकलेला नाही. अशी गंभीर स्थिती असताना दुर्लक्ष केले जात असल्याने सरपंच जे.के. पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.वरिष्ठांकडून दुर्लक्षपाणी समस्येचा हा विषय अतिशय गंभीर असताना जिल्हा परिषद प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असल्याची टीका गावातील नागरिकांकडून केली जात आहे. जिल्हा परिषद सदस्याने पत्र देऊन दुर्लक्ष होत असेल तर ग्रामपंचायत सदस्यांना दाद देणार कोण? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.चौकशीची मागणीग्रामस्थांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून पाच गावांची ही पाणी पुरवठा योजना करण्यात आली. योजनेवर थोडा नव्हे तब्बल २२ लाखांचा निधी खर्च झाला आहे. त्यामुळे या योजनेची चौकशी केली जावी अशी मागणी आता होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ होत असल्याने याची गंभीर दखल घेतली जावी अन्यथा पाचही गावातील ग्रामस्थ व पदाधिकारी उपोषणास बसतील असा इशारा देण्यात आला आहे.