शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाच गावांना मिळतेय अशुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 20:15 IST

नागरिकांचे आरोग्य धोक्यात : शुद्ध पाणी न मिळाल्यास आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा

नागरिकांचे आरोग्य धोक्यात : शुद्ध पाणी न मिळाल्यास आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारातासखेडा, ता. रावेर : तासखेडा गावासह नजीकच्या पाच गावांना अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार असून हा प्रकार म्हणजे नागरिकाच्या आरोग्याशी खेळ असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. हा विषय गांभीर्याने घेऊन तात्काळ उपाययोजना केल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.तासखेडा गावासह रणगाव, गहूखेडा, रायपूर, सुदगाव या पाच गावांसाठी सामुहिक पाणी पुरवठा योजना आहे. ही योजना रणगाव व गहूखेडा येथे कार्यान्वित आहे.या योजनेच्या देखभाल व दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून २२ लाखांचा निधी गेल्या वर्षी खर्च झाला. काम सुरू असेपर्यंत ग्रामस्थांना मागील दोन वर्षे पाणी पुरवठा बंद होता. निधी योजनेवर खर्च केल्यानंतर सद्य स्थितीत योजना दोन ते तीन महिन्यांपासून सुरू करण्यात आली आहे.पाण्याचा जसाच्या तसा पुरवठायोजनेचे पाणी तापी नदीपात्रातून उचलले जाते. सध्या नदीला पूर असल्यामुळे जसेच्या तसे पाणी नागरिकांना पुरविले जात आहे. अतिशय गढूळ पाणी नागरिकांना मिळत असते. हा प्रकार म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असल्याची टीका पाच गावांमधील नागरिकांकडून केली जात आहे.काम कोणते केलेजिल्हा परिषदेकडून पाणी पाणी पुरवठा योजनेसाठी निधी देण्यात आला. तब्बल २२ लाखांचा हा निधी मिळाला. तरीही जर नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा होत असेल तर नेमके या निधीतून काम कोणते केले? दोन वर्षांच्या कालावधीत कोणते काम झाले? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. नागरिकांकडून दुषित पाणी पुरवठ्या विरोधात ओरड सुरू झाल्याने या संदर्भात पाचही गावांच्या सरपंचांनी वरिष्ठांकडे कैफियत मांडली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्षच होत असल्याचे लक्षात येत आहे.सध्या होणारा पाणी पुरवठा असा आहे की, गुरेढोरेही हे पाणी पिण्यास धजावत नसल्याची परिस्थिती या पाच गावांमध्ये दिसून येत आहे. या पाच गावांना सध्या एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असतो. पाण्याची स्थिती लक्षात घेता, साथीच्या आजारांची लागण या परिसरात उद्भवण्याची भिती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.तीन महिन्यापूर्वी दिले पत्रहा विषय गांभीर्याने घेऊन जिल्हा परिषद सदस्य कैलास यांच्याशी गहूखेडा सरपंचांनी चर्चा केल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेकडे याबाबत तीन महिन्यापासून पत्रव्यवहार सुरू केला आहे. तीन महिन्यापूर्वी पत्र दिल्यावरही हा प्रश्न सुटू शकलेला नाही. अशी गंभीर स्थिती असताना दुर्लक्ष केले जात असल्याने सरपंच जे.के. पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.वरिष्ठांकडून दुर्लक्षपाणी समस्येचा हा विषय अतिशय गंभीर असताना जिल्हा परिषद प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असल्याची टीका गावातील नागरिकांकडून केली जात आहे. जिल्हा परिषद सदस्याने पत्र देऊन दुर्लक्ष होत असेल तर ग्रामपंचायत सदस्यांना दाद देणार कोण? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.चौकशीची मागणीग्रामस्थांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून पाच गावांची ही पाणी पुरवठा योजना करण्यात आली. योजनेवर थोडा नव्हे तब्बल २२ लाखांचा निधी खर्च झाला आहे. त्यामुळे या योजनेची चौकशी केली जावी अशी मागणी आता होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ होत असल्याने याची गंभीर दखल घेतली जावी अन्यथा पाचही गावातील ग्रामस्थ व पदाधिकारी उपोषणास बसतील असा इशारा देण्यात आला आहे.