शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
3
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
4
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
5
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
6
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
7
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
8
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
9
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
10
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
12
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
13
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
14
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
15
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
16
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
17
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
18
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
19
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
20
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारे पाच वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 12:50 IST

महामार्गाच्या कामासाठी उपसा झाल्याची शक्यता, चारही वाहने जामनेर पोलीस ठाण्यात जमा

जळगाव : शहरासह जिल्ह्यात गौण खनिजाचा बेसुमार उपसा सुरूच असून शुक्रवारी मध्यरात्री मुरुमाची तीन व खडीची वाहतूक करणारे एक डंपर तर वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने जप्त केले आहे. हे पाचही वाहने जामनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या कामासाठी या गौण खनिजाची वाहतूक केली जात असल्याचे सांगितले जात असून या मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास सर्रासपणे गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारीही वाढत आहे.दरम्यान, गेल्याच महिन्यात महामार्गाच्या कामासाठी मुरूमचा अवैधरित्या उपसा करून त्याची वाहतूक करीत असलेले दोन डंपर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनाच आढळून आले होते. क्षमतेपेक्षा अधिक मुरूमचा उपसा केल्याने त्या डंपर मालकांला एक कोटी तीन लाख चार हजारांचा दंड करण्यात आला होता, तरीदेखील हा उपसा सुरूच आहे.जिल्ह्यात वाळू उपशास बंदी असताना वाळूचा बेसुमार उपसा सुरू असल्याचे दररोज समोर येत आहे. या सोबतच मुरुम, खडी यांचीही अवैधरित्या वाहतूक सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहे. त्यात सध्या जळगाव-औरंगाबाद मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून त्या कामासाठी या मार्गावरुन गौण खनिजाची वाहतूक करणारे वाहने सुसाट जात असल्याच्या तक्रारी वाढत आहे.शुक्रवारी मध्यरात्री महसूल विभागाचे पथक जळगाव-औरंगाबाद मार्गावर गस्त घालत असताना जामनेर तालुक्यातील पाळधीनजीक गौण खनिजाची वाहतूक करणारे चार डंपर पथकाला आढळून आले. त्यांची तपासणी केली असता त्यात तीन डंपरमध्ये मुरुम तर एका डंपरमध्ये खडी आढळून आली. कागदपत्रांची विचारणा केली असता गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी असणाऱ्या पावत्यांवर महसूल विभागाचा शिक्का नव्हता व परवानाही नव्हता. पहाटे चार वाजता ही चारही डंपर जामनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या.तत्पूर्वी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास नेरी येथे जामनेर फाट्यानजीक वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टरही आढळून आले. तेदेखील जप्त करण्यात येऊन जामनेर पोलीस ठाण्यात लावण्यात आले.प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी योगेश नन्नवरे, प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून अतुल सानप, जगदीश धमाले, पो.कॉ. हितेश महाजन यांनी ही कारवाई केली.निकषाकडे लक्षसंध्याकाळी सहा वाजेनंतर महामार्गाचे काम करू नये, असे शासनाचे १३ जानेवारी २०१८चे परिपत्रक आहे. मात्र, जळगाव-औरंगाबाद मार्गाच्या कामासाठी मध्यरात्रीच्या वेळी गौण खनिजाची सर्रास वाहतूक सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव